महिला शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी अधिवेशनात विधेयक शासन कटिबद्ध; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

मुंबई: महिला शेतकऱ्यांना त्यांचे हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून यासंदर्भातील महत्त्वाचे विधेयक पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यंदाचे वर्ष संयुक्त राष्ट्रसंघ यांनी ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून जाहीर केले असल्याचे सांगत, महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी शासन विविध पावले […]

अधिक वाचा..

भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांवर चालत आदिवासी विकासासाठी सरकार कटिबद्ध; एकनाथ शिंदे

मुंबई: भगवान बिरसा मुंडा यांच्या बलिदान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. शिक्षण, आरोग्य, रोजगार, संस्कृती संवर्धन आणि हक्कांचे संरक्षण यासाठी विविध महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. लोकभवनातील दरबार हॉल येथे राज्यपाल विष्णुदेव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, […]

अधिक वाचा..

नसरापूर प्रकरणात वेगवान न्यायासाठी सरकार कटिबद्ध; कुटुंबाच्या पुनर्वसनाची हमी; डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या घटनेने राज्यभर संताप व्यक्त होत असताना, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. “आईच्या हंबरड्याने मन हेलावलं… या चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी लढा शेवटपर्यंत सुरू राहील,” असे सांगत त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. कुटुंबाच्या मानसिक अवस्थेचा विचार करून […]

अधिक वाचा..

सातारा जिल्ह्याला राज्यात अव्वल करण्यासाठी कटिबद्ध; पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा: महाराष्ट्राच्या प्रगतीचा पाया घालणारे यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत सातारा जिल्ह्याला राज्यात अव्वल स्थानावर नेण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त साताऱ्यातील श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल येथे राष्ट्रध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पालकमंत्री देसाई बोलत होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी […]

अधिक वाचा..

एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढीचे थकीत हप्ते देण्यासाठी शासन कटिबद्ध

मुंबई: एसटीच्या सुमारे ८६ हजार कर्मचाऱ्यांचे वेतन वाढीचे थकीत हप्ते देण्यासाठी शासनाने तातडीने १०० कोटी रुपयांची तरतूद केली असून लवकरच फेब्रुवारी महिन्याच्या वेतनात सोबत देण्यात येणारा वेतन वाढीचा थकीत हप्ता कर्मचाऱ्यांच्या बॅक खात्यात जमा होईल. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. तसेच या अनुषंगाने येत्या २४ फेब्रुवारीला काही […]

अधिक वाचा..

आरक्षणासाठी आयोग स्थापन; बंजारा समाजाच्या उन्नतीस सरकार कटिबद्ध

संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सवाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते शुभारंभ वाशीम: बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी शासनाने आयोग स्थापन केला असून लवकरच समाजाला न्याय मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आयोजित श्री संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सवात ते बोलत होते. यावेळी त्यांनी संत सेवालाल महाराजांसह सर्व संतांना वंदन […]

अधिक वाचा..

पुण्यात पुन्हा हुंडाबळी! सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; जबरदस्तीच्या गर्भपाताचा गंभीर आरोप

पुणे: वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर राज्यभरात हुंडाबळीच्या घटना सातत्याने समोर येत असतानाच, पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक अत्यंत संतापजनक आणि हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून सातत्याने होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ […]

अधिक वाचा..

लहानग्या मुलींवर होणाऱ्या अत्याचाराबाबत आजच्या अधिवेशनात कठोर पाऊले उचलली गेली नाही तर…

नागपूर: महाराष्ट्र सरकारने नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून करण्यात आलेल्या हत्येतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासंदर्भात या अधिवेशनात कठोर पाऊले उचलली गेली नाही तर आपण त्या लहानग्या मुलीला न्याय देऊ शकणार नाही अशा शब्दात आमदार सना मलिक-शेख यांनी सभागृहात खंत व्यक्त केली. नाशिक जिल्हयातील मालेगाव येथील अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार आणि हत्या प्रकरणावर […]

अधिक वाचा..

पूरग्रस्तांचे पुनर्वसन व शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध; डॉ. नीलम गोऱ्हे

तुळजापूर: नवरात्र उत्सवानिमित्त विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी धाराशिव, सोलापूर आणि बीड जिल्ह्यांतील पूरस्थितीमुळे प्रभावित झालेल्या नागरिकांचे दुःख हलके व्हावे, त्यांचे प्रश्न त्वरित मार्गी लागावेत आणि योग्य पुनर्वसन व्हावे यासाठी त्यांनी आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना केली. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “महाराष्ट्रातील लेकरं सुरक्षित राहावीत, त्यांना योग्य शिक्षण मिळावे, शेतकऱ्यांना […]

अधिक वाचा..

ओबीसी समाजाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी शासन कटिबद्ध; ओबीसी आरक्षणाला धक्का नाही

मुंबई: मराठा आरक्षणाबाबत राज्य शासनाने काढलेला शासन निर्णय हा पुराव्यांशी संबंधित असून सरसकट नाही. कुणबी असल्याचे पुरावे असणाऱ्यांनाच त्याचा लाभ होणार आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारे धक्का बसणार नाही. शासनाच्या सर्व योजनांचा उद्देश ओबीसी समाजाला शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक दृष्ट्या सक्षम करणे हा आहे. शासन पूर्णपणे कटिबद्ध असून सर्व मागण्यांवर सकारात्मक पद्धतीने चर्चा करून […]

अधिक वाचा..