पाणी म्हणजे जीवन. मानवी शरीरामध्ये ६० ते ७० टक्के पाणी असते. निरोगी आरोग्यासाठी दिवसभरात किमान थोडे थोडे करून ३ ते ४ लिटर पाणी प्यायलाच पाहिजे. नियमित आणि योग्य प्रमाणात पाणी पिल्यामुळे शरीरातील अतिरिक्त विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. परंतू गरजेपेक्षा अति पाणी पिल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो.
आजारांपासून बचाव: योग्य प्रमाणात पाणी पिल्यामुळे शरीर हायड्रेट तर राहतेच शिवाय विविध आजारांपासून बचावही होतो.
किडनीची समस्या: जास्त प्रमाणात पाणी प्यायल्याने किडनीच्या कार्यावर परिणाम होतो. जर किडनी संबंधित आजार असतील, तर डॉक्टरांच्या सल्लाने योग्य प्रमाणात पाणी प्यावे.
ह्रदयाचा धोका: कमी कालावधित गरजे पेक्षा जास्त पाणी पिल्यामुळे ह्रदय बंद पडण्याचा धोका असतो. त्यामुळे दिवसभरात थोडे थोडे करून पाणी प्यायला हवे.
ओव्हर हायड्रेशन: जास्त पाणी प्यायल्याने ओव्हर हायड्रेशनचा त्रास होवू शकतो. यामुळे लघवीचा रंग बदलू शकतो.
वारंवार लघवीला येणे: सर्वात महत्त्वाचे म्हणजे अती पाणी पिल्याने वारंवार लघवीला जाण्याची समस्या उद्भवते. दिवसभरात ६-७ वेळा लघवी होणे सामान्य असते.
(सोशल मीडियावरून साभार)