मराठवाडा वॉटर ग्रीडमुळे ‘दुष्काळ’ इतिहासजमा होणार; निधी कमी पडू देणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प आधीच्या सरकारने बासनात गुंडाळून ठेवला होता. मात्र आमच्या सरकारने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुन्हा सुरू केला असून मराठवाड्यातील ‘दुष्काळ’ हा शब्द कायमचा पुसून टाकण्याचा आमचा ठाम निर्धार आहे. यासाठी निधीची कमतरता कधीही भासू दिली जाणार नाही, असे ठाम प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या […]

अधिक वाचा..

EpsteinFiles प्रकरणामुळे देशाची आंतरराष्ट्रीय प्रतिमा मलिन; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तात्काळ राजीनामा द्यावा; झीनत शबरीन

मुंबई: EpsteinFiles मधील धक्कादायक खुलासे आणि या प्रकरणाशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव जोडले जाणे हे भारतासाठी अत्यंत गंभीर व चिंताजनक असल्याचा आरोप मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी केला आहे. या प्रकरणामुळे भारत सरकारची आंतरराष्ट्रीय प्रतिमा मलिन होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणी त्यांनी केली. या प्रकरणाच्या […]

अधिक वाचा..

अजित पवारांना दोनदा मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली! अंतर्गत राजकारण कारणीभूत;  बबनराव पाचपुते यांचा दावा

मुंबई: भाजपचे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी दिवंगत नेते अजित पवार यांना एकदा नव्हे तर दोनदा मुख्यमंत्रीपदाची स्पष्ट संधी मिळूनही ती राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणामुळे हुकल्याचा खळबळजनक दावा केला आहे. अजित पवार यांच्यासोबत काम केलेल्या पाचपुते यांनी यासंदर्भात अनेक आठवणींना उजाळा दिला. बबनराव पाचपुते हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात मंत्री होते, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारीला भरपगारी सुट्टी बंधनकारक; उद्योग व खासगी आस्थापनांना शासनाचे आदेश

मुंबई: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांसाठी शनिवार, दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कामगार व कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी देणे बंधनकारक असल्याचे परिपत्रक उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जारी केले […]

अधिक वाचा..

चंद्रपूर महापालिका महापौर पदावर काँग्रेसचाच दावा; दिल्लीत उद्या निर्णायक बैठक; विजय वडेट्टीवार

नागपूर: चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौर पदाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, त्यापूर्वी काँग्रेस पक्षाची महत्त्वाची बैठक उद्या दिल्लीत होणार आहे. काँग्रेस महासचिव के.सी. वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीनंतर महापौर पदाबाबत अंतिम तोडगा निघेल, अशी माहिती काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचाच महापौर बसावा यासाठी पक्षात हालचाली सुरू आहेत. मात्र काही घडामोडींमुळे […]

अधिक वाचा..

मलंगगडावरील बांधकाम प्रकरणी लवकरच न्यायालयाचा निर्णय; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: श्री मलंगगडावरील काही बांधकामांबाबत न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणावर लवकरच अपेक्षित निर्णय लागेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. माघी पौर्णिमेनिमित्त मलंगगडावर आयोजित भव्य यात्रेदरम्यान ते पत्रकारांशी संवाद साधत होते. माघी पौर्णिमेच्या पावन दिवशी श्री मलंगनाथ गड भक्ती, श्रद्धा आणि उत्सवाच्या वातावरणाने उजळून निघाला आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि गुरुवर्य […]

अधिक वाचा..

एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! आरक्षण नसतानाही महापालिकांवर शिवसेनेच्या लाडक्या बहिणींचा शिक्का

मुंबई: महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर आता राज्यभर महापौर निवडीची प्रक्रिया सुरू झाली असून ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर या तीन महत्त्वाच्या महापालिकांमध्ये यंदा अनपेक्षितपणे महिलाराज येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे या तिन्ही महापालिकांमध्ये महापौरपद महिलांसाठी आरक्षित नसतानाही शिवसेनेने महिला नगरसेविकांवर विश्वास टाकत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे पक्षनेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ […]

अधिक वाचा..

जनतेच्या जमिनीवर कर्ज नाही, पण सत्ताधाऱ्यांच्या नात्यात विकास?

१५ एकरांवर १०० कोटींचं कर्ज? रनाळा ‘गुप्त स्मार्ट सिटी’ झाली आहे का नागपूर: महाराष्ट्रात विकासाची गंगा वाहतेय, असं सत्ताधारी वारंवार सांगतात. मात्र ही गंगा नेमकी कुणासाठी आणि कुठे वाहतेय, यावर आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील रनाळा गावातील १५ एकर जमिनीवर तब्बल १०० कोटी रुपयांचं कर्ज मिळाल्याची चर्चा सध्या राजकीय आणि […]

अधिक वाचा..

कोणत्याही अडचणीत मी तुमच्या सोबत! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विदीप जाधव कुटुंबियांना भावनिक सांत्वन

सातारा: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सुरक्षारक्षक स्वर्गीय विदीप जाधव यांचा बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुःखद घटनेनंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी स्वतःच्या वैयक्तिक दुःखाला बाजूला ठेवत विदीप जाधव यांच्या तरडगाव (ता. फलटण) येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी स्वर्गीय विदीप जाधव यांच्या पत्नी व […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राने राजासारखं मन असलेला नेता गमावला; अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करताना प्रशांत जगताप भावुक

मुंबई: महाराष्ट्राचे लाडके नेते, आदरणीय अजितदादा पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. दादांच्या जाण्याचा धक्का आजही स्वीकारणं कठीण असल्याचं सांगत माजी महापौर प्रशांत जगताप यांनी ज्या ठिकाणी अजितदादांना मुखाग्नी देण्यात आला, त्या ठिकाणी जाऊन नतमस्तक होत श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी दादांसोबतच्या २४ वर्षांच्या सहवासातील असंख्य आठवणी मनात दाटून आल्याने प्रशांत जगताप भावुक झाले. […]

अधिक वाचा..