जागतिक महिला दिनाच्या मुहुर्तावर आरोग्य विभागाकडून एचपीव्ही लसीकरण आणि ‘पिंक ओपीडी’चा शुभारंभ

मुंबई: राज्यातील मुलींना गर्भाशय मुखाच्या (सर्व्हायकल) कर्करोगापासून संरक्षण मिळावे यासाठी ९ ते १४ वयोगटातील सुमारे ९ लाख ८४ हजार मुलींना एचपीव्ही प्रतिबंधक लस देण्याच्या मोहिमेचा तसेच ‘पिंक ओपीडी’चा शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबई येथे झाला. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत, बदललेल्या आहारपद्धतीत आणि वाढत्या तणावामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढताना दिसत […]

अधिक वाचा..

गृहस्वामिनी गॅसवर! महिलादिन तर रोजचाच… अशी महागाई नको सरकार!

मुंबई: देशाचा असो की राज्याचा अर्थसंकल्प, कुटुंबाचे बजेट सांभाळणाऱ्या ‘होम मिनिस्टर’ अर्थात गृहस्वामिनीचे लक्ष सर्वप्रथम कशाकडे असते? कांदा, बटाटा, भाजीपाला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरगुती गॅसच्या किमतीकडे. आजही प्रत्येक घरात महागाईचा भडका किती वाढणार याचीच चर्चा आहे. लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने सोन्याच्या दरातील चढ-उतारावरही सर्वसामान्यांचे लक्ष आहे. प्रश्न अनेक आहेत… पण उत्तर एकच दिले जाते […]

अधिक वाचा..

कार्यकर्त्याला न मागता दिलं जातं हेच शिवसेनेचं वचन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं. बाळासाहेबांनीही अठरा पगड जातींना एकत्र केलं, तळागाळातील कार्यकर्त्यांना मोठी पदं देऊन बळ दिलं. बाळासाहेबांचे स्वप्न आणि विचाराने शिवसेना पुढे जातेय. शिवसेना वाढवण्यासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्याला न मागता दिलं जातं, हे शिवसेनेचं वचन आहे, असे प्रतिपादन शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]

अधिक वाचा..

नाथषष्ठीत ‘नाथांचा रांजण’ भरला; पैठणमध्ये भक्तीचा जल्लोष

पैठण: नाथषष्ठी उत्सवानिमित्त पैठण येथे पारंपरिक ‘नाथांचा रांजण भरणे’ हा धार्मिक सोहळा शनिवारी मोठ्या भक्तिभावात पार पडला. भाविकांनी गोदावरी नदीतून पवित्र जल आणून संत एकनाथ महाराजांच्या वाड्यातील पवित्र रांजण भरत शतकानुशतके चालत आलेली परंपरा यंदाही जपली. परंपरेनुसार भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने ‘श्रीखंड्या’ या रूपात तब्बल १२ वर्षे संत एकनाथ महाराजांच्या सेवेत राहून गोदावरीचे पाणी आणून रांजण […]

अधिक वाचा..

युद्धामुळे साखर निर्यात ठप्प; देशात १५ लाख टन साखरेचा अतिरिक्त साठा होण्याची शक्यता

मुंबई: देशात सुरू असलेल्या साखर हंगामात मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम आता साखर उद्योगावर दिसू लागला आहे. अमेरिका, इस्राईल आणि इराण यांच्यात वाढलेल्या तणावामुळे जागतिक बाजारपेठ ढवळून निघाली असून आंतरराष्ट्रीय वाहतुकीवर परिणाम झाल्याने साखर निर्यात मोठ्या प्रमाणात मंदावली आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारात सुमारे १५ लाख टन साखरेचा अतिरिक्त साठा राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यंदाच्या हंगामात […]

अधिक वाचा..

चारित्र्यावर संशयातून विवाहितेला जाळून केले ठार; पती-सासऱ्याची जन्मठेप उच्च न्यायालयाकडून कायम

नागपूर: चारित्र्यावर संशय घेत विवाहितेला अमानुष मारहाण करून रॉकेल टाकून जाळून ठार केल्याप्रकरणी पती व सासऱ्याला सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे. घटनेची क्रूरता आणि उपलब्ध पुरावे लक्षात घेता न्यायालयाने दोघांचेही अपील फेटाळून लावले. अमोल देशमुख (वय २८) आणि विजय देशमुख (वय ५३) अशी आरोपींची नावे असून ते यवतमाळ जिल्ह्यातील […]

अधिक वाचा..

नितीशकुमार राज्यसभेकडे; बिहारमध्ये नेतृत्वबदलाची शक्यता, भाजपचा मुख्यमंत्री?

पटना: बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घडामोड घडली असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत त्यांनी अर्ज दाखल केल्याने बिहारमध्ये नेतृत्वबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नितीशकुमार राज्यसभेवर गेल्यास राज्यात भाजपचा मुख्यमंत्री बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बिहारमध्ये भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी सम्राट […]

अधिक वाचा..

आखाती संघर्षाची झळ पुण्याला! पेट्रोल-डिझेल व गॅस टंचाईची चिन्हे

पुणे: पश्चिम आशियातील आखाती परिसरात सुरू असलेल्या इराण–इस्रायल–अमेरिका तणावाचा परिणाम आता भारतातही जाणवू लागला असून महाराष्ट्रात इंधन आणि गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषत: पुण्यात येत्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेल आणि गॅस टंचाई निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून सीएनजी आणि एलपीजी गॅसच्या पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या […]

अधिक वाचा..

राष्ट्रपतींच्या दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग? पंतप्रधान मोदींची बंगाल सरकारवर जोरदार टीका

बंगाल: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या दौऱ्यादरम्यान प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील ऑल इंडिया ट्रेनमोल काँग्रेस (टीएमसी) सरकारवर जोरदार टीका केली. तसेच मुख्यमंत्री ममता बॅनरजी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने इंटरनॅशनल संटल कॉन्फरेन्स चे ठिकाण अचानक बदलल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. पंतप्रधान मोदींची ही प्रतिक्रिया अशा वेळी आली आहे, जेव्हा राष्ट्रपती […]

अधिक वाचा..

कल्याण-डोंबिवलीत ठाकरे गटाचे बंडखोरांवर कारवाईचे संकेत; तीन नगरसेवकांना ४८ तासांची अंतिम नोटीस

गट स्थापनेत सहकार्य न केल्याचा ठपका; उत्तर न दिल्यास अपात्रतेची प्रक्रिया सुरू होणार मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील तीन बंडखोर नगरसेवकांविरोधात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने कडक भूमिका घेतली आहे. संबंधित नगरसेवकांना ४८ तासांची अंतिम नोटीस देण्यात आली असून समाधानकारक उत्तर न दिल्यास त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत […]

अधिक वाचा..