सामान्यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडणारे ते मन्याडचे वाघ: अजित पवार

मुंबई: भाईंच्या भाषणात शब्दांच्या कोट्यांची भरमार असायची, औचित्याचा मुद्दा, तारांकित प्रश्न, लक्षवेधी ही सारी संसदीय आयुधे वापरुन त्यांनी सरकारला जेरीस आणण्याचे काम केले. सामान्य लोकांचे प्रश्न सभागृहात पोटतिडकीने मांडणारे ते ‘मन्याड’ चे वाघ होते, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाई केशवराव धोंडगे यांचा सभागृहात गौरव केला. महाराष्ट्र विधीमंडळाचे अधिवेशन गाजवणारे व्यक्तिमत्व म्हणून […]

अधिक वाचा..

एसटीमध्ये ‘डिजिटल’ प्रणालीद्वारे मिळणार तिकिट; कसे ते पहा

मुंबई: ST तून प्रवास करताना प्रवाशांना आता तिकिटासाठी सुट्ट्या पैशांची चिंता नको. ST महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत ‘डिजिटल’ प्रणालीद्वारे तिकिट खरेदी करता येईल अशा ५ हजार ॲण्ड्राईड तिकिट मशिन्स नव्याने सेवेत दाखल केल्या आहेत. नव्या मशिनमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान रोख पैशांऐवजी युपीआय, क्युआर कोड, आदी डिजिटल पेमेंटचा वापर करत तिकिट काढता येणार आहे, अशी माहिती […]

अधिक वाचा..
Ajit Pawar

खचू नका, कोणतंही टोकाचं पाऊल उचलू नका: अजित पवार

मुंबई: विधीमंडळाचे अधिवेशन सुरु असताना मंगळवारी विधान भवनाच्या प्रवेशव्दारावर समोर आत्मदहनाचा प्रयत्न करणारे उस्मानाबादचे शेतकरी सुभाष देशमुख यांची विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुंबई येथील जे.जे. हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. त्यांच्या तब्बेतीची आस्थेने चौकशी केली आणि त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. कोणत्याही परिस्थितीत खचून जाऊ नका, असा धीर देत, टोकाचे पाऊल उचलू नका, अशी […]

अधिक वाचा..
Ajit Pawar

राज्य मराठी विकास संस्थेची मुंबईतील जागा कायम ठेवा…

विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी उपमुख्यमंत्र्यांकडून मान्य मुंबई: मराठी भाषा विकासासाठी काम करणाऱ्या राज्य मराठी विकास संस्थेला, मुंबईतील एल्फिन्स्टन तंत्रज्ञान संस्थेच्या आवारात पहिल्या मजल्यावर असलेली जागा खाली करण्याबाबतचे पत्र कौशल्य विकास विभागाने पाठवले आहे. त्यामुळे राज्याच्या राजधानीतच आपल्या मराठी भाषेला बेघर होण्याची वेळ आल्याचा महत्वाचा विषय विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पॉईंट ऑफ […]

अधिक वाचा..

२५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या पण शेतकऱ्यांसाठी दमडी नाही: नाना पटोले

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शिंदे-फडणवीस सरकारचे दुर्लक्ष मुंबई: राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे. परंतु एकनाथ शिंदे- फडणवीस सरकार मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. शेतकऱ्यांसाठी केवळ मदत जाहीर केली तीसुद्धा तुटपुंजी आहे. २५ हजार कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या सादर करण्यास आल्या पण त्यात शेतकऱ्यांसाठी दमडीची तरदूत केली नाही हे […]

अधिक वाचा..

गद्दार निवडणुकीला सामोरे जायला घाबरतायत: आदित्य ठाकरे

मुंबई (शीतल करदेकर): शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी आज वांद्रे पश्चिम इथल्या 3 शाखांचं उद्घाटन केलं. उद्घाटन प्रसंगी आयोजित रोड शो ला हजारो शिवसैनिक आणि वांद्रेकरांनी उपस्थिती लावली होती. वांद्र्यात आदित्य ठाकरेंचं स्वागत करण्यासाठी जागोजागी भगवे ध्वज, ढोल ताशा आणि २५ फुटांचा हार बांधण्यात आला होता. यावेळी बोलताना “या शाखेचे उद्घाटन […]

अधिक वाचा..
sheetal kardekar

शीतल करदेकर यांना पत्रमहर्षी आचार्य अत्रे पुरस्कार प्रदान

पुणे: आचार्य अत्रे यांच्या जयंतीनिमित्त‘ शिवाजीनगर येथील लकाकी रस्त्यावरील आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान, विनोद विद्यापीठ येथे अनेक मान्यवरांचा सत्कार आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठानचे वतीने करण्यात आला. साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्म संवत्सर वर्षानिमित्त न्यायमूर्ती राजेश केतकर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. पत्रकारिता क्षेत्रातील योगदानासाठी धाडसी पत्रकार शीतल करदेकर यांना पत्रमहर्षी […]

अधिक वाचा..

पावसाळी अधिवेशनात आक्रमक विरोधक सत्ताधाऱ्यांवर भारी

मुंबई (शीतल करदेकर): आक्रमक विरोधक सत्ताधाऱ्यांवर भारी’ असेच काहीसे चित्र पावसाळी अधिवेशनात सलग तिसऱ्या दिवशीही दिसले. आमदार अपात्रतेबाबतचा, दागी मंत्री व आमदार भाजपासोबत जाऊन शुर्चिभूत झाले काय…? हातपाय तोडण्याची जाहीर भाषा करणारे आमदार प्रकाश सुर्वे, सरकारी कर्तव्यात असणाऱ्यांवर हात उचलणारे आमदार  संतोष बांगर, मंत्री संजय राठोड आणि शिवसेनेवरील अधिकाराबाबत कोर्टात  चाललेली लढाई  या सर्व पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांचे पारडे कमजोर झाल्याचे […]

अधिक वाचा..

MH-CET परीक्षेत झालेल्या गोंधळाला जबाबदार असणाऱ्यांवर कार्यवाही करा: धनंजय मुंडे

मुंबई: राज्यात 5 ते 20 ऑगस्ट दरम्यान पार पडलेल्या MH-CET परीक्षेत झालेला गोंधळ, तांत्रिक बिघाड यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे पेपर अर्धवट राहिले तसेच सतत लॉग आउट होणे यासारख्या असंख्य अडचणींना त्यांना तोंड द्यावे लागले. लाखो विद्यार्थी या परीक्षेस बसल्याची पूर्ण कल्पना असताना देखील झालेल्या तांत्रिक बिघाडाला जबाबदार असलेल्या कंपनीवर तसेच सेलच्या संबंधित अधिकाऱ्यांवर राज्य सरकारने कार्यवाही […]

अधिक वाचा..

वडापाव विकून उभारली 50 कोटींची कंपनी…

मुंबई: 23 ऑगस्ट म्हणजेच जागतिक वडापाव दिवस म्हणून साजरा केला जातो. कधीही भूक लागली तर चौकाचौकात मिळणाऱ्या वडापाव विकून कोट्यवधींची उलाढाल असणारा व्यवसाय सुरु करणाऱ्याविषयी माहिती असायलाच हवी. गोली वडापाव नावाने देशभर 350 आउटलेट्स असणाऱ्या वडापाव चेनची सुरुवात कल्याणमध्ये कशी झाली आणि वडापाव विकून 50 कोटींची उलाढाल कशी करतो याची प्रेरक कथा आहे. काही मुलांना […]

अधिक वाचा..