मोदींनी सोनम वांगचुकांची भेट का घेतली नाही?; राम मंदिर चोरीवर भाजप-आरएसएसवर सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत, “राहुल गांधी यांनी वांगचुकांची भेट का घेतली नाही, यापेक्षा नरेंद्र मोदींनी अद्याप त्यांची भेट का घेतली नाही?” असा सवाल उपस्थित केला. सपकाळ म्हणाले […]

अधिक वाचा..

भाजप घरवापसीत रस नाही; शरद पवारांसोबतच राहणार; एकनाथ खडसे यांची स्पष्ट भूमिका

अमित शहांनी प्रवेशासाठी बोलावल्याचा दावा; राज्य भाजप नेतृत्वाने विरोध केल्याचा गौप्यस्फोट, गिरीश महाजनांवरही घणाघात मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी आपल्या भाजप घरवापसीच्या चर्चांना पूर्णविराम देत आपण शरद पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. “मला वैयक्तिकरित्या भाजपमध्ये परत जाण्यात कोणताही रस नाही. मी शरद पवारांसोबत आहे आणि […]

अधिक वाचा..

‘ओबीसी आमचा डीएनए आहे’ म्हणणारे भाजप सरकार ओबीसी विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत इतके उदासीन का?

मुंबई: निवडणुकांच्या वेळी ओबीसी समाजाच्या दारात जाऊन मतांची याचना करायची आणि सत्ता मिळाल्यानंतर शिक्षण, वसतिगृहे, शिष्यवृत्ती, भत्ते आणि प्रशिक्षण योजनांमध्ये त्यांच्याच मुलांना डावलायचे, ही कोणती सामाजिक न्यायाची भूमिका आहे? राज्यातील सर्वात मोठा समाजघटक असलेल्या ओबीसी समाजाला योजनांच्या लाभात कायम दुय्यम स्थान का दिले जाते? जाहिरातींवर हजारो कोटी रुपये खर्च करणाऱ्या सरकारकडे ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आवश्यक निधी […]

अधिक वाचा..

नटराजन यांची नोटीसच रद्द! राज्यसभा निवडणूक पुन्हा घ्या, भाजपावर ‘सीटचोरी’चा आरोप

मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज चुकीच्या पद्धतीने रद्द करून भाजपाने आणि निवडणूक आयोगाने खासदारकी पदरात पाडून घेतल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. ज्या नोटीसच्या आधारे नटराजन यांचा अर्ज बाद करण्यात आला होता, ती नोटीसच तेलंगणातील न्यायालयाने रद्द केल्याने आता राज्यसभा निवडणूक रद्द करून […]

अधिक वाचा..

वोटचोरी करून भाजप सत्तेत; लोकशाहीशी खेळ करणाऱ्यांना जेलमध्ये जावे लागेल; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतदार यादीत फेरफार करून महाराष्ट्रात सत्ता मिळवली असून बिहार आणि बंगालमध्येही मतदारांची नावे वगळून विजय मिळवला, असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष Harshvardhan Sapkal यांनी केला. लोकशाहीची हत्या करणाऱ्या आणि मतदार यादीत घोळ करणाऱ्यांना आगामी काळात जेलमध्ये जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. राज्यात निवडणूक आयोगामार्फत राबविण्यात […]

अधिक वाचा..

आसाममध्ये भाजपची ‘हिस्टोरिक व्हिक्टरी; हिमंता बिस्व सरमा यांच्या नेतृत्वाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कौतुक

गुवाहाटी: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आसाममधील भाजपच्या ऐतिहासिक विजयाबद्दल जनतेचे आभार मानत हिमंता बिस्व सरमा यांचे विशेष अभिनंदन केले. हिमंता बिस्व सरमा दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून, त्या शपथविधी सोहळ्यासाठी शिंदे उपस्थित राहण्यासाठी गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. आसाममध्ये भाजपने १०२ जागांवर विजय मिळवत ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले, […]

अधिक वाचा..

भाजप देशभर दंगली घडवण्याचा कट रचत आहे; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: देशभरात धार्मिक तेढ निर्माण करून २०२९ च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दंगली घडवण्याचे षडयंत्र भाजपाकडून सुरू असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष Harshvardhan Sapkal यांनी केला. २००२ च्या गुजरात दंगलीप्रमाणेच वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असून पश्चिम बंगालमधील दंगली ही त्याची सुरुवात असल्याचा दावा त्यांनी केला. मुंबईतील Tilak Bhavan येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सपकाळ म्हणाले की, पाच […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपावर काँग्रेसचा हल्लाबोल; सपकाळांचा गंभीर आरोप

मुंबई: काँग्रेस आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भरीव मदत मिळत होती, मात्र २०१४ नंतर भाजप सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. शेतमालाला योग्य भाव मिळत नसताना शेती खर्च वाढल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून आत्महत्यांचे प्रमाण वाढल्याचा दावा त्यांनी केला. सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा जिल्ह्यात मानेगाव ते जळगाव जामोद दरम्यान ‘शिवसन्मान […]

अधिक वाचा..

दक्षिणेत भाजपाला नकार, केरळमध्ये काँग्रेसचा विजय लोकशाहीचा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष ने साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर केला असला तरी दक्षिण भारतातील जनतेने भाजपाचा विभाजनवादी विचार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व नाकारले, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

अधिक वाचा..

हाच का डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल भाजपचा आदर? अनंत गाडगीळ यांचा संतप्त सवाल

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक ‘राजगृह’ परिसरातील परिस्थितीवरून काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी भाजप आणि मुंबई महापालिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. १४ एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त मोठ्या संख्येने अनुयायी ‘राजगृह’ येथे दाखल झाले होते. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून राजगृहासमोरील पदपथावर फिरती शौचालये उभारण्यात आली होती. त्या दिवशी स्थानिक […]

अधिक वाचा..