शिरुर; वाळू माफियांची महसुलच्या अधिकारी अन कर्मचाऱ्यांना नऊ बकऱ्यांची कंदुरी, पार्टीत दारु पिऊन अधिकारी झिंगाट

शिंदोडी (तेजस फडके) गेल्या अनेक वर्षांपासुन शिरुर येथील तहसिलदार कार्यालयातील महसुल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे कारनामे समोर येत आहेत. काही वर्षांपुर्वी तहसिल कार्यालयात बोकडाचा नैवेद्य दाखविण्यात आला होता. त्यानंतर आता वाळू माफियांनी महसुलच्या अधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी चिंचणी येथील वाळू डेपोच्या ठिकाणी नऊ बकऱ्यांची कंदुरी आणि दारुची पार्टी दिली असल्याची खात्रीलायक माहिती सुत्रांनी दिली असुन […]

अधिक वाचा..
aayushaman-bharat-shirur

शिरुर तालुक्यातील कवठे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली कानउघडणी

शिरुर (अरुणकुमार मोटे) “आपण शासनाच्या आरोग्य सेवेत कार्यरत असताना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची अडचण होणार नाही याची दक्षता घेतानाच रुग्णांना तत्पर व वेळेवर अत्यावश्यक रुग्ण सेवा द्या” अशा कडक शब्दात कवठे-येमाई प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ दामोदर मोरे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ नामदेव पानगे यांनी कान उघडणी केली आहे. “कवठे-येमाई […]

अधिक वाचा..

शिक्रापूर ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मुलगा बनला पोलीस

भटक्या समाजातील युवकाने दिला युवकांना अनोखा संदेश शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे अनेक दिवसांपूर्वी भटक्या समाजातून वास्तव्यास आलेल्या परिवारातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मुलगा रोहित तुळजाराम माने परिस्थितीवर मात करत पोलीस दलात भरती झाला, तर भटक्या समाजातील युवकाने जिद्दीचा अनोखा संदेश दिला असल्याने त्याच्यावर परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे भटक्या गोंधळी […]

अधिक वाचा..

संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवत कामावर परत येण्याची सूचना…

औरंगाबाद: जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्यभरातील सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे, तर पेन्शन योजनेबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संप मागे घेण्याचं आवाहन केले होते. मात्र असे असताना देखील संपकरी निर्णय होईपर्यंत संप चालूच ठेवणार असल्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे अखेर प्रशासनाने संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरु केली आहे. छ. संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी कार्यालयातील […]

अधिक वाचा..

श्री क्षेत्र रांजणगाव गणपती ट्रस्ट तर्फे कर्मचारी महिलांच्या हस्ते आरती करुन महिलादिन साजरा

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): आपल्या संस्कृतीमध्ये मुळातच पुर्वीपासूनच महिलांना देवी आणि मातेचे स्थान दिलेले आहे. मात्र परदेशात महिलांना अतिशय हीन वागणुक दिली जात होती. तसेच त्यांना मतदानाचा ही अधिकार नव्हता. म्हणुन त्यांनी याविरुद्ध एकजुटीने लढा दिला आणि त्यात त्यांचा विजय झाला म्हणुन 8 मार्च हा संपुर्ण विश्वात जागतिक महिला दिन म्हणुन साजरा केला जातो, असे […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात अधिकाऱ्याच्या निरोप दरम्यान कर्मचारी गहिवरले

ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिक्षक डॉ. वैजिनाथ काशीद यांचा सन्मान शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामीण रुग्णालयचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैजिनाथ काशीद यांची वैद्यकीय अधीक्षक पदी झालेल्या पदोन्नती बद्दल त्यांचा ग्रामीण रुग्णालय व ग्रामस्थांच्या वतीने सन्मान व निरोप समारंभ आयोजित करण्यात आलेला असताना त्यांच्या सन्मान प्रसंगी भावना व्यक्त करताना अनेक कर्मचाऱ्यांना गहिवरुन आल्याचे दिसून […]

अधिक वाचा..

एस. टी. कर्मचाऱ्यांच्या समस्या अधिवेशनात लावून धरु; कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये…

मुंबई: शिंदे-फडणवीस सरकार एस. टी. महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर करू शकत नाही. पगार होत नसल्याने सांगली जिल्ह्यातील एस. टी. कर्मचारी भीमराव सुर्यवंशी यांना आत्महत्या करावी लागली ही सरकारसाठी लाजीरवाणी बाब आहे. एस. टी. कर्मचाऱ्यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा असून अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांचे प्रश्न लावून धरु, कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन […]

अधिक वाचा..

शिरुर पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी बक्षी समितीचा अहवाल जाळून व्यक्त केला निषेध

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर पंचायत समितीच्या लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांनी बक्षी समितीने वेतन त्रुटीच्या बाबतीत शिफारशींत अन्याय केल्यामुळे बक्षी समितीचा अहवाल पंचायत समिती समोर जाळून कर्मचाऱ्यांनी घोषणा देत निषेध व्यक्त केला. सातव्या वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी होत्या. त्या वेतन त्रुटी दूर करण्यासाठी बक्षी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचा खंड दोनचा अहवाल प्रकाशित करण्यात […]

अधिक वाचा..

सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा

१० लाख रुपयांऐवजी १५ ते २५ लाख रुपये मिळणार… औरंगाबाद: शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी असलेला विमा योजनेत मोठा बदल केला असून सरकारी कर्मचाऱ्यांना आता विमा रक्कम सरसकट १० लाख रुपयांऐवजी १५ ते २५ लाख रुपये मिळणार आहेत. गट अ अधिकाऱ्यांना २५ लाख, तर गट ब अधिकाऱ्यांना २० लाख […]

अधिक वाचा..

बिबटयाने घेतला युवतीचा बळी, कर्मचारी मात्र लाच घेण्यात दंग, लाचलुचपत विभागाची कारवाई

शिरुर (अरुणकुमार मोटे): पारोडी (ता. शिरुर) येथील रेवणनाथ सातकर यांची वन विभागाने पकडलेली गाडी सोडविण्याकरीता तसेच पुन्हा कारवाई न करण्याकरीता शिरुर वनक्षेत्रीय कार्यालयाचे प्रविण क्षिरसागर यांनी रेवणनाथ सातकर यांच्याकडून 10 हजार रुपये लाचेची मागणी करुन त्यांच्याकडून दहा हजार रुपये स्वीकारले आहे. पुणे येथील लाचलुचपत विभागाने त्यांना शिरुर येथे लाच घेताना रंगेहात पकडले आहे. याबाबत पारोडी […]

अधिक वाचा..