शरीरात पाण्याची सर्वात जास्त गरज असते कारण…

आरोग्य
१) फिट राहण्यासाठी दररोज ८ ते १२ ग्लास (३ लिटर  पाणी) प्यावे. पाण्यामुळे शरीरातील घातक द्रव्ये(टोक्सीन) बाहेर टाकले जाते.
2) झोपून उठल्यानंतर १-२ ग्लास पाणी पिल्याने पोट साफ होते. आयुर्वेदानुसार जेवतेवेळी पाणी पियू नये.
३) कोणतेही पदार्थ खाण्याच्या १ तास अगोदर पाणी  प्यावे व जेवण  झाल्यावर १ तासानंतर पाणी प्यावे  यामुळे  अन्न  लवकर पचते आणि शरीरात चरबी होत नाही
४) वजन जास्त असलेल्या लोकांनी जेवणाच्या आधी १ते २ ग्लास पाणी पिल्यास जेवण कमी जाते आणि वजन  वाढण्याचे प्रमाण  कमी होते
५) पाण्यामुळे आपल्या शरीरातील रूक्षता (ड्रायनेस) कमी होतो. नारळ पाणी हे त्यात उत्तम ऊर्जा प्राप्त करुन देते.
६) पाण्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होत नाही. त्वचेच्या  समस्या होत नाही. पाण्यामध्ये शून्य कॅलरी असते. लठ्ठपणापासून मुक्ती मिळते.
7) टरबूज ,स्ट्रोबेरी,नारळपाणी संत्री ,मोसंबी या सारखी  फळे पाण्याची कमतरता दूर करतात. यातून भरपूर उर्जा प्राप्त होते
8) भरपूर पाणी पिल्याने किडनी स्टोनचा त्रास होत नाही. पाणी हा आपला दिवसभराचा थकवा दूर करतो.
9) दररोज कोमट पाणी पिल्याने वजन हळूहळू कमी होते. तसेच वात होत नाही. व्यायाम करताना किंवा  जिममधे वर्क आउट करताना थोडया अंतराणे पाणी घ्या.