अजित पवार विमान अपघात! महिनाभरानंतरही गूढ कायम; अमोल मिटकरींचे घातपाताचे गंभीर आरोप

मुंबई: अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज एक महिना पूर्ण झाला असताना तपासाचा अंतिम निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात विविध दावे-प्रतिदावे होत असून प्रकरण अधिकच गूढ बनले आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या परिसरात माध्यमांशी बोलताना आमदार अमोल मिटकरी यांनी अपघात सूनियोजित असल्याची शक्यता व्यक्त केली. विमान रडारवरून अचानक गायब झाले, लँडिंग गिअरमध्ये छेडछाड […]

अधिक वाचा..

जेलमध्ये वाल्मिक कराड, बाहेर मुलाची ‘बोलणार’ पोस्ट; बीडमध्ये चर्चेचा स्फोट

बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर उसळलेला संताप अजूनही ओसरलेला नाही. राज्यभर आंदोलनं, आरोपींना अटक करण्यासाठी सरकारवर दबाव आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आता या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. या हत्याकांडात नाव आलेले वाल्मिक कराड सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र, त्यांच्या मुलगा सुशील कराड याने सोशल मीडियावर टाकलेली एक ओळ […]

अधिक वाचा..

ग्रामपंचायतींवर जुन्या सरपंचांच्या नियुक्तीला ब्रेक; मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकारला स्थगिती

मुंबई: राज्यातील ग्रामपंचायतींच्या कारभारासंदर्भात महत्त्वाचा अंतरिम दिलासा देत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाच्या वादग्रस्त निर्णयाला तूर्तास स्थगिती दिली आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर पुन्हा जुन्याच सरपंचांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याच्या निर्णयावर खंडपीठाने गंभीर आक्षेप नोंदवला. पुढील आदेश येईपर्यंत कोणतीही नवीन प्रशासक नियुक्ती करू नये, असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणावर […]

अधिक वाचा..

प्लास्टिक फुलांवर कठोर कारवाईचा इशारा; डेकोरेटर्स आणि हॉल व्यवस्थापनांनाही शिक्षा!

मुंबई: राज्यात नैसर्गिकरीत्या विघटन न होणाऱ्या प्लास्टिक फुलांच्या विक्रीवर पूर्वीपासूनच बंदी लागू असताना, ही बंदी अधिक स्पष्ट, परिणामकारक आणि कठोर करण्यासाठी लवकरच स्वतंत्र शासन निर्णय (जीआर) काढण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. नव्या निर्णयानुसार केवळ प्लास्टिक फुलांचे उत्पादन आणि विक्रीच नव्हे, तर सजावटीसाठी त्यांचा वापर करणाऱ्या डेकोरेटर्सनाही शिक्षेस पात्र ठरवण्यात […]

अधिक वाचा..

परीक्षा केंद्रावरील शिक्षकाकडून विद्यार्थिनीशी गैरवर्तन, निलंबनाची कारवाई

संभाजीनगर: राज्यभरात दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षा सुरू असताना छत्रपती संभाजीनगर शहरातील बजाजनगर परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका परीक्षा केंद्रावर गार्डिंगसाठी नियुक्त शिक्षकाने परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षकाने विद्यार्थिनीशी अयोग्य वर्तन करत तिचा मोबाईल क्रमांक घेतला. त्यानंतर त्याने वारंवार फोन करून तिला मानसिक त्रास […]

अधिक वाचा..

उच्च व तंत्रशिक्षणातही ‘पवित्र’सारखी भरती प्रक्रिया? मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे सकारात्मक संकेत

मुंबई: शालेय शिक्षण विभागातील ‘पवित्र’ पोर्टलप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षण विभागातही पारदर्शक पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन सकारात्मक विचार करेल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत स्पष्ट केले. राज्यातील शासनमान्य विद्यापीठे व महाविद्यालयांमधील पदभरतीसाठी ‘पवित्र’ पोर्टलसारखी केंद्रीकृत यंत्रणा निर्माण करण्यात येणार का, असा प्रश्न सभागृहात उपस्थित करण्यात आला होता. त्यास उत्तर देताना मंत्री […]

अधिक वाचा..

बहाद्दरांनो, बस्स करा! सुनेत्रा पवारांविषयीच्या वक्तव्यांवर संतापाची लाट

मुंबई: महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी सुरू असलेल्या सार्वजनिक चर्चांवर आणि काही नेत्यांच्या वर्तनावर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. “प्रोटोकॉलसोबत स्त्रीसन्मान अत्यावश्यक” असा ठाम सूर समर्थकांकडून उमटताना दिसत आहे. अजित पवारांच्या निधनानंतर राजकीय घडामोडी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. या अपघाताबाबत संशय उपस्थित […]

अधिक वाचा..

मराठी भाषा गौरव दिनी ‘पप्पा सांगा कुणाचे…’ माहितीपटाचे विशेष प्रदर्शन

मुंबई: मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते अरुण सरनाईक यांच्या जीवनावर आधारित ‘पप्पा सांगा कुणाचे…’ या माहितीपटाचे विशेष प्रदर्शन प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघु नाट्यगृहात आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून […]

अधिक वाचा..

काँग्रेस हाच भाजपला सक्षम पर्याय, २०२९ साली देशात काँग्रेसची सत्ता: हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: काँग्रेस पक्ष देशात व राज्यात एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत आहे. काँग्रेस हाच भाजपला पर्याय आहे. आगामी काळात काँग्रेस पक्षाची ताकद आणखी वाढेल, त्यासाठी जोमाने काम करा. २०२९ साली देशात काँग्रेसची सत्ता येईल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला. काँग्रेसच्या कोकण विभागातील लोकप्रतिनिधींच्या तीन दिवसीय निवासी […]

अधिक वाचा..

कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

मुंबई: कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्याम कामांना गती देण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले. या बैठकीत पुढील प्रमुख घाटमार्गांवर सविस्तर चर्चा करण्यात आली —अणुस्करा–गावडी (ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) ते लांजा (जि. रत्नागिरी) येथील भांबेड–धनगरवाडी रस्ता. पावनखिंड–गजापूर–विशाळगड पायथा (ता. शाहूवाडी) ते संगमेश्वर तालुक्यातील देवडे–भोवडे जोडणारा […]

अधिक वाचा..