मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई केली असली, तरी ही कारवाई अपुरी आणि केवळ दिखाऊ असल्याची टीका काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व तेलंगणाचे सहप्रभारी सचिन सावंत यांनी केली आहे. २०१५ मधील मालवणी विषारी दारू दुर्घटनेनंतर नियुक्त करण्यात आलेल्या समितीच्या शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी झाली असती, तर […]

अधिक वाचा..

पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय

मुंबई : पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे जागतिक स्तरावर आर्थिक आणि संसाधनांच्या टंचाईची शक्यता निर्माण झाली असताना, महाराष्ट्र शासनाने राज्यभरात संसाधन बचत आणि आर्थिक शिस्तीवर भर देणारे महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक जारी केले आहे. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या या परिपत्रकात इंधन बचत, ऊर्जा संवर्धन, डिजिटल प्रशासन, नैसर्गिक शेती आणि सार्वजनिक वाहतूक वापर […]

अधिक वाचा..

सरकारी जमीन खासगी विकासकांच्या घशात; मीरा भाईंदर जमीन प्रकरणावरून सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघात

नागपूर: मीरा भाईंदर येथील मौजे भाईंदरमधील सुमारे २५४.८८ एकर शासकीय जमिनीच्या मालकी हक्काबाबत उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आणि त्यावर राज्य सरकारने घेतलेली भूमिका ही जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणारी असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते Vijay Wadettiwar यांनी केला. कोट्यवधी रुपयांची सरकारी जमीन खासगी विकासकांच्या घशात घालण्यासाठी प्रशासकीय स्तरावर जाणीवपूर्वक दिरंगाई करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी नागपुरात केला. […]

अधिक वाचा..

नसरापूर प्रकरणात वेगवान न्यायासाठी सरकार कटिबद्ध; कुटुंबाच्या पुनर्वसनाची हमी; डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या घटनेने राज्यभर संताप व्यक्त होत असताना, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. “आईच्या हंबरड्याने मन हेलावलं… या चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी लढा शेवटपर्यंत सुरू राहील,” असे सांगत त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. कुटुंबाच्या मानसिक अवस्थेचा विचार करून […]

अधिक वाचा..

‘१ मेपासून मराठी सक्ती’चा फुगा फुटला? विरोधानंतर सरकारची माघार

मुंबई: राज्यात ‘१ मेपासून मराठी सक्ती’ या घोषणेनंतर निर्माण झालेला वाद आता अधिकच गडद झाला आहे. परिवहन विभागाकडून करण्यात आलेल्या या घोषणेला सुरुवातीला मोठा गाजावाजा करण्यात आला होता. मात्र, रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांकडून तीव्र विरोध समोर आल्यानंतर सरकारची भूमिका नरम झाल्याचे दिसत आहे. रिक्षा-टॅक्सी चालकांनी भाषा सक्तीच्या निर्णयाला विरोध करताना, यामुळे त्यांच्या रोजीरोटीवर परिणाम […]

अधिक वाचा..

तेलंगणात एसटी विलीनीकरणाचा ऐतिहासिक निर्णय; महाराष्ट्र सरकारवर काँग्रेसची टीका

मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयासोबतच दीर्घकाळ कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत समाविष्ट करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन सावंत यांनी महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी प्रश्न उपस्थित केला […]

अधिक वाचा..

आमदार संजय गायकवाडांचे विधान विकृत; कारवाईस सरकार का घाबरते? हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर तीव्र टीका केली आहे. ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या प्रकाशकांबाबत गायकवाड यांनी केलेली भाषा अत्यंत घाणेरडी, विकृत आणि गुन्हेगारी स्वरूपाची असल्याचा आरोप त्यांनी केला. गांधी भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, आमदार गायकवाड […]

अधिक वाचा..

सरकार म्हणतं ‘सगळं आलबेल’, पण गॅसचा प्रश्न अजूनही धगधगताच!

मुंबई: देशात एलपीजी पुरवठा सुरळीत असल्याचा दावा केंद्र व राज्य सरकारांकडून वारंवार केला जात असला, तरी प्रत्यक्षात नागरिकांच्या मनातील शंका आणि भीती अजूनही कायम आहे. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे ऊर्जा बाजारावर परिणाम झाला असला, तरी भारतात गॅसचा तुटवडा नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पेट्रोलियम सचिव डॉ. नीरज मित्तल यांनी एलपीजी तुटवड्याच्या अफवा फेटाळून लावत, सोशल […]

अधिक वाचा..

उद्योगांना एलपीजीचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील; जयकुमार रावल

मुंबई: महाराष्ट्रात कार्यरत असलेली प्रत्येक विदेशी कंपनी ही राज्याचीच आहे, या भूमिकेतून राज्य शासन सर्वतोपरी काळजी घेत आहे. पश्चिम आशियातील युद्धामुळे एलपीजी गॅसच्या जागतिक तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील स्वदेशी उद्योगाबरोबर विदेशी गुंतवणुकीच्या उद्योगांना तसेच नागरिकांना गॅसचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी राज्य शासनामार्फत आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगून या संकटात कोणत्याही उद्योगाला राज्य शासन […]

अधिक वाचा..

MHADA लॉटरीत OBC वंचित? ॲड. अमोल मातेले यांचा सरकारला सवाल

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगर विकास व गृहनिर्माण मंत्री Eknath Shinde यांना ई-मेलद्वारे सविस्तर पत्र पाठवून म्हाडा गृहनिर्माण योजनांमध्ये इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गासाठी स्वतंत्र श्रेणी व सवलतींचा समावेश करण्याची ठोस मागणी केली आहे. पार्श्वभूमी Maharashtra Housing and Area Development […]

अधिक वाचा..