चाकणच्या समस्यांवर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; ३१ ऑगस्टपर्यंत खड्डे बुजविण्याचे निर्देश

पुणे : चाकण परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खड्डे, अतिक्रमणे, कचरा व्यवस्थापन, पार्किंग आणि सुरक्षेच्या प्रश्नांवर आता प्रशासनाने ॲक्शन प्लॅन तयार केला आहे. चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी गठित उच्चस्तरीय समितीच्या कामकाजाचा आढावा घेताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी संबंधित सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करून प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याच्या सूचना दिल्या. शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीला खेड-आळंदीचे […]

अधिक वाचा..

VJTI वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या समस्यांवर ॲड. अमोल मातेले आक्रमक; प्रशासनाला ७ दिवसांचा अल्टीमेटम

मुंबई : वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (VJTI), माटुंगा येथील वसतिगृहातील अस्वच्छता, दूषित पिण्याचे पाणी, बंद वॉटर कूलर व गीझर, उघड्या विद्युत वायरी आणि अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते ॲड. अमोल मातेले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत ॲड. मातेले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने VJTI चे संचालक डॉ. सचिन कोरे यांची […]

अधिक वाचा..

पोषण आहारावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या अंगणवाडी सेविकेवर कारवाई; आंबेगावात प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न

पुणे : आंबेगाव तालुक्यात अंगणवाडीतील चिमुकल्यांना आणि स्तनदा मातांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या दर्जावर प्रश्न उपस्थित करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या अंगणवाडी सेविकेवर प्रशासनाने कारवाई केली आहे. रेश्मा पारधी असे संबंधित सेविकेचे नाव असून, त्यांना सेवेतून कमी करण्याची कारवाई करण्यात आली आहे. रेश्मा पारधी यांनी अंगणवाडीत दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत आक्षेप नोंदवत व्हिडिओ […]

अधिक वाचा..

हजारो कोटींचा खर्च, तरीही कचऱ्याचा विळखा; मुंबईला आता परिणामकारक प्रशासनाची गरज

मुंबई : मुंबईच्या स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण आणि पर्यावरण संरक्षणासाठी दरवर्षी हजारो कोटी रुपयांचा निधी खर्च केला जात असला, तरी नागरिकांच्या दैनंदिन जीवनात अपेक्षित बदल दिसत नसल्याची खंत शिवसेना पक्षाचे राष्ट्रीय सह समन्वयक व प्रसार माध्यम समन्वयक दिनेश शिंदे यांनी व्यक्त केली आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून तिच्या विकासासोबत कचरा, प्रदूषण, तुंबणारे नाले, […]

अधिक वाचा..

मुंबई विद्यापीठाच्या CDOE कारभाराविरोधात राष्ट्रवादीचा एल्गार; ७ दिवसांत निकाल जाहीर न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

निकालात विलंब, सामूहिक नापास, मोफत पुनर्तपासणी आणि दोषींवर कारवाईची मागणी; ॲड. अमोल मातेले यांचे विद्यापीठ प्रशासनाला निवेदन. मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या (CDOE/IDOL) कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रदेश प्रवक्ते ॲड. अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शुक्रवारी CDOE संचालकांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत निवेदन सादर […]

अधिक वाचा..

अमरावतीच्या पूरस्थितीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे लक्ष; प्रशासनाला सतर्कतेचे आदेश

मुंबई: अमरावती जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्या-नाल्यांना पूर आला असून काही गावांचा मुख्य रस्त्यांशी संपर्क तुटला आहे. पूरपरिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाने मदत व बचावकार्याला वेग दिला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून जिल्ह्यातील पूरस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. नागरिकांच्या […]

अधिक वाचा..

डिजिटल परिवर्तनामुळे तंत्रशिक्षण प्रशासन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम; ई-गव्हर्नन्स पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई: राज्यातील तंत्रशिक्षण क्षेत्रात प्रशासन अधिक पारदर्शक, कार्यक्षम, उत्तरदायी आणि डेटा-आधारित करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आलेल्या विविध डिजिटल उपक्रमांची माहिती देणाऱ्या ‘ई-गव्हर्नन्स’ पुस्तिकेचे प्रकाशन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री Chandrakant Patil यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमांमुळे राज्यातील सुमारे २,२०० तंत्रशिक्षण संस्था, ६ हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी आणि लाखो विद्यार्थ्यांना थेट लाभ होत आहे. गेल्या तीन वर्षांत […]

अधिक वाचा..

परिवहन विभागाच्या कारभारावर काँग्रेसचा हल्ला; मंत्री प्रताप सरनाईक यांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई: राज्यात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने परिवहन विभागावर जोरदार टीका करत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी याबाबत निवेदन जारी करून राज्य सरकार रस्ता सुरक्षेबाबत पूर्णतः अपयशी ठरल्याचा आरोप केला. मुरबाड–कल्याण मार्गावरील इको कार अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या ११ जणांना काँग्रेसकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. […]

अधिक वाचा..

युद्धजन्य पार्श्वभूमीवर शिरूरमध्ये एलपीजी-इंधन साठ्याचा आढावा; टंचाई नसल्याचे प्रशासनाचे स्पष्टीकरण

शिरूर (अरुणकुमार मोटे): जगभरातील विविध भागांत निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन शिरूर महसूल प्रशासनाने एलपीजी गॅस व इंधन साठ्याचा आढावा घेतला. शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व पुरवठा नायब तहसीलदार सदाशिव व्हणमाने यांनी तहसील कार्यालयात तालुक्यातील एलपीजी गॅस वितरक, पुरवठा विभागाचे अधिकारी आणि प्रशासनातील संबंधित यंत्रणांची तातडीची बैठक घेऊन सद्यस्थितीचा आढावा घेतला. बैठकीत […]

अधिक वाचा..

निमोणे गावठाणात गावठी दारुचा सुळसुळाट; प्रशासनाच्या नाकावर टिच्चून अनधिकृत विक्री सुरु 

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या निमोणे गावठाण हद्दीत अनधिकृतरीत्या गावठी दारूची विक्री सुरुचं असल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गावठाण भागात उघडपणे सुरू असलेल्या या बेकायदेशीर धंद्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, तर तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकत असल्याची धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. गावठाणातच ‘दारुचे अड्डे’…? स्थानिक […]

अधिक वाचा..