सरकार म्हणतं ‘सगळं आलबेल’, पण गॅसचा प्रश्न अजूनही धगधगताच!

मुंबई: देशात एलपीजी पुरवठा सुरळीत असल्याचा दावा केंद्र व राज्य सरकारांकडून वारंवार केला जात असला, तरी प्रत्यक्षात नागरिकांच्या मनातील शंका आणि भीती अजूनही कायम आहे. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे ऊर्जा बाजारावर परिणाम झाला असला, तरी भारतात गॅसचा तुटवडा नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पेट्रोलियम सचिव डॉ. नीरज मित्तल यांनी एलपीजी तुटवड्याच्या अफवा फेटाळून लावत, सोशल […]

अधिक वाचा..

उद्योगांना एलपीजीचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील; जयकुमार रावल

मुंबई: महाराष्ट्रात कार्यरत असलेली प्रत्येक विदेशी कंपनी ही राज्याचीच आहे, या भूमिकेतून राज्य शासन सर्वतोपरी काळजी घेत आहे. पश्चिम आशियातील युद्धामुळे एलपीजी गॅसच्या जागतिक तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील स्वदेशी उद्योगाबरोबर विदेशी गुंतवणुकीच्या उद्योगांना तसेच नागरिकांना गॅसचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी राज्य शासनामार्फत आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगून या संकटात कोणत्याही उद्योगाला राज्य शासन […]

अधिक वाचा..

MHADA लॉटरीत OBC वंचित? ॲड. अमोल मातेले यांचा सरकारला सवाल

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगर विकास व गृहनिर्माण मंत्री Eknath Shinde यांना ई-मेलद्वारे सविस्तर पत्र पाठवून म्हाडा गृहनिर्माण योजनांमध्ये इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गासाठी स्वतंत्र श्रेणी व सवलतींचा समावेश करण्याची ठोस मागणी केली आहे. पार्श्वभूमी Maharashtra Housing and Area Development […]

अधिक वाचा..

महायुती सरकारवर नैतिकतेचा प्रश्न; झिरवाळांच्या VDO प्रकरणी तात्काळ कारवाईची मागणी

मुंबई: महायुती सरकारमधील कथित अनैतिक वादांमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून, मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी झिरवाळ यांची तात्काळ मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. सपकाळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भोंदूबाबा अशोक खरात यांच्या कथित […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेण्याचा निर्धार! विकास, कायदा-सुव्यवस्था आणि शेतकरी हितावर शासनाचा भर

मुंबई: राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध असून, शेती, उद्योग, पायाभूत सुविधा आणि कायदा-सुव्यवस्था या सर्व क्षेत्रांत काम सुरू आहे. आमचा महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेण्याचा ठाम निर्धार आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबई व परिसर झोपडपट्टीमुक्त करण्याचा निर्धार राज्य शासनाने केला असून, त्यासाठी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान’ राबविण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ […]

अधिक वाचा..

तुही यत्ता कंची? खरात प्रकरण, महिला अत्याचार आणि सत्तासंघर्षावरून सरकारला सवाल

महिला सुरक्षेवरून राजकारण तापले; अधिवेशनात सत्ताधाऱ्यांमध्येच कलगीतुरा मुंबई: राज्यात सध्या उघडकीस आलेल्या कथित ‘भोंदू बाबा’ खरात प्रकरणामुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, त्यावरून राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. “लाडकी बहिण” योजनेच्या गाजावाज्यात महिलांच्या प्रत्यक्ष सुरक्षिततेबाबत सरकार काय उपाययोजना करणार, असा सवाल उपस्थित होत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आघाडीतही तणाव वाढल्याचे दिसून येत आहे. […]

अधिक वाचा..

उन्हाळी सुट्ट्यांवर जनगणनेचं सावट; शिक्षकांना सुट्टीऐवजी सरकारी कामाची जबाबदारी

मुंबई: राज्यात २ मे ते १४ जूनदरम्यान शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागण्याची शक्यता असताना, यंदा शिक्षकांना मात्र या सुट्ट्यांचा लाभ घेता येणार नाही. सरकारने आगामी जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात शिक्षकांना जनगणनेची कामे करावी लागणार असून, या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व अनुदानित व […]

अधिक वाचा..

निधी वाटपात पक्षपातीपणा; आदिवासी निधी वळवण्यावरून वडेट्टीवारांचा सरकारवर हल्ला

मुंबई: राज्यातील महायुती सरकार निधी वाटपात पक्षपातीपणा करत असून अर्थसंकल्पातील निधी केवळ सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघातच दिला जात असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. “सबका साथ, सबका विकास” ही घोषणा फक्त घोषणेतच राहिली आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघातील रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी […]

अधिक वाचा..

शेतकरी कर्जमाफीची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वासघात, सरकार फक्त लाडक्या कंत्राटदारांचे हित जपण्यात व्यस्त

मुंबई: महायुती सरकारने अर्थसंकल्प मध्ये जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही निव्वळ धूळफेक असून, सरकारने ३० सप्टेंबर २०२५ ची अट घालून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे, असा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज केला. अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान बोलताना त्यांनी शेती, सिंचन आणि राज्यातील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेवरून सरकारवर कडक ताशेरे ओढले. शेतकरी प्रश्नांवर बोलताना वडेट्टीवार यांनी कर्जमाफीच्या निकषांवर […]

अधिक वाचा..

मुंबईतील विधानभवन, उच्च न्यायालय, बीएसई व मेट्रोला बॉम्बची धमकी; सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी; विजय वडेट्टीवार

मुंबई: मुंबईतील विधानभवन, मुंबई उच्च न्यायालय, बीएसई आणि मेट्रोला बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची सरकारने अत्यंत गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली. सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाच अशा प्रकारची धमकी येणे ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. औचित्याच्या […]

अधिक वाचा..