मुंबई मेट्रोत युवक काँग्रेसची NEET पेपरफुटीविरोधात जनजागृती मोहीम; भाजप सरकारवर गंभीर आरोप

मुंबई : मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबई युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुंबई मेट्रोमधून प्रवास करत NEET पेपरफुटी प्रकरणाविरोधात व्यापक जनजागृती मोहीम राबवली. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या पेपरफुटी रॅकेटविरोधात संताप व्यक्त करत भाजप सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला. मुंबई मेट्रोमध्ये प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांपर्यंत पोहोचत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी NEET पेपरफुटी […]

अधिक वाचा..

परिवहन विभागात बदली-वसुली रॅकेटचा आरोप; निलंबित अधिकाऱ्यांचा सहभाग? चौकशीची मागणी

मुंबई: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी परिवहन विभागातील कथित भ्रष्टाचार आणि छळवणुकीच्या गंभीर प्रकरणाचा पर्दाफाश करत मोठे आरोप केले आहेत. आरटीओ विभागातील बदल्या आणि बेकायदेशीर वसुलीसाठी मोठे रॅकेट सक्रिय असून, प्रामाणिक अधिकाऱ्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवले जात असल्याचा दावा त्यांनी केला. वडेट्टीवार यांच्या मते, निवृत्त अधिकारी बजरंग खरमाटे हे या रॅकेटचे प्रमुख सूत्रधार असून, त्यांनी […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादीत नवं राजकीय द्वंद्व! रोहित पवारांचे आरोप आणि सुनेत्रा पवार–नरेश अरोरा यांच्या भेटीने खळबळ

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहे. ज्यांच्यावर रोहित पवार यांनी गंभीर आक्षेप घेतले होते, त्याच नरेश अरोरा यांच्या टीमसोबत सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांनी पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये चर्चा केल्याने पक्षात नव्या चर्चांना उधाण आले आहे. रोहित पवारांचे आक्षेप आणि दावे अजित पवार यांच्या अकाली एक्झिटनंतर तब्बल तेरा दिवसांनी […]

अधिक वाचा..

दिल्लीतील अर्थसंकल्पीय अधिवेशनात पश्चिम बंगालवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप; निर्मला सीतारमण यांची टीका

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, आज लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर दिले. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालमधील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून राज्य सरकारवर टीका करत सभागृहात राजकीय वातावरण तापवले. बजेटमध्ये पश्चिम बंगालचा उल्लेख नसल्याचा टीएमसी खासदार सौगत राय यांनी केलेला आरोप फेटाळून लावताना सीतारमण म्हणाल्या, “पश्चिम बंगालमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे राज्य […]

अधिक वाचा..

राहुल गांधींच्या भाषणावर मोदी सरकारचा अडथळा; हर्षवर्धन सपकाळांचा सरकारवर गंभीर आरोप

मुंबई: चीनच्या सीमेवरील कारवायांबाबत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत महत्त्वाचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला असतानाही मोदी सरकारने त्यांना बोलू दिले नाही. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावर टीका करत सरकारवर संसदेच्या नियमांचे उल्लंघन करून हुकूमशाही पद्धतीने वागल्याचा आरोप केला आहे. टिळक भवन येथे पत्रकारांशी संवाद साधताना सपकाळ म्हणाले, “देशाचे माजी लष्करप्रमुख […]

अधिक वाचा..

बिग बॉस मराठी! चोरीच्या आरोपांवरून घरात रणकंदन; तन्वीचा शो सोडण्याचा इशारा तर…

मुंबई: ‘बिग बॉस मराठी ६’च्या आजच्या भागात घरात पुन्हा एकदा सामान चोरीचा मुद्दा चांगलाच पेटला. दीपालीने सामानाबाबत विचारणा केल्यानंतर विशाल आणि रोशन यांनी प्रभूचा कप्पा तपासला. या कप्प्यातून तांदूळ, पीठ आणि इतर साहित्य सापडल्याने घरात खळबळ उडाली. हे सामान कोणी लपवलं? हा प्रश्न चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. अनुश्रीने तन्वी आणि रुचिता यांच्यावर संशय व्यक्त केला. राकेशने […]

अधिक वाचा..

मनोज जरांगे पाटीलांवर अमोल खुणेचा खळबळजनक आरोप; एसआयटी चौकशी व नार्को टेस्टची मागणी

जालना: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत त्यांचा जुना सहकारी आणि घातपाताच्या प्रयत्न प्रकरणातील संशयित आरोपी अमोल खुणे याने खळबळजनक दावे केले आहेत. नुकतीच जामिनावर सुटका झाल्यानंतर खुणेने जालना पोलीस अधीक्षकांची भेट घेत थेट मनोज जरांगे पाटील आणि स्वतःची एसआयटी चौकशी व नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात […]

अधिक वाचा..

पुण्यात पुन्हा हुंडाबळी! सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; जबरदस्तीच्या गर्भपाताचा गंभीर आरोप

पुणे: वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर राज्यभरात हुंडाबळीच्या घटना सातत्याने समोर येत असतानाच, पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक अत्यंत संतापजनक आणि हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून सातत्याने होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ […]

अधिक वाचा..

शिरुरमधील रुबी हॉल संलग्न हॉस्पिटलवर गंभीर आरोप आयुष्यमान कार्ड असुनही गोरगरीबांची आर्थिक लुट…?

शिरुर (तेजस फडके): शासकीय आयुष्यमान भारत योजना तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे कार्ड असतानाही अपघातग्रस्त गोरगरीब रुग्णांकडुन बळजबरीने हजारो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार शिरुर येथे उघडकीस आला आहे. अपघातग्रस्तांना मोफत उपचार नाकारत हजारो रुपये उकळल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणात शिरुर येथील रुबी हॉल क्लिनिक (ग्रँट मेडिकल फाउंडेशन संलग्न) आणि […]

अधिक वाचा..

घोड धरण परिसरात बेकायदा वृक्षतोडप्रकरणी पाटबंधारे विभागाच्या शाखा अभियंत्यावर गंभीर आरोप

प्रशासकीय यंत्रणेत खळबळ शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील चिंचणी येथील घोड धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदा वृक्षतोड झाल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या प्रकारात पाटबंधारे विभागाचा शाखा अभियंता वैभव काळे हा अधिकारी थेट घटनास्थळी उपस्थित असून झाडे तोडण्याच्या कारवाईत सक्रीय सहभाग घेत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पाहिले आहे. घटनास्थळी काळ्या रंगाची “महाराष्ट्र शासन” अशी […]

अधिक वाचा..