महाराष्ट्र देशाचे ‘लीडिंग लॉजिस्टिक्स गेटवे’ बनवणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा विश्वास

मुंबई: महाराष्ट्राला देशातील सर्वात सक्षम आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक लॉजिस्टिक्स केंद्र बनवण्यासाठी परिवहन विभाग पथदर्शक भूमिका बजावेल, असे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते ऑल इंडिया लॉजिस्टिक वेलफेरे अससोसिएशन आयोजित लॉजिस्टिक्स समीटला भेट दिल्याप्रसंगी बोलत होते. मंत्री सरनाईक म्हणाले की मुंबई ही केवळ देशाची आर्थिक राजधानी नसून आंतरराष्ट्रीय कार्गो हब म्हणूनही वेगाने […]

अधिक वाचा..

पुणे-सोलापूर महामार्गावर बनावट फायनान्स टोळीचा धुमाकूळ; वाहनचालकांना अडवून मारहाण

पुणे: पुणे सोलापूर हायवेवर वर बनावट फायनान्स कंपनीचे नाव सांगत वाहनचालकांना अडवून दमदाटी, मारहाण आणि लूटमार करण्याचे प्रकार वाढले आहेत. ही टोळी सध्या यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत सक्रिय असल्याची माहिती समोर आली असून, वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाटस टोलनाक्याजवळ थरारक प्रकार २२ फेब्रुवारी रोजी Patas टोलनाक्यापासून ते यवत गावादरम्यान एका दुचाकीवरून आलेल्या दोन […]

अधिक वाचा..

पुण्यात थकित ई-चलनधारकांवर कडक कारवाई; 30 दिवसांत दंड न भरल्यास लायसन्स रद्द होणार!

पुणे: पुणे पोलीस यांनी वाहनचालकांसाठी मोठा आणि कडक निर्णय घेतला आहे. वाहनांवरील थकित दंड न भरणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून, 30 दिवसांच्या आत दंड न भरल्यास वाहन मालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याचा प्रस्ताव आरटीओकडे पाठवला जाणार आहे. एसएमएसद्वारे मिळणार नोटीस पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लायसन्स रद्द करण्यापूर्वी वाहन मालकांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे नोटीस […]

अधिक वाचा..

राज्यसभा जागेवर काँग्रेसचा ठाम दावा; महाविकास आघाडीची निर्णायक बैठक

मुंबई: आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी माध्यमांशी संवाद साधत आघाडीची भूमिका स्पष्ट केली. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्याने राष्ट्रीय राजकारणाचा विचार करून राज्यसभेची जागा काँग्रेसला मिळावी, असा प्रस्ताव पक्षाच्या वतीने मांडण्यात आल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. बैठकीत नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी […]

अधिक वाचा..

कष्टकरी वडिलांचे महान दान; ससून रुग्णालयात मुलाला मिळाले नवजीवन

सोलापूर: सोलापुरातील शिवणकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे वडील आणि पुण्यात सुरक्षारक्षक म्हणून नोकरी करणारा ३३ वर्षीय मुलगा असं साधं, कष्टाळू कुटुंब. मात्र, दीड वर्षांपूर्वी उच्च रक्तदाबामुळे मुलाची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली आणि कुटुंबावर संकट कोसळलं. खासगी रुग्णालयांत प्रत्यारोपणासाठी १० ते ११ लाखांचा खर्च सांगण्यात आल्याने कुटुंब हतबल झाले. मुलाला नियमित डायलिसिस घ्यावे लागत होते. आर्थिक […]

अधिक वाचा..

सोलापूर मध्ये काँग्रेसचे भाजपविरोधात जोरदार आंदोलन; भारत-अमेरिका करार रद्द करण्याची मागणी

मुंबई: केंद्रातील भारतीय जनता पार्टी (भाजप) सरकारच्या धोरणांविरोधात इंडियन नॅशनल काँग्रेस च्या वतीने आज सोलापूरात तीव्र निदर्शने करण्यात आली. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी ‘देशद्रोही भाजप सरकार मुर्दाबाद’, ‘राहुल गांधीजी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है’, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही’ अशा जोरदार घोषणा दिल्या.आंदोलनानंतर निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. […]

अधिक वाचा..

पुणे महापालिकेत प्रतिमांवरून नवा वाद; महापौरांच्या कृतीवर कोल्हापुरात संताप

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे आणि उपमहापौर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महापालिका भवनातील विविध नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केले. मात्र, डॉ. केशव बलिराम हेडगेवार यांच्या प्रतिमेला हार घातल्यानंतर शेजारील राजर्षी शाहू महाराज यांच्या तैलचित्राला हार न घालता केवळ नमस्कार केल्याने वाद निर्माण झाला आहे. या प्रकारावरून कोल्हापूरमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष […]

अधिक वाचा..

गर्भपाताच्या गोळ्यांमुळे महिलेचा मृत्यू

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाट नांद्रे येथे एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बेकायदेशीररीत्या गर्भपाताच्या गोळ्यांचे सेवन केल्याने 28 वर्षीय आयशा समीर मुल्ला यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयशा यांनी 10 फेब्रुवारीच्या सुमारास गर्भपातासाठी औषधे घेतली. काही तासांतच त्यांना तीव्र पोटदुखी आणि […]

अधिक वाचा..

राज्यपालांच्या अभिभाषणावर काँग्रेसचा जोरदार हल्ला; ‘५ ट्रिलियन’ गप्पांवर विजय वडेट्टीवारांचा सवाल

मुंबई: राज्यपालांचे आजचे अभिभाषण म्हणजे जुन्याच २० मुद्द्यांची घासून-पुसून केलेली उजळणी असून हे सरकार राज्यपालांच्या तोंडी खोटे बोलायला लावत आहे, अशी जोरदार टीका काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. राज्यपालांच्या अभिभाषणाला काँग्रेसने विरोध दर्शवला. चर्चेदरम्यान वडेट्टीवार म्हणाले की, छत्रपती शिवराय, फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घ्यायचे आणि प्रत्यक्षात त्यांच्या विचारांचा अवमान करायचा, हे या […]

अधिक वाचा..

इंजिनिअर तरुणाची कमाल! मुकुंद कुदळची घरगुती मशरूम शेती ठरली यशस्वी

नाशिक: शेती म्हणजे फक्त पारंपरिक पिके आणि निसर्गावर अवलंबून राहणे, ही धारणा आता हळूहळू बदलत आहे. आधुनिक तंत्रज्ञान, कमी भांडवल आणि योग्य नियोजन यांच्या जोरावर शेतीतूनही भरघोस उत्पन्न मिळू शकते, याचे जिवंत उदाहरण पिंपरी (ता. येवला) येथील तरुण मुकुंद कुदळ यांनी उभे केले आहे. घरातील १०x१० खोलीतून सुरू झाला प्रवास मुकुंद कुदळ हा मूळचा मेकॅनिकल इंजिनिअर. […]

अधिक वाचा..