वक्फ विषयावरील सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाचे नसीम खान यांनी केले स्वागत 

महाराष्ट्र

मुंबई: गेल्यावर्षी भाजप सरकारने बहुमतांच्या जोरावर संविधानाच्या विरुद्ध वक्फ सुधारणा कायदा लोकसभा व राज्यसभेत पास करून घेतला होता. या कायद्याविरुद्ध मा. सर्वोच्च न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.

सर्वोच्च न्यायालयाने सुधारणा कायद्याच्या अनेक विषयावर स्थगिती देत अंतरिम आदेश दिला आहे. या आदेशाचे कॉँग्रेस कार्य समिति सदस्य व माजी मंत्री नसीम खान यांनी स्वागत केले आहे. नसीम खान यांनी म्हटले की, आजच्या निर्णयामुळे हे स्पष्ट झाले आहे की, मोदी सरकार केवळ बहुमताच्या बळावर संविधानाच्या विरुद्ध अशा प्रकारचे निर्णय घेत आहे.