आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करा

मुंबई: राज्यात सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता लागू आहे, असे असताना सत्ताधारी पक्षातील मंत्री जाणीवपूर्वक आणि उघडपणे या आचारसंहितेचे उल्लंघन करत असल्याचे गंभीर प्रकार समोर येत आहेत. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेच्या पूर्वसंध्येला सांगली जिल्ह्यात झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात, “जिल्हा परिषद निवडणुकीत […]

अधिक वाचा..

न्यायाच्या नावाखाली हिंसक आणि अमानवी भाषेला प्रोत्साहन देता येणार नाही; डॉ. नीलम गोऱ्हे

संविधान व मानवी अधिकारांच्या चौकटीत दखल आवश्यक; डॉ. नीलम गोऱ्हे यांची ठाम भूमिका मुंबई: भंडारा येथे आयोजित एका गायनाच्या कार्यक्रमात गायिका अंजली भारती यांनी बलात्कारासारख्या अतिशय संवेदनशील विषयावर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत वापरलेली निंदनीय व आक्षेपार्ह भाषा अत्यंत अस्वस्थ करणारी असून ती कोणत्याही परिस्थितीत समर्थन करण्याजोगी नाही, अशी ठाम […]

अधिक वाचा..

अजितदादांच्या जाण्याने माझे वैयक्तिक नुकसान; डॉ. विश्वजीत कदम यांच्याकडून शोक व्यक्त

मुंबई: महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाची बातमी ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी तसेच कदम कुटुंबासाठी अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे. अजितदादांच्या जाण्याने राज्याने एक खंबीर, अनुभवी आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व गमावले आहे. गेल्या सुमारे ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात त्यांनी आपल्या प्रशासकीय अभ्यास, ठाम निर्णयक्षमता आणि नेतृत्वगुणांच्या बळावर महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळे […]

अधिक वाचा..

आज माझा मोठा भाऊ हरपला! अजित पवारांच्या निधनावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावूक

विमान अपघातात अजित पवार यांच्या निधनावर उपमुख्यमंत्री शिंदेंची साश्रू नयनांनी श्रद्धांजली ठाणे: “आज माझा मोठा भाऊ हरपल्यासारखी भावना आहे. अजित पवार हे केवळ नेते नव्हते, तर ते एक अभ्यासू, वेळेचं भान ठेवणारे आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले व्यक्तिमत्त्व होते,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या निधनावर तीव्र शोकभावना व्यक्त केली. बारामतीजवळ विमान […]

अधिक वाचा..

प्रशासनावर मजबूत पकड आणि वेळेची काटेकोर शिस्त ही अजित पवारांची ओळख होती

उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्रावर शोककळा मुंबई: उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ व लोकप्रिय नेते मा. अजितदादा पवार यांच्या आज सकाळी झालेल्या धक्कादायक निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. हा विश्वास बसणार नाही असा क्षण असून राज्याने एक दूरदृष्टी असलेला नेतृत्वगुणी नेता गमावला आहे, असे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे. […]

अधिक वाचा..

आनंद दिघे साहेबांचे स्वप्न असणारा ठाणे महापालिकेवरील भगवा झेंडा कायम फडकत राहील 

आनंद दिघे जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतले समाधीस्थळी दर्शन, ठाण्यात भगव्याच्या विजयाचा गौरव ठाणे: वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी ठाण्यातील त्यांच्या समाधीस्थळी दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गुरुवर्य आनंद दिघे यांना कृतज्ञता व्यक्त करत, “आनंद दिघे साहेबांचे स्वप्न असणारा ठाणे महापालिकेवरील भगवा झेंडा कायम फडकत ठेवण्याचे कार्य आपण पूर्ण […]

अधिक वाचा..

भरसभेत शिंदेंनी उदय सामंतांना लावला फोन स्पीकर वर ठेवला अन…

1० हजार रोजगाराचं काय झालं? महाबळेश्वरच्या सभेत थेट सवाल मुंबई: राज्यात सध्या निवडणुकीचा धुरळा जोरात सुरू असून, महापालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीकडून प्रचाराचा वेग वाढवण्यात आला असून, विशेषतः शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मैदानात उतरले आहेत. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे झालेल्या प्रचारसभेत शिंदेंनी केलेल्या […]

अधिक वाचा..

एसटीच्या प्रत्येक इंधन पंपावर आता भविष्याची चार्जिंग

मुंबई: बदलत्या काळाची चाहूल ओळखत आणि पर्यावरणपूरक भविष्यासाठी ठोस पाऊल टाकत, राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या जागेवर उभारल्या जाणाऱ्या किरकोळ इंधन विक्री केंद्रांवर ईव्ही (इलेक्ट्रिक वाहन) चार्जिंग स्थानकांना प्राधान्य देण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश दिले. मंत्रालयातील आपल्या दालनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक […]

अधिक वाचा..

प्रधानमंत्री आवास योजनेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

मुंबई: केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 अंतर्गत नियमांमध्ये मोठे आणि महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. या बदलांचा थेट परिणाम घरकुलासाठी आधी अर्ज केलेल्या तसेच भविष्यात अर्ज करण्याच्या तयारीत असलेल्या नागरिकांवर होणार आहे. योजनेचा लाभ केवळ खऱ्या गरजू घटकांपर्यंतच पोहोचावा आणि गैरवापराला आळा बसावा, या उद्देशाने नियम अधिक स्पष्ट व कठोर करण्यात आल्याचे केंद्र […]

अधिक वाचा..

विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; १४ वर्षांच्या मुलीसह चौघांचा मृत्यू

सोलापूर: मंगळवेढ्याजवळ पंढरपूर–सोलापूर महामार्गावर सोमवारी (२६ जानेवारी २०२६) सायंकाळी भीषण अपघात झाला. देवदर्शनासाठी पंढरपूरला गेलेल्या मुंबईच्या भाविकांच्या क्रुझर गाडीला एका मालवाहतूक कंटेनर ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात तीन महिला आणि १४ वर्षांच्या मुलासह चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास […]

अधिक वाचा..