काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’ला मिळणाऱ्या प्रतिसादाने भाजपाला भरली धडकी…

मुंबई: देशाची एकता व अखंडता अबाधित रहावी यासाठी काँग्रेस नेते खा. राहुलजी गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा सुरु केली असून या यात्रेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद पाहून भारतीय जनता पक्ष बिथरला आहे. राहुलजींच्या टीशर्टच्या किंमतीसारखे टुकार मुद्दे भाजपाला काढावे लागत असून यातूनच ‘भारत जोडो यात्रे’ मुळे […]

अधिक वाचा..

शिंदे सरकार हे फक्त घोषणा सरकार: महेश तपासे

मुंबई: शिंदे सरकारने ‘आत्महत्यामुक्त’ महाराष्ट्र करु अशी घोषणा केली त्याचदिवशी एका शेतकऱ्याने विधानभवन परिसरामध्ये पेटवून घेतले. दुसरीकडे शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली मात्र अद्याप मदत मिळालेली नाही. ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी महाविकास आघाडीने केली त्याकडे दुर्लक्ष केले. हे शिंदेसरकार फक्त घोषणा सरकार आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी […]

अधिक वाचा..

शिंदे गटाने प्रथम न्यायालयाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दयावे: अंबादास दानवे

जालना: देशाच्या सरन्यायाधीशांनी शिंदे गटाला ‘तुम्ही कोण आहात’ असा प्रश्न विचारला आहे. त्यामुळे त्यांनी आधी त्या प्रश्नाचे उत्तर दयावे, त्यानंतर इतर प्रश्नांचा निकाल लागेल. शिवसेनेचा आणि निवडणुकांचा धसका घेतल्याने त्यांनी रिट याचिका दाखल केली असल्याची सडकून टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर केली. जालना येथे ते माध्यमांशी बोलत होते. याशिवाय शिंदे गटाने […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात पुरात वाहून जाणाऱ्याला वाचवण्यासाठी माजी उपसरपंचांची बाजी

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) सह परिसरात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस झालेला असताना सणसवाडी येथे चक्क ढगफुटी सदृश पाऊस झाला. यावेळी चक्क नागरिकांच्या घरात्ब पाणी घुसून शालेय मुलांच्या पुस्तकांसह साहित्यांचे तसेच खते विक्रेत्या दुकानदाराच्या गोडाऊन मध्ये पाणी गेल्याने खतांचे नुकसान झाले. मात्र यावेळी ओढ्याला पूर आल्याने पाण्यात वाहून जाणाऱ्या इसमाला वाचवण्यासाठी माजी उपसरपंच […]

अधिक वाचा..

एखाद्याचा अश्वमेध रोखल्यावर जो त्रास होतो तोच त्रास…

मुंबई: एखाद्याचा अश्वमेध रोखल्यावर जो त्रास होतो तो त्रास शरद पवार साहेबांच्या बारामतीत भाजपला होतोय असा जबरदस्त टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला आहे. जयंत पाटील यांनी भाजप आणि भाजप नेत्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. बारामतीमधील जनता कशी आहे याची माहिती असून त्यामुळे कुणीही बारामतीत आले तरी एक लाखापेक्षा […]

अधिक वाचा..

बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकण्याचे भाजपचे स्वप्न हे स्वप्नच राहणार…

मुंबई: संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांचा बारामती लोकसभा मतदारसंघ काबीज करु आणि त्यांचा पराभव करु, असे स्वप्न भाजपचे लोक बघत असून त्यांचे हे स्वप्न स्वप्नच राहणार आहे, असे थेट प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ काबीज करु असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते त्या […]

अधिक वाचा..

…म्हणुन शेकडो पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

मुंबई: वंचित बहुजन आघाडी व MIM पक्षातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सोमवार (दि.5) सप्टेंबर रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत गांधी भवन येथील कार्यक्रमात काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी आमदार वजाहत मिर्झा, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार उपस्थित होते. काँग्रेस पक्ष हा सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष असून काँग्रेस […]

अधिक वाचा..

अमित शहांना गणराया देश हिताचे काम करण्याची सदबुद्धी देवो: नाना पटोले

मुंबई: सध्या देशातील परिस्थिती चिंतेची असून विविधतेत एकता असलेल्या देशात आज द्वेषाचे, विषमतेचे बिज पेरले जात आहे. देशाची अखंडता धोक्यात आली आहे. महागाई, बेरोजगारीसारखे प्रश्न बिकट झाले आहेत. परंतु केंद्रातील मोदी सरकार या ज्वलंत प्रश्नांकडे दुर्लक्ष करुन इतर मुद्दे पुढे केले जात आहेत. देशाची अखंडता अबाधित रहावी यासाठी काँग्रेस पक्ष राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली ७ […]

अधिक वाचा..

मोठी बातमी! ठाकरे गट आणि शिंदे गटात तुफान राडा, पोलिसांकडून लाठीमार

बुलढाणा: ठाकरे गटातील आणि शिंदे गटातील भांडण आता मुद्द्यांवरुन गुद्यांवर पोहोचल्याची खळबळ जनक बातमी बुलडाण्यात घडली आहे. बुलडाणा एपीएमसीमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात तुफान राडा झाला. एपीएमसीमध्ये सुरु असलेल्या कार्यक्रमावर शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी हल्ला केला. याठिकाणी नवनियुक्त कार्यकर्त्यांचा सत्कार समारंभ सुरु होता. यात ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख यांच्यासह उपनेते लक्ष्मण वडले […]

अधिक वाचा..

अंबादास दानवे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची घेणार भेट…

संभाजीनगर: शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. सत्तेत आल्यावर राजकारण करण्यात व्यस्त असलेल्या सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असल्याचा गंभीर आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी विरोधी पक्षनेते दानवे हे रविवार (दि. ४) सप्टेंबर रोजी बीड जिल्ह्याच्या […]

अधिक वाचा..