महाविकास आघाडीचा मोर्चा हा सरकारला धडकी भरवणारा असेल…

सांगली: राज्यपाल व भाजपचे लोक महापुरुषांबाबत अनुउद्गार काढत आहेत. राज्यातील मंत्री खालच्या पातळीवर बोलून महापुरुषांच्या कार्याचा अपमान करत आहेत. आज महाराष्ट्रात प्रचंड बेरोजगारी आहे. यावर तोडगा न काढता बेरोजगारीवर अधिक भर घालण्याचे काम राज्यातील शिंदे टोळी आणि भाजपचे सरकार करत आहे त्यामुळेच उद्याचा महाविकास आघाडीचा महामोर्चा हा सरकारला धडकी भरवणारा असेल असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी […]

अधिक वाचा..

‘डिक्की’ने नवउद्योजक निर्माण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेऊन कार्य करावे

मुंबई: केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘स्टँड अप इंडिया’ या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी ‘डिक्की’तर्फे स्वावलंबन संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. देशहितासाठी नवीन उद्योजक निर्माण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेऊन कार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (डिक्की) तर्फे ‘स्टँड अप इंडिया’अंतर्गत स्वावलंबन संकल्प अभियानाचे आयोजन करण्यात […]

अधिक वाचा..

नामदार एकनाथ शिंदे साहेब आमच्यावरील अन्याय दूर करावा!

मुंबई: माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन आपणांस पाच महिने झाले आणि या पाच महिन्यात अतिशय महत्वाकांक्षी असा ” हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी” नागपूर मुंबई या महामार्गाच्या महत्वाच्या टप्प्याचे जंगी लोकार्पण सुद्धा केले. त्याबद्दल आपले मनापासून, अगदी अंतःकरणापासून अभिनंदन ! अशीच दमदार, दैदिप्यमान अशी जोरदार वाटचाल होवो आणि राज्याची भरभराट होवो हीच […]

अधिक वाचा..

जातेगाव बुद्रुकला खाजगी कार्यक्रमात शालेय मुले वेठीस

शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील संभाजीराजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे राजकीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एका खाजगी कार्यक्रमासाठी शालेय मुलांना तब्बल 3 ते 4 तास वेठीस धरल्याचा प्रकार नुकताच घडला आहे. जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील संभाजीराजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे नुकतेच एका प्रशासकीय अधिकाऱ्याचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला […]

अधिक वाचा..

आता सरपंच किंवा सदस्य होण्यासाठी ‘इतकं’ शिक्षण लागणारच

पुणे: ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच होण्यासाठी उमेदवार किमान *सातवी पास* असण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला असून गावाचे कारभार पाहण्यासाठी शैक्षणिक अर्हतेची मर्यादा घालण्यात आली आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाने सरपंच अथवा सदस्यांचा शैक्षणिक अर्हतेबाबत आदेश जारी केल्यानुसार, 1 जानेवारी 1995 नंतर जन्मलेल्या व्यक्तीला ग्रामपंचायत सरपंच अथवा सदस्य होण्यासाठी किमान *सातवी पास* असणे आवश्यक आहे. सातवी पासचे […]

अधिक वाचा..

बाळासाहेबांची शिवसेना शिरुर -आंबेगाव युवासेना प्रमुखपदी अमोल पोकळे

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे युवा उपतालुकाप्रमुख म्हणून अमोल पोकळे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्तीपत्र शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील यांनी दिले आहे. लोकसभा मतदारसंघातील सर्व युवासेना पदाधिकारी युवा सैनिक यांची बैठक नुकतीच आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत लांडेवाडी ता. आंबेगाव या ठिकाणी पार […]

अधिक वाचा..

अरे शिवरायांचा इतिहास आठवा, भगतसिंग कोश्यारीच पार्सल घरी पाठवा

मुंबई: अरे शिवरायांचा इतिहास आठवा, भगतसिंग कोश्यारीचं पार्सल घरी पाठवा. काळ्या टोपीचं करायचं काय, खाली डोकं वर पाय… तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय… राज्यपाल हाय हाय… अशा गगनभेदी घोषणा देत मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी सीएसएमटी येथे जोरदार आंदोलन केले. राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून आज […]

अधिक वाचा..

घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष पदी ऋषीराज पवार बिनविरोध

शिरुर: घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष पदी ऋषीराज अशोक पवार यांची तर उपाध्यक्ष पदी पोपट भुजबळ यांची बिनविरोध निवड झाली. रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अशोक पवार यांच्या शेतकरी विकास पॅनलने घवघवीत यश मिळविले. पॅनेलचे प्रमुख या नात्याने आमदार ॲड. अशोक पवार हेच कारखान्याचे अध्यक्ष होतील, असे गृहित धरले जात असतानाच अनपेक्षितपणे रावसाहेबदादा […]

अधिक वाचा..

जितेंद्र आव्हाडांवर जाणूनबुजून व सुडबुद्धीने विनयभंगाची कारवाई…

मुंबई: आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर जाणूनबुजून व सुडबुद्धीने विनयभंगाची कारवाई करण्यात आली असून जितेंद्र आव्हाड यांच्या पाठीशी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली. कळवा – मुंब्रा उड्डाण पुलाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांवर श्रेयवादाची टिका केली होती त्यातूनच ही कारवाई झाली आहे असेही महेश तपासे म्हणाले. […]

अधिक वाचा..

मोठी बातमी! ठाकरेंची तोफ पुन्हा धडाडणार; संजय राऊतांचा जामीन अखेर मंजूर

मुंबई: पत्राचाळ प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांना पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. १०० दिवसानंतर राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायलयीन कोठडीत गेल्या १०० दिवसापासून होते.संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी […]

अधिक वाचा..