मुलींना १००% तर मुलांना ५०% फी माफी; नियम मोडणाऱ्या कॉलेजांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय लागू केला आहे. या निर्णयानुसार मुलींना १०० टक्के शिक्षण शुल्क माफी तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना ५० टक्के शुल्क माफी देण्यात येणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत याबाबत माहिती देताना स्पष्ट इशारा दिला की, शासनाच्या निर्णयानंतरही जर एखादे […]

अधिक वाचा..

२०३० पर्यंत घरगुती वीजदर २६% ने कमी होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: पूर्वी वीजेचे दर दरवर्षी सुमारे ९ टक्क्यांनी वाढत होते. मात्र आता २०२५ ते २०३० या पाच वर्षांच्या कालावधीत प्रत्येक वर्षी वीजदर १.२ टक्क्यांनी कमी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी शनिवारी दिली. त्यामुळे २०३० पर्यंत घरगुती वीजदरात २६ टक्के तर औद्योगिक वीजदरात ९ टक्क्यांची घट होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. नागपूरजवळील अतिरिक्त बुटीबोरी […]

अधिक वाचा..

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा बिगुल; आज दुपारी ४ वाजता वेळापत्रक जाहीर

मुंबई: देशातील पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून आज दुपारी ४ वाजता Election Commission of India पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे. या निवडणुकांमध्ये चार राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेशाचा समावेश आहे. वृत्तानुसार, West Bengal, Kerala, Tamil Nadu आणि Assam या राज्यांसह केंद्रशासित प्रदेश Puducherry येथे होणाऱ्या विधानसभा […]

अधिक वाचा..

राज्यात पाच वर्षांत ६७५ बिबट्यांचा मृत्यू; पुणे विभागात सर्वाधिक

पुणे: राज्यात गेल्या पाच वर्षांत नैसर्गिक कारणे, रस्ते अपघात, विहिरीत पडणे, विजेचा धक्का तसेच शिकारीमुळे तब्बल ६७५ बिबट्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या मृत्यूंपैकी सर्वाधिक १८१ बिबट्यांचे मृत्यू पुणे वन विभागात झाले असून नाशिक विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. वन विभागाकडून विविध उपाययोजना राबवूनही बिबट्यांचे मृत्यू तसेच बिबट्यांमुळे होणारी मनुष्यहानी कमी करण्यात अपेक्षित […]

अधिक वाचा..

पत्रकार कल्याण महामंडळाचा घोळ; मंजूर निर्णय कुठे गायब?

‘आर्थिक विकास महामंडळ’ की पत्रकारांचा प्रश्न भरकटवण्याचा प्रयत्न? मुंबई: महाराष्ट्रात पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याचा दावा असतानाही प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे हा निर्णय नेमका कुठे आणि कसा अडकला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पत्रकार आणि माध्यमकर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्या शीतल हरीष करदेकर यांनी जुलै २०२४ मध्ये […]

अधिक वाचा..

सीईटी परीक्षांना २४ मार्चपासून सुरुवात; १७ मेपर्यंत टप्प्याटप्प्याने परीक्षा

मुंबई: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांना लवकरच सुरुवात होत आहे. विविध सात अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश परीक्षांच्या अंतिम तारखा जाहीर करण्यात आल्या असून येत्या २४ मार्चपासून परीक्षांचा प्रारंभ होणार आहे. उच्चशिक्षण विभागाच्या एलएलबी (तीन व पाच वर्षे), बी.एड. (जनरल व स्पेशल) व बी.एड. (ईएलसीटी), बी.पी.एड., एम.एड., […]

अधिक वाचा..

अंत्यसंस्कारानंतर काही तासांतच भावाचाही मृत्यू

साखरखेर्डा: येथील शशिकला रामकृष्ण सुरळकर (वय ८०) यांचे ११ मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर १२ मार्च रोजी दुपारी १ वाजता रोकडोबा हनुमान मंदिरामागील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांसह गावातील अनेक नागरिक उपस्थित होते. यवतमाळ येथे वास्तव्यास असलेले त्यांचे धाकटे बंधू राम नामदेव ढोबळे हेही बहिणीच्या अंत्यसंस्कारासाठी साखरखेर्डा येथे आले होते. […]

अधिक वाचा..

भाजपला धक्का! माजी आमदार जीवन दैश यांचा राजीनामा; ‘पक्षात नैतिकता उरली नाही’ असा आरोप

मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार जीवन प्रदीप दैश यांनी शुक्रवारी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा निर्णय जाहीर करत पक्षावर नैतिकता ढासळल्याचा गंभीर आरोप केला.तीन वेळा आमदार राहिलेले दैश यांनी दोन दिवसांपूर्वी एका घोटाळ्यात आरोपी असलेल्या माजी खासदार रवींद्र कुमार यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्याचा तीव्र विरोध दर्शवला होता. […]

अधिक वाचा..

राजस्थानात आमदारसंख्या वाढणार? 2028 निवडणुकीपूर्वी 200 वरून 270 जागांची चर्चा जोरात

जयपूर: देशात सध्या विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची चर्चा सुरू असताना राजस्थानच्या राजकारणातही अचानक वेग आला आहे. राज्याची पुढील विधानसभा निवडणूक 2028 मध्ये होणार असली तरी विधानसभेतील आमदारसंख्या वाढवण्याच्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष Vasudev Devnani यांच्या एका वक्तव्यानंतर ही चर्चा सुरू झाली. त्यांनी विधानसभेत 280 सदस्य बसू शकतील असा […]

अधिक वाचा..

CSW-70 च्या पार्श्वभूमीवर महिला सक्षमीकरणासाठी जागतिक चर्चासत्र; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: संयुक्त राष्ट्रांच्या Commission on the Status of Women (CSW-70) या जागतिक अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर “SDGs and Mitigation of VAW: Weaving Ways for Empowerment” या विषयावर १७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता विशेष समांतर (Parallel Event) चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती तथा स्त्री-आधार केंद्र, पुणे यांच्या मानद अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या […]

अधिक वाचा..