‘मोदींनी चहा कुठे विकला?’; संजय राऊतांचा फडणवीसांसह भाजपवर जोरदार हल्लाबोल

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘चहावाला’ या राजकीय प्रतिमेवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. मोदी ज्या काळात गुजरातमधील रेल्वे स्थानकावर चहा विकत असल्याचा दावा केला जातो, त्या काळात संबंधित रेल्वे स्थानकच अस्तित्वात नव्हते, असा दावा राऊत यांनी केला. “मोदींनी लहानपणी चहा विकल्याचा […]

अधिक वाचा..

खडसेंच्या अमृत महोत्सवाला फडणवीस-शरद पवार एकाच व्यासपीठावर; महाजनांच्या उपस्थितीबाबत उत्सुकता

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ३० ऑगस्ट रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका समोर आल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची विशेष उपस्थिती राहणार […]

अधिक वाचा..

फडणवीसांची अचानक दिल्लीवारी; मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून विविध घडामोडींना वेग आलेला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक दिल्ली गाठत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. नवी दिल्लीतील पंतप्रधान निवासस्थानी झालेल्या या भेटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या भेटीची माहिती सोशल मीडियावरून दिली. महाराष्ट्रातील विविध विकास प्रकल्पांसह केंद्र सरकारच्या सहकार्याने […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात स्वातंत्र्यदिनाची जय्यत तयारी; फडणवीसांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण

मुंबई: भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त राज्यातील जिल्हा मुख्यालयांवर संबंधित पालकमंत्री आणि मंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रक जारी केले आहे. राज्याचा मुख्य शासकीय स्वातंत्र्यदिन समारंभ मुंबईतील मंत्रालयात सकाळी ९.०५ वाजता होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात […]

अधिक वाचा..

फडणवीस-शिंदेंचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा सोलापुरातून थेट इशारा

सोलापूर : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू असून, सोलापूर जिल्ह्यातील वैराग येथे त्यांनी मराठा बांधवांना संबोधित करताना राज्य सरकार आणि सत्ताधारी नेत्यांवर जोरदार टीका केली. “तुमची लेकरं-बाळं संकटात आहेत. आता मराठा समाज संकटात सापडला आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना कितीही वळवळ करू द्या, त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प […]

अधिक वाचा..

जात प्रमाणपत्र वैध करा, अन्यथा सरकार पाडू; मनोज जरांगे यांचा फडणवीस-शिंदेंना इशारा

चार लोकप्रतिनिधींची अंतरवाली सराटीत जरांगे यांची भेट; एकनाथ शिंदेंवर ‘डबल ढोलकी’ वाजवण्याचा आरोप, बावनकुळे यांच्यावरही गंभीर आरोप अंतरवाली सराटी: मराठवाड्यातील चार लोकप्रतिनिधींची कुणबी जात प्रमाणपत्रे जात पडताळणी समितीने अवैध ठरवल्यानंतर संबंधित लोकप्रतिनिधींनी गुरुवारी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत जरांगे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत, अवैध ठरवलेली […]

अधिक वाचा..

शिंदे मुख्यमंत्री होणार? चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांचा पूर्णविराम; म्हणाले…

मुंबई: राज्यातील अलीकडील राजकीय घडामोडींमुळे मुख्यमंत्रीपदाबाबत विविध चर्चा रंगू लागल्या असतानाच मुख्यमंत्री यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांनी बंडखोरी करून यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा सत्तासमीकरणांबाबत चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना फडणवीस म्हणाले, “ज्या राज्यात बहुमतासाठी १४७ जागांची आवश्यकता असते आणि […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा! फडणवीसांच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला प्राधान्य

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना कृषी क्षेत्राला मोठे प्राधान्य दिले. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी स्वीकारली. विशेष म्हणजे राज्याच्या इतिहासात अर्थसंकल्प सादर करणारे ते पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात […]

अधिक वाचा..

भाजपाकडून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिकण्याची गरज नाही’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर पलटवार

वर्धा: “आम्हाला भाजपाकडून छत्रपती शिवाजी महाराज शिकण्याची गरज नाही,” असे ठाम प्रतिपादन काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. माझ्या वक्तव्याची जाणीवपूर्वक मोडतोड करून राज्यात हिंदू-मुस्लीम वाद पेटवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. टिपू सुलतानच्या मुद्द्यावर वर्धा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, “महापुरुषांच्या नावावर राजकारण सुरू आहे. समाजात द्वेष पसरवला जात आहे. सर्व महामानवांचे फोटो […]

अधिक वाचा..

नुकसानग्रस्त महाराष्ट्रासाठी पंतप्रधान मोदींनी विशेष पॅकेज द्यावे, फडणविसांनी जाहीर केलेले पॅकेज फसवे

नाशिक: मे महिन्यापासून राज्यात अतिवृष्टीने थैमान घातल्याने खरिप हंगाम पूर्णपणे वाया गेला असून शेतकऱ्यांचे मोठे नुसकान झाले आहे. मायबाप सरकार बळीराजाला भरीव मदत देईल अशी आशा असताना राज्य सरकारने जाहीर केलेले पॅकेज हे फसवे निघाले. हे पॅकेज शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करणारे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावर आले पण शेतकऱ्यांसाठी एका दमडीचीही घोषणा केली नाही. […]

अधिक वाचा..