मतांसाठी ‘लाडकी बहीण’, सत्तेनंतर ‘अपात्र’; सरकारने महिलांचा विश्वासघात केल्याचा काँग्रेसचा आरोप

‘लाडकी बहीण’ योजनेत लाखो महिलांना अपात्र ठरवणे, ई-केवायसीमुळे लाभ रोखणे आणि ₹२,१०० चे आश्वासन पूर्ण न करणे यावर काँग्रेसचे टीकास्त्र  मुंबई: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेवरून महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा तापले असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माध्यम समन्वयक ॲड. श्रीनिवास बिक्कड यांनी महायुती सरकारवर महिलांचा विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे. ‘मतांसाठी महिलांना “लाडकी बहीण” म्हणून संबोधले, […]

अधिक वाचा..

दुबार पेरणीचा संपूर्ण खर्च शासन उचलणार; शेतकऱ्यांना मोठा दिलासा, बावनकुळे यांची घोषणा

मुंबई: बोगस बियाण्यांमुळे नुकसान झालेल्या किंवा पावसाच्या ओढीमुळे दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. दुबार पेरणीसाठी लागणारा संपूर्ण खर्च आता जिल्हा नियोजन समिती (DPDC) निधीतून करण्यात येणार असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. या निर्णयानुसार, बियाणे न उगवल्यास किंवा पीक पूर्णपणे वाया गेल्यास पात्र शेतकऱ्यांना शासनामार्फत नवीन बियाणे उपलब्ध […]

अधिक वाचा..

सरकारला आरसा दाखवणे म्हणजे महाराष्ट्रद्रोह नाही; कायदा-सुव्यवस्थेवर सतेज पाटील यांचा सरकारवर घणाघात

विधानपरिषदेत गुन्हेगारी, महिला सुरक्षा, पोलीस दलातील रिक्त पदे, मिसिंग लिंक प्रकल्प आणि पारदर्शकतेच्या मुद्द्यावर सरकारला जाब मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेदरम्यान काँग्रेसचे विधानपरिषद गटनेते आमदार सतेज (बंटी) पाटील यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था, महिला सुरक्षा, वाढती गुन्हेगारी आणि प्रशासनातील पारदर्शकतेच्या मुद्द्यावर सरकारवर जोरदार टीका केली. “सरकारला आरसा दाखवणे म्हणजे महाराष्ट्रद्रोह नाही,” […]

अधिक वाचा..

पोलीस भरतीला वार्षिक कॅलेंडरची दिशा; सत्यजीत तांबे यांच्या मागणीला सरकारचा सकारात्मक प्रतिसाद

एमपीएससीप्रमाणे पोलीस भरतीचे वार्षिक वेळापत्रक तयार करण्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांचे आश्वासन मुंबई: राज्यातील लाखो पोलीस भरती आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीत असलेल्या युवक-युवतींसाठी दिलासादायक घडामोड घडली आहे. विधानपरिषदेत आमदार सत्यजीत तांबे यांनी पोलीस भरतीसाठी वार्षिक वेळापत्रक (Annual Calendar) जाहीर करण्याची मागणी केली असून, सरकारने त्याची सकारात्मक दखल घेत एमपीएससीच्या धर्तीवर पोलीस भरतीचे वार्षिक कॅलेंडर तयार […]

अधिक वाचा..

मुंबईतील पावसाळी दुर्घटनांवर सरकारला धारेवर; जबाबदारांवर कारवाईची विजय वडेट्टीवार यांची मागणी

मुंबई: मुंबईसह राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घडलेल्या दुर्घटनांमध्ये निष्पाप नागरिकांचा मृत्यू होत असल्याबद्दल काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत तीव्र चिंता व्यक्त केली. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे या दुर्घटना घडल्याचा आरोप करत त्यांनी उच्चस्तरीय चौकशी व दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, मुंबईत मॅनहोलमध्ये पडणे, झाड कोसळणे […]

अधिक वाचा..

हाफकिनचे खासगीकरण होणार नाही; सरकारने सभागृहात दिली हमी

मुंबई: विधानसभेत हाफकिन संस्थेच्या भवितव्याचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला थेट सवाल उपस्थित करत संस्थेच्या खासगीकरणाच्या हालचालींवर तीव्र आक्षेप नोंदवला. वडेट्टीवार यांनी सांगितले की, हाफकिन संस्थेच्या खासगीकरणाचा विषय यापूर्वीही चर्चेत आला होता. सुरुवातीला सरकारने संस्थेची एक इंचही जमीन दिलेली नसल्याचा दावा केला होता. मात्र, नंतर टाटा समूहाला संशोधन केंद्रासाठी पाच […]

अधिक वाचा..

धर्मवीर आनंद दिघे अर्थसहाय्य योजना तात्काळ सुरू करा; सरकारवर अस्लम शेख यांचा निशाणा

मुंबई : निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून योजना जाहीर करायच्या आणि नंतर कोणतेही ठोस कारण न देता त्या बंद करायच्या, हा सरकारचा कारभार निषेधार्ह असल्याची टीका काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी विधानसभेत केली. म.वि.स. नियम २९३ अंतर्गत झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी ‘धर्मवीर आनंद दिघे अर्थसहाय्य योजना’ तात्काळ पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. आ. शेख म्हणाले की, आर्थिक वर्ष […]

अधिक वाचा..

धार्मिक संस्थांमध्ये सरकारचा हस्तक्षेप अयोग्य; हजूर साहिब गुरुद्वारा बोर्डाची तातडीने पुनर्स्थापना करा; अस्लम शेख

मुंबई: नांदेड येथील तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा बोर्डाची तातडीने पुनर्स्थापना करावी आणि धार्मिक संस्थांच्या व्यवस्थापनात सरकारने अनावश्यक हस्तक्षेप करू नये, अशी जोरदार मागणी काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली. आमदार शेख म्हणाले की, कोणत्याही धार्मिक स्थळाचे संचालन आणि व्यवस्थापन त्या धर्माच्या अनुयायांकडेच असावे. संविधानाने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याच्या तत्त्वांनुसार हीच […]

अधिक वाचा..

MPSC प्रश्नांवर सरकारने स्पष्ट उत्तर द्यावे; सतेज पाटील यांचे विधान परिषद सभापतींना पत्र

मुंबई: “लोकशाहीत प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही, तर विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देणे ही सरकारची घटनात्मक जबाबदारी आहे,” असे सांगत विधान परिषदेतील काँग्रेसचे विधिमंडळ नेते सतेज (बंटी) पाटील यांनी राम शिंदे यांना पत्र लिहून महाराष्ट्र लोकसेवा आयोग संदर्भातील सभागृहात विचारलेल्या प्रश्नांना सरकारने सविस्तर, वस्तुनिष्ठ आणि समाधानकारक उत्तरे द्यावीत, अशी मागणी केली आहे. सतेज पाटील यांनी पत्रात […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राला मौखिक आरोग्य सेवा क्षेत्रातील अग्रगण्य गुंतवणूक केंद्र बनविण्यास शासन कटिबद्ध; डॉ. राजेश गवांदे

मुंबई: महाराष्ट्राला मौखिक आरोग्य सेवा (Oral Healthcare) क्षेत्रातील अग्रगण्य गुंतवणूक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, परकीय थेट गुंतवणुकीसह (FDI) देशांतर्गत उद्योगांनाही चालना दिली जाईल, असे प्रतिपादन राजशिष्टाचार, परकीय थेट गुंतवणूक, प्रवासी भारतीय व्यवहार व जनसंपर्क विभागाचे सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी डॉ. राजेश गवांदे यांनी केले. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई येथे […]

अधिक वाचा..