मावळमध्ये दुर्दैवी अपघात; गॅस सिलेंडरच्या टेम्पोखाली सापडून ११ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

  पुणे: पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातून एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या टेम्पोखाली सापडून ११ वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा येथे हा अपघात घडला. ज्ञानेश्वरी मुऱ्हे (वय ११) असे मृत मुलीचे नाव आहे. सोमाटणे फाटा […]

अधिक वाचा..

भटक्या कुत्र्याच्या चाव्याने १२ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; उपचारातील हलगर्जीपणाचा कुटुंबियांचा आरोप

भिवंडी: ज्या वयात हातात खेळणी आणि दप्तर असायला हवे, त्या कोवळ्या १२ वर्षांच्या वयात एका निष्पाप मुलाला मृत्यूने कवटाळले. भिवंडीत भटक्या कुत्र्याच्या चाव्यामुळे गंभीर आजाराने ग्रस्त झालेल्या हामिद खान या चिमुकल्याचा तब्बल २० दिवस मृत्यूशी झुंज देत असताना उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून सरकारी आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील त्या परिसरात दोनदा दुरुस्ती तरीही पुन्हा उखडलेला रस्ता; कोंढणओढ्यात नागरिकांचा संताप

शिरूर दि. २५(अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील शिरूर–मलठण रस्त्यावरील कोंढणओढा परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन वेळा खड्डे भरून दुरुस्ती केल्यानंतरही काही दिवसांतच तोच रस्ता पुन्हा उखडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. लाखो रुपये खर्च करून करण्यात आलेली ही दुरुस्ती दर्जाहीन असल्याचा आरोप होत असून, संबंधित विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या रस्त्यावरून […]

अधिक वाचा..

मुंबईचे लचके तोडले जात आहे, गुजरातच्या दावणीला मुंबईला बांधले जात आहे; विजय वडेट्टीवार 

नागपूर: महाराष्ट्रावर,मुंबईवर अतिक्रमण सुरू आहे. मुंबई बळकावण्याचा, मुंबईला गुजरातच्या दावणीला बांधण्याचे काम सुरू आहे.त्यामुळे मुंबई वाचवण्यासाठी, तिचे रक्षण करण्यासाठी लढले पाहिजे अस काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. नागपुरात माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी महायुती सरकारच्या धोरणावर टीका केली. मुंबईतील जमिनी गिळण्याचे काम सुरू आहे,मुंबईवर गुजरातचे नियंत्रण आता दिसू लागले आहे.त्यामुळे मराठी अस्मिता, मराठी संस्कृती रक्षणासाठी […]

अधिक वाचा..

सणसवाडीत ‘श्रीदत्त पार्क’ नावाने बेकायदेशीर प्लॉटिंग करून रस्त्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांना देतायेत त्रास

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील मौजे सणसवाडी येथील सर्वे/गट नं. ८ मध्ये अजित हिरामण दरेकर व नवनाथ विष्णू दरेकर (रा. सणसवाडी, पाटील मळा, ता. शिरूर, जि. पुणे) या दोघांनी तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन करून ‘श्रीदत्त पार्क’ या नावाने अवैध प्लॉटिंग सुरू केल्याचा गंभीर आरोप स्थानिक रहीवाशी शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकरी व ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार –सदर प्लॉटिंग […]

अधिक वाचा..

पन्नास खोके म्हणताच शिंदेंच्या आमदाराची पत्नी संतापली

चित्रलेखा पाटलांना दिला धक्का, कार्यकर्त्यांची हमरातुमरी रायगड: जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस (Rain) कोसळतोय, सतत कोसळणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत, तर काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलीय. पाली-खोपोली राज्य महामार्गावर पाली आंबा नदी पुलाजवळ पाणी साचल्याने वाहतुकीला फटका बसला असून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी तळी साचल्याने वाहतूक […]

अधिक वाचा..

चारित्र्यावर संशय घेत छळ, विवाहितेनं आयुष्य संपवलं; पती अन् सासूला अटक

पुणे: पुण्यात सासरच्या त्रासाला कंटाळून एका विवाहित महिलेनं आत्महत्या केल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडलीय. सासरच्या जाचाला कंटाळलेल्या महिलेनं आयुष्य संपवलं. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पती आणि सासूला अटक करण्यात आलीय. राणी भागवत कदम असं आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचं नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, […]

अधिक वाचा..

ॲम्बुलन्स खरेदीच्या टेंडर प्रक्रियेत श्रीकांत शिंदेंचे नाव का जोडलं जातय

मुंबई: राज्यातील ॲम्बुलन्स घोटाळ्यावरील आरोपांवर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची स्पष्टीकरण दिलं असून विरोधक नुकताच दिशाभूल करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अॅम्ब्युलन्स खरेदी करण्याचा निर्णय 2019 सालीच घेतला होता, पण हे प्रकरण न्यायालयात गेल्याने खरेदीला विलंब झाल्याचं आबिटकर म्हणाले. अॅम्ब्युलन्स खरेदी प्रक्रिया ही शासनाच्या नियमाप्रमाणे झाली आहे. एका कंपनीत काय झाले असेल तर त्याचा शासनाशी सबंध […]

अधिक वाचा..

हिंदी सक्ती विरोधात मोठे जनआंदोलन उभे; ५ तारखेच्या मोर्चा आधीच सरकार निर्णय रद्द करेल

आझाद मैदानाच हिंदी सक्तीच्या शासन आदेशाच प्रतीकात्मक होळी करून केला निषेध मुंबई: हिंदी भाषा सक्तीचा शासन आदेश आल्यानंतर लगेच याला विरोध करत हिंदी सक्ती करू नये अशी काँग्रेस पक्षाने भूमिका घेतली. तसेच सर्व राजकीय पक्ष सामाजिक संस्था यांनी यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले होते. हा संस्कृती रक्षणाचा लढा सर्वांनी मिळून लढला पाहिजे. आज राज्यात […]

अधिक वाचा..

निवडणूक आयोग मोदी सरकारच्या हातचे बाहुले, मतांची चोरी उघड होऊ नये म्हणून ४८ तासात नियम ९३ बदलला

संध्याकाळी ५ वाजल्यानंतर ७६ लाख मतदान वाढले कसे? निवडणूक आयोग उत्तर का देत नाही मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी करून भाजपा युती सरकार सत्तेत आले आहे, हे काँग्रेस पक्षाने सातत्याने सांगितले आहे. निवडणूक प्रक्रियेत गडबड करून महाराष्ट्रातील निवडणुकीत घोटाळा केला, त्याची चौकशी करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली असता आयोग समाधानकारक उत्तर देत नाही. हरियाणा […]

अधिक वाचा..