मुंबईसह महाराष्ट्र वाचवा! प्रदूषणाने मुंबईकर गुदमरले; युद्धामुळेही पर्यावरणावर भीषण संकट

मुंबई: मुंबईतील हवेच्या प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली असून या गंभीर परिस्थितीवर आता बॉलिवूडमधूनही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. गुरुवारी (१२ मार्च) शहराच्या अनेक भागांत धुक्याचा जाड थर दिसून आला. या पार्श्वभूमीवर अभिनेत्री Deepika Padukone हिने सोशल मीडियावरून प्रशासनाला जाब विचारत संताप व्यक्त केला आहे. मुंबईत स्मॉगच्या थरामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून दृश्यमानता कमी झाल्याने […]

अधिक वाचा..

सुरक्षित शहरांसाठी ‘जेंडर सेन्सिटिव्ह’ नियोजन आवश्यक; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: महिलांच्या सुरक्षिततेसाठी शहरांचे नियोजन करताना ‘जेंडर सेन्सिटिव्ह’ दृष्टीकोन स्वीकारणे आवश्यक असल्याचे मत Neelam Gorhe यांनी व्यक्त केले. महिलांच्या सुरक्षिततेसाठी पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक गुंतवणूक या विषयावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. मुंबईची परंपरा कष्टकरी महिलांची असल्याचे सांगताना त्यांनी नमूद केले की, पूर्वी रात्रीच्या वेळी रस्त्यांवर पुरुषांचे वर्चस्व दिसत असे; मात्र आज […]

अधिक वाचा..

ई-रिक्षा व ई-बाईकसाठीही आता परमिट बंधनकारक; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

मुंबई: राज्यात रिक्षा आणि टॅक्सींसाठी नवीन परमिट देण्याची प्रक्रिया गेल्या दोन दिवसांपासून तात्पुरती स्थगित करण्यात आली असली तरी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ई-रिक्षा व ई-बाईकसाठी आता मोटार वाहन विभागाकडे रीतसर नोंदणी करून परमिट (परवाना) घेणे बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ही माहिती परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांनी दिली. मंत्री सरनाईक म्हणाले की, आतापर्यंत इलेक्ट्रिक […]

अधिक वाचा..

संविधान बदलण्याचा भाजपा-RSS चा डाव हाणून पाडा; हर्षवर्धन सपकाळ

त्रंबकेश्वर: देशातील प्रत्येक नागरिकाला हक्क व अधिकार देणाऱ्या संविधानावर आधारित देश उभारण्याचे काम काँग्रेस पक्ष करत आहे. मात्र या विचारधारेच्या विरोधात लोकांना लाचार बनवणारी, शोषणावर आधारित व्यवस्था निर्माण करण्याचा विचार भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. संविधानविरोधी मनुवादी विचारसरणीवर आधारित व्यवस्था निर्माण करण्याचा डाव उधळून […]

अधिक वाचा..

आमटे दांपत्याचा सन्मान केल्यामुळे ‘महाराष्ट्र भूषणचे’ भूषण वाढले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम हेमलकसा परिसरात आयुष्य वाहून आदिवासी समाजाची सेवा करणाऱ्या डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदा आमटे यांच्या कार्यामुळे हेमलकसा हे सामाजिक कार्याचे तीर्थक्षेत्र बनले आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. मटा सन्मान २०२६ सोहळ्यात या दांपत्याला ‘महाराष्ट्र भूषण’ सन्मानाने गौरविण्यात आले असून हा सन्मान देण्याचे भाग्य मला लाभले, ही माझ्यासाठी […]

अधिक वाचा..

पत्नीशी संबंधाच्या संशयातून वेटरची हत्या; पती अटकेत

ठाणे: पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका वेटरची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिळ-डायघर पोलिसांनी संशयित पतीला अटक केली असून अवघ्या चार तासांत गुन्ह्याचा उलगडा केला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिळ-डायघर परिसरातील पिंपरी गाव येथील भातशेतात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. […]

अधिक वाचा..

सोशल मीडियावर ओळख, लॉजमध्ये बोलावून लूट; फॅशन डिझायनरचा हनीट्रॅप रॅकेट उघड

बेळगाव: सोशल मीडियावर अनोळखी लोकांशी मैत्री करून श्रीमंत व्यक्तींना जाळ्यात ओढत लुटणाऱ्या हनीट्रॅप प्रकरणाचा बेळगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात फॅशन डिझायनर असलेल्या दीपा अवतगी (वय ३३, रा. महालिंगपूर, जि. बागलकोट) हिला अटक करण्यात आली असून तिचा साथीदार शिवानंद मठपती (रा. हुक्केरी, जि. बेळगाव) हा सध्या फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवानंद मठपती […]

अधिक वाचा..

स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त सामान्य ज्ञान; बदललेली जिल्ह्यांची व बेटांची नावे

औरंगाबाद: स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान (GK) हा अत्यंत महत्त्वाचा विषय मानला जातो. MPSC, पोलीस भरती, तलाठी तसेच इतर सरकारी परीक्षांमध्ये वारंवार विचारले जाणारे काही महत्त्वाचे बदल आणि माहिती जाणून घेणे आवश्यक असते. अलीकडच्या काळात देशात आणि राज्यात काही जिल्ह्यांची तसेच ठिकाणांची नावे बदलण्यात आली आहेत. ही माहिती स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरत आहे. […]

अधिक वाचा..

औरंगाबादात ‘हायड्रो गांजा’चे जाळे उघड; दोन तरुण अटकेत

औरंगाबाद: औरंगाबाद शहरात विदेशी ‘हायड्रो गांजा’ची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून गुन्हे शाखेने दोन तरुणांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून २८५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेने एन-४ परिसरातील राजवीर चरणसिंग बिरग (२०) आणि ओम रवींद्र शिंदे (२३) यांना मंगळवारी रात्री छावणीतील लोखंडी पुलावर सापळा रचून रंगेहाथ पकडले. राजवीरच्या बॅगेत […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा-बस व्यवस्थेवर कडक नियम व पालकांचा सहभाग वाढवा; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

शाळांमधील अनुचित घटनांना आळा घालण्यासाठी नवीन परिपत्रकात सर्व सूचनांचा समावेश करणार; मंत्री दादा भुसे मुंबई: महाराष्ट्रातील शाळांमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुला-मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांबाबत विधान परिषदेत लक्षवेधी क्र. ३ अंतर्गत चर्चा करण्यात आली. या विषयावर सदस्य डॉ. मनीषा कायंदे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेदरम्यान पिठासीन अधिकारी म्हणून बोलताना विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे […]

अधिक वाचा..