राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार; प्रफुल पटेलांची घोषणा, रोहित पवारांवर अप्रत्यक्ष टीका

बारामती: सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत ही घोषणा पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष Praful Patel यांनी केली. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष नव्या जोमाने भरारी घेईल, असा विश्वास पटेल यांनी व्यक्त केला. या वेळी बोलताना पटेल यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या नेतृत्वगुणांचे तोंडभरून कौतुक केले. “नेतृत्व […]

अधिक वाचा..

बीडच्या प्रश्नांसाठी मुंबईत धाव! देवेंद्र फडणवीस यांची भेट; राजकारण तापलं

बीड: मागील वर्षभरापासून बीड जिल्हा राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. वाढती गुंडगिरी, खंडणीचे प्रकार, दहशत, महिलांवरील अत्याचार, खून आणि दरोडे यामुळे कायदा-सुव्यवस्थेची स्थिती ढासळल्याची टीका होत आहे.मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खंडणीसाठी अपहरण व निर्घृण हत्येने संपूर्ण राज्य हादरले होते. या घटनेनंतर जिल्ह्यातील परिस्थिती अधिकच गंभीर बनली. उपमुख्यमंत्री असताना अजित पवार यांनी बीडचे पालकमंत्रीपद स्वतःकडे […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादीत सत्ता हस्तांतरण! सुनेत्रा पवार बिनविरोध राष्ट्रीय अध्यक्षा; सुनील तटकरे यांचा शरद पवार गटावर टोला

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा राजकीय बदल झाला आहे. उपमुख्यमंत्री Sunetra Pawar यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आज बिनविरोध निवड करण्यात आली. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय एकमताने झाला. बैठकीत प्रफुल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्या प्रस्तावाला सर्व सदस्यांनी हात वर करून पाठिंबा दिला आणि […]

अधिक वाचा..

अजितदादांच्या विमान अपघातावरून राजकारण तापलं; संजय राऊत–रोहित पवारांवर भाजपाचा हल्लाबोल

मुंबई: दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत संजय राऊत आणि रोहित पवार यांच्यावर “प्रसिद्धी स्टंट” केल्याचा आरोप करत प्रखर टीका केली. भाजपा प्रदेश कार्यालयात बोलताना बन म्हणाले, “अजितदादांच्या निधनानंतर काही नेते रोज उठून तेच मुद्दे मांडत […]

अधिक वाचा..

भाजपमध्ये मोठे फेरबदल! केशव उपाध्ये उपाध्यक्षपदी, नवनाथ बन यांच्याकडे मुख्य प्रवक्तेपद

मुंबई: महाराष्ट्रातील निवडणुकांची रणधुमाळी ओसरताच भारतीय जनता पक्षने संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल जाहीर केले आहेत. नव्या कार्यकारिणीत काही जुन्या चेहऱ्यांना नवी जबाबदारी देत तरुणांना संधी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गेल्या आठ वर्षांपासून पक्षाची भूमिका आक्रमक आणि अभ्यासू पद्धतीने मांडणारे केशव उपाध्ये यांची मुख्य प्रवक्तेपदावरून प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नवनाथ बन […]

अधिक वाचा..

१६ मार्चला राज्यसभा रणधुमाळी; महाराष्ट्रातील ७ जागांसाठी महायुती-महाविकास आमनेसामने

मुंबई: भारत निवडणूक आयोग यांनी १० राज्यांतील ३७ राज्यसभा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून महाराष्ट्रातील सात जागांसाठी १६ मार्च रोजी मतदान होणार आहे. सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान, तर सायंकाळी ५ वाजता मतमोजणी केली जाणार आहे.महाराष्ट्रातील सध्याच्या संख्याबळानुसार सातपैकी सहा जागा सत्ताधारी महायुतीच्या खात्यात जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे सत्ताधारी […]

अधिक वाचा..

सुनेत्रा पवारांसमोर तिहेरी कसोटी; नेतृत्व, विलिनीकरण आणि चौकशीचा मुद्दा ऐरणीवर

मुंबई: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अप) पक्षाची धुरा त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हाती सोपवण्यात आली आहे. दुःखद घटनेनंतर अवघ्या चार दिवसांत त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली आणि त्याच दिवशी मुंबईत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ त्यांनी घेतली. या घाईबद्दल राजकीय वर्तुळात टीका झाली असली तरी सुनेत्रा पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया […]

अधिक वाचा..

अजित पवारांच्या विमान दुर्घटनेवर रोहित पवारांचे सवाल; राज्यात युवा नेतृत्व म्हणून ठसठशीत छाप

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेत निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अनेक तांत्रिक मुद्दे उपस्थित केले असून सखोल आणि पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे. अपघातातील तांत्रिक बाबींवर शंका रोहित पवार यांनी ब्लॅक बॉक्सची स्थिती, विमानात अतिरिक्त इंधन होते का, अपघाताच्या शेवटच्या क्षणी ट्रान्सपॉन्डर […]

अधिक वाचा..

महाविकास आघाडीत राज्यसभा जागेवरून रस्सीखेच; ठाकरेंकडून महिला नेत्याला संधीचे संकेत

मुंबई: मार्च महिन्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत (MVA) एकाच जागेवरून चुरस निर्माण झाली आहे. या जागेवर आपला दावा असल्याचे सांगत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. पक्षाकडे सर्वाधिक 20 आमदार असल्याचा दावा करत ही जागा शिवसेनेकडेच यावी, अशी भूमिका मांडली जात आहे. दुसरीकडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस देखील या जागेसाठी […]

अधिक वाचा..

अधिवेशनकाळात एकनाथ शिंदे यांच्या खात्यांची तात्पुरती फेरवाटप; कारण काय?

मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःकडे असलेली काही महत्त्वाची खाती शिवसेनेतील इतर मंत्र्यांकडे तात्पुरत्या स्वरूपात सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र पाठवले आहे. कोणाकडे कोणते खाते? पत्रानुसार पुढीलप्रमाणे जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत: सार्वजनिक बांधकाम विभाग – दादा भुसे नगरविकास मंत्रालय – उदय सामंत गृहनिर्माण विभाग […]

अधिक वाचा..