विशेष अधिवेशनाच्या चर्चेने दिल्लीचे राजकारण तापले; राष्ट्रपतींच्या आदेशाची प्रतीक्षा, सरकारच्या हालचालींवर विरोधकांची नजर

नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी स्थगित होऊन १४ दिवस उलटले असतानाही अधिवेशनाच्या सत्रावसानाबाबत राष्ट्रपतींकडून अद्याप अधिकृत आदेश जारी झालेला नाही. त्यामुळे केंद्र सरकार विशेष अधिवेशन बोलावण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना पुन्हा जोर आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी यापूर्वीच याबाबत सूचक विधान केले होते. त्यातच केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू […]

अधिक वाचा..

शाळेजवळ बिबट्याचा वावर; विद्यार्थी, पालकांमध्ये भीतीचे वातावरण

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील शिवतक्रार म्हाळुंगी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ बिबट्याचा वावर आढळून आल्याने पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळेच्या मागील बाजूस मोठ्या प्रमाणात ऊस असल्याने बिबट्याला लपण्यासाठी सुरक्षित अधिवास मिळत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक भरत दौंडकर यांच्या निदर्शनास बिबट्याचा वावर आल्यानंतर अंगणवाडी शिक्षिका लक्ष्मी भोसले […]

अधिक वाचा..

सुनेत्रा पवारांवरील ट्विटचा अपमानाचा हेतू नव्हता; वातावरण तापवण्याचा भाजपचा प्रयत्न; अतुल लोंढे

मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवर करण्यात आलेल्या ट्विटमध्ये त्यांचा अपमान करण्याचा किंवा त्यांना कमी लेखण्याचा कोणताही हेतू नव्हता, असा दावा काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. काही जण राजकीय फायदा मिळवण्यासाठी या मुद्द्याचे भांडवल करून वातावरण तापवत असल्याची टीकाही त्यांनी केली. अतुल लोंढे म्हणाले की, […]

अधिक वाचा..

कान्हूर मेसाई परिसरात बिबट्याचा वाढता वावर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पाबळ: कान्हूर मेसाई आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढल्याने स्थानिक नागरिक, शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतशिवारात तसेच वस्त्यांच्या परिसरात बिबट्या वारंवार दिसत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कान्हूर परिसरातील शेतांमध्ये आणि गावालगतच्या भागात काल रात्री पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे रात्री-अपरात्री शेतीकामासाठी, पाणी भरण्यासाठी […]

अधिक वाचा..

दागिने हिसकावण्याच्या घटना वाढल्या; महिलांमध्ये भीतीचे वातावरण

सांगली: सांगली शहरासह उपनगरांत घराच्या दरवाजावर थाप मारून किंवा बेल वाजवून दार उघडताच महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळ काढण्याच्या घटना वाढल्या आहेत. सकाळी–सायंकाळी फिरायला बाहेर पडलेल्या महिलांनाही लक्ष्य केले जात आहे. ग्रामीण भागातही अशा प्रकारच्या चोरींची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंता आहे. दार उघडण्यापूर्वी खात्री करा बेल वाजल्यानंतर बाहेर कोण आहे, व्यक्ती ओळखीची आहे का, […]

अधिक वाचा..

भेदभाव आणि द्वेषाच्या वातावरणात सौंदळा गावाने एकता, समता आणि बंधुत्वाचा संदेश दिला

अहिल्यानगर जिल्ह्यातील सौंदाळा गावचा जातमुक्तीचा विचार राज्यभर पोहोचला पाहिजे मुंबई: सर्वत्र भेदभाव निर्माण करणारे, द्वेषाचे, भिती दाखवण्याचे वातावरण जाणिवपूर्वक निर्माण केले जात आहे. जातीपातीच्या, धर्माच्या भिंती उभ्या करून माणसा-माणसातील प्रेम, जिव्हाळा संपवला जात आहे. सर्वत्र द्वेषाची भावना वाढीस जात असताना अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदाळा या गावाने ग्रामसभेत जातमुक्तीचा ठराव मंजूर करून एक वेगळा आदर्श […]

अधिक वाचा..

अजित पवार यांच्यासह माजी सदस्यांवरील शोकप्रस्ताव; दुःख एका पक्षाचे नसते, सभागृहात भावनिक वातावरण

मुंबई: महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची आज सुरुवात भावनिक वातावरणात झाली. प्रथेनुसार पहिल्याच दिवशी दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करत शोकप्रस्ताव मांडण्यात आला. यामध्ये माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित अनंतराव पवार यांच्यासह माजी मंत्री सुरुपसिंग नाईक , माजी विधान परिषद सदस्य अशोक मोदक , गंगाधर पाटणे आणि नीला देसाई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला. विधान परिषदेच्या […]

अधिक वाचा..

भक्तीस्थळावर भीषण रहस्य! मायंबा गडावर दोन मृतदेह सापडल्याने भीतीचे वातावरण

बीड: बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सावरगाव येथील प्रसिद्ध मच्छिंद्रनाथ देवस्थान (मायंबा) परिसरात गुरुवारी सकाळी धक्कादायक घटना उघडकीस आली. गडावरील खोल व दुर्गम दरीमध्ये दोन पुरुषांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. यातील एका मृताचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला असून, दुसरा मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आला. गड परिसरात काही स्थानिक नागरिक सरपण […]

अधिक वाचा..

वातावरण तापले! मंगळवेढ्यातील प्रस्थापित नेत्यांना जरांगे-पाटलांचा विसर

मंगळवेढा: मराठा समाजाच्या ज्वलंत प्रश्नावरून मंगळवेढ्यातील प्रस्थापित नेत्यांचे मौन समाज बांधवांना चांगलेच जाणवू लागले आहे. निवडणुका आल्या की ‘एक गठ्ठा मतांसाठी’ मराठा समाजाची आठवण काढणारे हेच नेते, आरक्षणासारख्या अस्मितेच्या प्रश्नावर मात्र अचानक ‘बहिरे’ का झाले आहेत. हा प्रश्न आता समाजामध्ये थेट विचारला जातो आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी उभारलेला आरक्षणाचा लढा हा आज राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, […]

अधिक वाचा..

कृषीमंत्र्यांच्या ‘पत्ते’ प्रकरणानंतर राजकीय वातावरण तापल

पुणे: राज्याच्या राजकारणात सध्या कृषीमंत्र्यांच्या सभागृहातील ‘पत्ते’ खेळण्याच्या प्रकरणावरून जोरदार वादंग सुरू आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान कृषीमंत्री सभागृहात महत्त्वाच्या चर्चेदरम्यान पत्ते खेळत असल्याचा आरोप झाल्यानंतर विरोधी पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी तर या प्रकरणावरून थेट उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरच निशाणा साधला आहे.

अधिक वाचा..