शिवसेनेच्या शिव चित्रपट सेनेची इर्शाळवाडीला मायेची पाखर…

मुंबई: रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळवाडीवर दरड कोलळून नैसर्गिक आपत्ती ओढवली गेली व ४८ कुटुंबावर अस्मानी संकटाचा घाला आला. त्यात ठाकर वाडीतील २२ निष्पाप जीवांचे बळी गेले, ५७ जण अद्याप बेपत्ता असून अनेक जखमींवर उपचार केले गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकार तर्फे सर्वोतपरी मदत उपलब्ध करून दिलीय व महाराष्ट्र सरकार त्यांचे पुनर्वसन देखील करून […]

अधिक वाचा..

बारामती परिमंडलात ५१ टक्के वीजग्राहक ऑनलाईन तर ४९ टक्के अजूनही रांगेतच

बारामती: चंद्रावर ‘सॉफ्ट लँडिंग’ करण्यात भारताचे चांद्रयान-३ लवकरच यशस्वी होईल. डिजीटल इंडियासाठी हा गौरवाचा क्षण असेल. पण याच डिजीटल इंडियात व महाराष्ट्रात तब्बल ४९ टक्के वीजग्राहक आजही पारंपरिक पद्धतीने स्वत:चा वेळ व पैसा वाया घालत रांगेत उभे राहून वीजबिल भरत असल्याचे वास्तव आहे. बारामती परिमंडलात शेतीचे ग्राहक वगळता २० लाख ३४ हजार ग्राहक आहेत. ज्यापैकी […]

अधिक वाचा..

कृषीमंत्री धनंजय मुंडे जिल्ह्यात येताच जाणार शेतकऱ्यांच्या बांधावर

परळी वैद्यनाथ: राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे रविवारी सकाळी कृषी विभागाचे मंत्री पद स्वीकारल्यानंतर प्रथमच बीड जिल्ह्यात येत असून आल्याबरोबर ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन गोगलगायींनी नुकसान केलेल्या क्षेत्राची पाहणी करणार आहेत. कृषिमंत्री धनंजय मुंडे हे सकाळी 11 वाजल्यापासून परळी वैद्यनाथ तालुक्यातील वाघबेट, बेलंबा आदी गावांना भेटी देऊन गोगलगायींनी बाधित क्षेत्राची पाहणी करतील व प्रशासनास आवश्यक […]

अधिक वाचा..

उद्धवजी ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी महिला आघाडी सक्षम करा; ज्योती ठाकरे

मुंबई: जालना तालुक्यातील सिंधीकाळेगाव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलताना महिला आघाडीच्या जिल्हा संपर्कप्रमुख ज्योती ठाकरे यांनी वरील उद्गार काढले. यावेळी व्यासपीठावर उपतालुकाप्रमुख सखाराम गिराम, विष्णुपंत गिराम, जनार्दन गिराम, माजी नगरसेविका गंगुताई वानखेडे मंजुषा घायाळ, मंगल मेटकर, श्रीमती अंजली बनसोडे, संगीता सानप यांच्यासह भागवत गिराम यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना महिला […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात तोडक कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन करा; आमदार अस्लम शेख

मुंबई: मुंबईसह ७ जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने अलर्ट जारी केलेला आहे. राज्यात इर्शारवाडीसारखी दुर्देवी घटना घडलेली असताना मालवणी, अंबोजवाडीमध्ये भर पावसात २५० पेक्षा जास्त बांधकामं तोडली गेली. काल विधानसभा सभागृहात या मुद्द्यावरुन आक्रमक भूमीका घेत भर पावसात लोकांची घरे तोडणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी मालाड-पश्चिमचे आमदार अस्लम शेख यांनी घेतली आहे. अस्लम शेख म्हणाले, पावसाळ्यात […]

अधिक वाचा..

इरसालवाडी भागातील सर्व धोकादायक गावांचे पुनर्वसन करावे; नाना पटोले

मुंबई: रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात दरड कोसळून इरसाळवाडी हे अख्खे गाव जगाच्या नकाशावरून गायब झाले आहे. मदत कार्य सुरु असले तरी त्याला मर्यादा येत आहेत. सरकारने ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे परंतु ही मदत अत्यंत तुटपुंजी असून मदत वाढवून दिली पाहिजे. पुनर्वसन करताना एकट्या इरसालवाडीचे पुनर्वसन करुन चालणार नाही तर त्या भागातील धोकादायक […]

अधिक वाचा..

मणिपूरचे अमानवी सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा

मुंबई: मणिपूरमध्ये महिला अत्याचाराच्या अत्यंत घृणास्पद घटना उघड झाल्या असून या घटना मानवतेला काळीमा फासणाऱ्या आहेत. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने या घटनांकडे बघ्याची भूमिका घेतली असून अशा निष्क्रिय केंद्र सरकारच्या विरोधात निषेधाचा ठराव सभागृहात मांडला जावा आणि मणिपूर घटनेवर चर्चा घडून आणली जावी अशी काँग्रेससह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे चर्चा मागितली होती. विधानसभा अध्यक्षांनी […]

अधिक वाचा..

महापौर ना मंत्रालयात केबिन द्या; आदित्य ठाकरे

मुंबई: मुंबई महानगरपालिकेतील बाजार समिती आणि शिक्षण समितीच्या केबिन पालिका प्रशासनाने पालकमंत्र्यांना दिल्या आहेत. मिंधे सरकार च्या आदेशाने महापालिका प्रशासनान मुंबईच्या पालकमंत्र्यांना स्वतंत्र केबिन दिल्या आहेत. पालिका प्रशासनाच्या या निर्णयाचा शिवसेना नेते, युवासेनाध्यक्ष, आमदार आदित्य ठाकरे यांनी कडाडून विरोध केलाय. महापालिका कायदा 1888 नुसार मुंबई महापालिका स्वतंत्र प्राधिकरणानुसार कार्यरत आहे. या कायद्याची पायमल्ली केली आहे. […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रभूषण पुरस्कार सोहळ्यातील दुर्घटनेला सरकार जबाबदार; अंबादास दानवे

मुंबई: खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेला सांस्कृतिक विभागाइतकेच गृहखातेही जबाबदार आहे. तसेच या घटनेतील श्री सदस्यांच्या मृत्यूला सरकार जबाबदार गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परिषद सभागृहात केला. सदर घटनेमध्ये दुखापत झालेल्या रुग्णांवर टाटा हॉस्पिटलमध्ये उपचार होत नव्हते म्हणून त्यांना नवी मुंबईच्या एमजीएम येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सांस्कृतिक कार्यमंत्री […]

अधिक वाचा..

गुन्हेगार सुटू नयेत म्हणून पीडित महिलांच्या एफआरआय लिहिण्यात त्रुटी नसव्यात…

मुंबई: साता-यातील फलटन तालुक्यातील सोनकवडे गावातील कोळसा भट्टीत काम करणाऱ्या  रायगड जिल्ह्यातील आदिवासी महिलेवर सामूहिक बलाकाराची घटना घडली होती. पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी या विषयाची लक्षवेधी शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेत मांडली. या अनुशंगाने झालेल्या चर्चेत डॉ मनिषा कायंदे, कपिल पाटील, राम शिंदे यांनी सहभाग घेतला. गृहमंत्री देवेद्र फडणवीस म्हणाले की, ही घटना गंभीर आहे. […]

अधिक वाचा..