मुख्यमंत्री शिंदेना महाराष्ट्रात वेदांत फॉक्सकॉन टिकवता आले नाही…

मुंबई: वेदांत फॉक्सकॉनने महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्ये २० अब्ज डॉलरचा प्रकल्प उभारत असल्याचे समोर आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे हित साधत आहेत की गुजरातचे हित साधत आहेत, असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. महाराष्ट्रातील मागील महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र राज्यात गुंतवणुकीसाठी वेदांत फॉक्सकॉनशी योग्य संवाद व चर्चा सुरु केली होती […]

अधिक वाचा..

स्वातंत्र्य सैनिकांना भेटण्यास सरकारकडे वेळ नसणे हे वेदनादायी…

मुंबई: स्वातंत्र्य सैनिकांना सन्मान हा मिळायलाच हवा, मात्र आज सत्ताधारी हे वेगवेगळ्या कामात गुंतले आहेत. त्यांना जनतेशी देणंघेणं नाही. त्यामुळे त्यांना गेल्या 3 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे पाल्य यांनाही भेटण्यासाठी वेळ नसणे हे वेदनादायी असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्य सैनिक तक्रार निवारण समितीचे पदाधिकारी […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पुन्हा लांबणीवर…

मुंबई: राज्यातील २५ जिल्हा परिषदा व २८३ पंचायत समित्यांवरील प्रशासकांच्या नियुक्तीचा कालावधी आणखी काही महिने वाढविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने सोमवार (दि. 12) रोजी घेतला. त्यामुळे या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुका आणखी काही काळ लांबणीवर पडणार आहेत. राज्यातील २५ जिल्हा परिषदांच्या व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांचा कालावधी मार्च २०२२ मध्ये संपलेला आहे. परंतु आधीच्या […]

अधिक वाचा..

दिल्लीकरांच्या नादाला लागून गद्दारी करणाऱ्यांनी शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये…

मुंबई: १९९३ साली दंगल झाली तेव्हा मुंबई शिवसेनेने वाचवली, बाबरी मशीद पडली त्याची जबाबदारी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उचलली होती. त्यामुळे शिवसेनाप्रमुख यांच्या शिवसेनेविषयी बोलण्याच व ती फोडण्याच पाप ज्यांनी दिल्लीकरांच्या नादाला लागून केल. त्या शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांनी शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये, असा हल्लाबोल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांनी पैठण येथील सभेत […]

अधिक वाचा..

पक्षाने मला बोलायला सांगितलं होत पण नेमक काय झालं?

मुंबई: दोन वर्षाच्या कालावधीनंतर दिल्लीमध्ये राष्ट्रवादीचं राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं. त्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भाषणाची संधी हुकल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं होत. त्यानंतर आता स्वतः अजित पवार यांनी घडलेल्या प्रकारावर भाष्य करत पक्षावर नाराज नसल्याचे स्पष्ट केले आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांनी याबाबतचा खुलासा केला. दिल्लीत घडलेल्या प्रकारानंतर तुम्ही […]

अधिक वाचा..

सत्ता तर ओरबाडून घेतली पण कामाचा मात्र अजूनही पत्ता नाही…

पुणे: सत्ता ओरबाडून घेतली, मात्र कामाचा अजून पत्ता नाही, अशी टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस यांच्यावर केली आहे. पुरंदर तालुक्यातील राजेवाडी भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी त्यांनी केली. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. गणेशोत्सवात गणेश मंडळांना मुख्यमंत्री भेट देत होते. आता त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर पण जावे, असा […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी नवा फंडा?

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 12 सप्टेंबरला औरंगाबाद दौऱ्यावर येत असून पैठण येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. मात्र त्यांच्या दौऱ्यापूर्वी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी काढलेल्या एका पत्रामुळे खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री यांच्या पैठणमध्ये होणाऱ्या सभेला सर्व पर्यवेक्षिका तसेच 42 गावातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी सभेला उपस्थित राहण्याच्या सूचना बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे राजकीय […]

अधिक वाचा..

शिवसैनिक हेच शिवसेनेचं ब्रम्हास्त्र…

मुंबई: शिवसैनिक हेच शिवसेनेचं ब्रम्हास्त्र आहे हे पुन्हा एकदा प्रभादेवी येथील घडलेल्या प्रकरणावरुन अधोरेखित झालं आहे. आमदार सदा सरवणकर बंदुकीचा धाक दाखवत असताना देखील निर्भीडपणे सामोरे गेलेल्या शिवसैनिकांच्या पाठीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कौतुकाची थाप दिली. पोलिसांनी या शिवसैनिकांना सोडल्यानंतर थेट मातोश्री येथे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्र्यांच्या सभेला पैसे देऊन गर्दी जमवण्याचा प्रयत्न: अंबादास दानवे

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची १२ तारखेला संभाजीनगरला सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र या सभेला प्रतिसाद मिळणार नाही हे माहित असल्याने मंत्री संदीपान भुमरे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना कामाला लावले आहे. लोकांनी सभेला उपस्थित रहावे म्हणून त्यांना पैसे दिले जात आहेत, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. मुंबईत आज आयोजित पत्रकार […]

अधिक वाचा..

सुनावणी सुरु असताना मुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावर बसणे संकेतांना धरुन नाही…

मुंबई: सर्वोच्च न्यायालयाच्या घटना पीठासमोर सुनावणी सुरु असताना मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांसोबत एका व्यासपीठावर बसणे हे संकेतांना धरुन नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारच्या वैधतेची गंभीर सुनावणी सुरु आहे, असे असताना मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांसोबत […]

अधिक वाचा..