कारणे
जास्तच खाणे, जेवणानंतर लगेच झोपणे, दिवसा झोपणे, जेवणानंतर लगेच जास्त प्रमाणात पाणी पिणे, चमचमीत खाणे, आळस करणे, चरबीयूक्त पदार्थ/गोड पदार्थ जास्तच खाणे, व्यायाम न करणे, पोट साफ नसणे. रात्रीचे जेवण जास्तच घेणे. इ.
उपाय
१) वरील कारणे कमी करा. उपवास करा, हालका आहार घ्या.
२) फारच भूक लागत असेल तर लाह्या, चुरमूरे, चणे खा. थोडसं दूध प्या.
३) नियमित सूर्यनमस्कार/प्राणायाम/योगासने करा.
४) वारंवार गरम/कोमट पाणी काही दिवस प्या.
५) सकाळी कोमट पाणी + मध + लिंबू रस प्या. वजन कमी होते.
६) रात्रीचे जेवण हळूहळू कमी करत काही दिवसांनी बंद करा. त्याऐवजी हालका आहार घ्या. किंवा संध्याकाळी सातच्या आत जेवण करा.
७) जास्तीत जास्त शाकाहारी रहा. एका वेळी एकच भाजी खा. कारण अन्न खाऊन वजन वाढण्याचे प्रमाण कमी आहे. तर जास्त भाज्या खाऊन वजन वाढते.
८) एकाचवेळी भरपेट खाऊ नका. भूक लागेल तेव्हा थोडे थोडे खा.
९) जेवणापूर्वी थोडे पाणी प्या. निम्मे जेवण झाल्यावर थोडे पाणी प्या. जेवण पूर्ण झाले की, थोडे पाणी प्या. मात्र जेवण पूर्ण झाल्यावर लगेच जास्त पाणी प्यायल्यास १००% वजन व पोट वाढते.
१०) स्वतःची कामे स्वतःच करा.
११) जेवताना बोलू नका.
१२) ओट बंद करून चावत रहा. नंतरच तोंडातील पदार्थ गिळा.
१३) सँलड ( कच्चे ) खा.
१४) रोज अर्धा तास पायी चाला.
१५) सकाळी रिकाम्यापोटी १० ते १२ श्वासावर सूर्यनमस्कार घाला.
१६) वरील जेवढे शक्य आहे तेवढे तरी करा. एकाचवेळी सर्व उपाय करू नका.
(सोशल मीडियावरून साभार)