उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीला कंटाळून ७० ते ७५ टक्के खासदार, आमदार पक्ष सोडणार

मुंबई: उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीला कंटाळून लवकरच अनेक आमदार पक्षाला निरोप देतील. ठाकरे गटाचे ७० ते ७५ टक्के खासदार आणि आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत, असा दावा शिवसेनेचे,(शिंदे गट,)उपनेते संजय निरुपम यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केला. ठाकरे बंधूंवर टीका करताना म्हटले की, उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी काँग्रेसशी युती करून बाळासाहेबांच्या विचारांविरुद्ध पाऊल उचलले आहे. त्याच […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राचा नेता उपराष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत आघाडीवर

मुंबई: जगदीप धनखड उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर देशाचे नवे उपराष्ट्रपती कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार संभाव्य नावामध्ये महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. जर बागडे यांची या पदासाठी निवड झाली तर ते या पदावर […]

अधिक वाचा..

ED ने सर्व मर्यादा ओलांडल्या, हे असं चालू देऊ शकत नाही; सरन्यायाधीशांनी कठोर शब्दांत फटकारले

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालय (ED) सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, हे असं चालू देऊ शकत नाही,” अशा कठोर शब्दांत आज सर्वोच्च न्यायालयाने ईडीला फटकारले.वकिलांनी त्यांच्या क्लायंटना दिलेल्या सल्ल्यांवरून त्यांना समन्स पाठवण्यात आल्याच्या प्रकरणावर सुनावणी करताना सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी हे तीव्र निरीक्षण नोंदवलं.सरन्यायाधीशांनी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि अ‍ॅडिशनल सॉलिसिटर जनरल एस.व्ही. राजू यांना सुनावले […]

अधिक वाचा..

उपराष्ट्रपतींनी दिला तडकाफडकी राजीनामा, ‘त्या’ एका प्रस्तावामुळे सरकार चिंतेत

मुंबई: देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घटना रविवारी घडली. देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. ऑगस्ट 2028 पर्यंत त्यांचा कार्यकाळ असतानाही त्यांनी 21 जुलै 2025 रोजी राजीनामा सादर केला. त्यांनी आपल्या पत्रात प्रकृतीच्या कारणांचा उल्लेख केला असला, तरी हा राजीनामा काही प्रस्तावामुळे सरकारची नाराजी वाढल्याचा परिणाम आहे, अशी जोरदार चर्चा राजकीय […]

अधिक वाचा..

ठाकरे ब्रँड संपणार नाही.! मंत्री प्रताप सरनाईक यांचे धक्कादायक विधान

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात भाषण करताना उद्धव ठाकरे यांना सत्तेत येण्याचे आवाहन केले होते. त्यापाठोपाठ आता परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात, असे सूचक विधान केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी एकीकडे भाषेचा वाद सुरू असताना दुसरीकडे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच […]

अधिक वाचा..

कृषिमंत्री कोकाटेंचा खुलासा अयोग्यच, सुनील तटकरे स्पष्टच बोलले

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्यासंदर्भात निवेदन देणाऱ्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना, राष्ट्रवादी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली होती. यात छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे पाटील यांचाही समावेश होता. या घटनेनंतर सुनील तटकरे यांनी धाराशीव येथे छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात विजय डिंबर यांना पंचायत समितीची उमेदवारी द्या…

मच्छीमार समाज आणि युवक वर्गाची एकमुखी मागणी  शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील यशस्वी उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आणि काँग्रेसचे निष्ठावान नेते विजय रामचंद्र डिंबर यांना आगामी पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी काँग्रेस कार्यकर्ते, युवक, ग्रामस्थ व विशेषतः मच्छीमार समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. विजय डिंबर यांनी NSUI पासून राजकीय वाटचालीला सुरुवात करत युवक […]

अधिक वाचा..

आधी कृषीमंत्र्यांचा राजीनामा घ्या, मगच लातूरात पाय ठेवा! छावा संघटनेचा मुख्यमंत्र्यांना इशारा..

लातूर: विधीमंडळ अधिवेशनात मोबाईलवर रमी खेळणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा आधी राजीनामा घ्या, मगच लातूरमध्ये पाय ठेवा, असे आवाहन अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 26 जुलै रोजी लातूर दौऱ्यावर येत आहेत. त्याआधीच त्यांनी कृषीमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा आम्ही त्यांना लातूरमध्ये पाय ठेवू देणार […]

अधिक वाचा..

अजितदादा असे गुंड सांभाळाल तर राष्ट्रवादी रसातळाला जाईल

विजय घाटगेंचा हललाबोल, मनोज जरांगेंसह बच्चू कडूंचा फोन लातूर: अखिल भारतीय छावा संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याचं पाहायला मिळालं. कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी छावा संघटनेनं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंना निवेदन दिलं. यावेळी त्यांच्या टेबलावर पत्ते फेकण्यात आले. नंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष […]

अधिक वाचा..

सुनील तटकरेंनीच मराठा द्वेषातून छावा कार्यकर्त्यांवर हल्ला घडवून आणला; मनोज जरांगे पाटील

वडीगोद्री: छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा हात असल्याचा गंभीर आरोप मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज (दि.२१) केला आहे. अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, आम्हाला शंका आहे की हा हल्ला तटकरे यांनीच घडवून आणला आहे. यातून त्यांच्या मनातील मराठा द्वेष […]

अधिक वाचा..