साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना; एफआरपी वेळेत देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा करता यावी, यासाठी केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात ‘सॉफ्ट लोन’ योजना लागू करण्याचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळासमोर सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली सहकारी साखर कारखान्यांसाठी सॉफ्ट लोन पॉलिसी […]

अधिक वाचा..

आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून सपकाळांचा सरकारवर हल्लाबोल

नाशिक : आदिवासी विद्यार्थी गेल्या १५ ते २० दिवसांपासून विविध मागण्यांसाठी उपोषण आणि आंदोलन करत असताना भाजपा महायुती सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. राहुल गांधी यांनी पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नात लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्यानंतर सरकार घाईघाईने त्यांच्या मागण्या मान्य असल्याचे सांगत आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनावर […]

अधिक वाचा..

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने मोठी धास्ती घेतली आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ‘छात्रों की गुंज’वर प्रश्न उपस्थित करण्यापूर्वी गेल्या १३ वर्षांत नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांसाठी काय केले, हे जाहीर करावे. सरकारने विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवले असते तर दिल्लीतील […]

अधिक वाचा..

‘भाजप सरकारच्या काळात प्रत्येक परीक्षेत घोटाळे; तरुणांच्या भविष्याशी खेळ थांबवा’; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ्याची पुनरावृत्ती भाजपशासित राज्यांतील परीक्षांमध्ये होत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. नीट, टीईटी, तलाठी आणि CBSE पेपरफुटीनंतर आता MPSCकडून घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचा पेपरही फुटल्याचे तपासात सिद्ध झाले असून, MPSCने संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करून फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणावरून सपकाळ यांनी राज्य […]

अधिक वाचा..

२२ वर्षांच्या आकडेवारीचा सरकारसमोर आरसा; देश पुढे गेला, पण सामान्य माणसाचे आयुष्य किती बदलले?

मुंबई : देशाचा विकास नेमका कोणत्या निकषांवर मोजायचा, यावरून पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक चर्चा सुरू झाली आहे. २००४ ते २०२६ या २२ वर्षांच्या कालखंडातील विविध आर्थिक, सामाजिक आणि विकासात्मक निकषांची तुलना करणारी आकडेवारी सूरज सामंत यांनी २४ ऑगस्ट २०२६ रोजी फेसबुक पोस्टद्वारे मांडली आहे. या आकडेवारीच्या आधारे केंद्र सरकारच्या विकासाच्या दाव्यांचे मूल्यमापन करण्याची मागणी […]

अधिक वाचा..

खासगी शिकवणी केंद्रांवर आता कायद्याचा लगाम; शासनाकडून प्रारूप मसुदा जाहीर

मुंबई : राज्यातील खासगी शिकवणी केंद्रांच्या नोंदणी आणि नियमनासाठी स्वतंत्र कायदा करण्याच्या दिशेने महाराष्ट्र शासनाने पाऊल टाकले आहे. ‘महाराष्ट्र खासगी शिकवणी केंद्र (नोंदणी व विनियमन) अधिनियम, २०२६’ या प्रस्तावित कायद्याचा प्रारूप मसुदा शासनाने तयार केला असून, त्यावर नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागविण्यात आल्या आहेत. हा मसुदा शालेय शिक्षण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला […]

अधिक वाचा..

मोदींच्या कारभारामुळे देशात सत्ताबदल होणार; २०२९ मध्ये मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत; पृथ्वीराज चव्हाण

नाशिक : आगामी काळात देशात सत्ताबदल होणार असून, हा बदल काँग्रेस किंवा कोणत्याही राजकीय पक्षामुळे नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या १२ वर्षांतील कारभारामुळे होईल, असा दावा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. २०२९ मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत. त्यामुळे भाजपमध्ये नेतृत्वबदलाची तयारी सुरू […]

अधिक वाचा..

शहरांच्या बकालपणाला सरकारच जबाबदार; काँग्रेसचा ‘शहर परिवर्तन गट’ २० ऑगस्टपासून मैदानात

मुंबई: राज्यात झपाट्याने वाढणाऱ्या शहरीकरणाच्या तुलनेत पायाभूत सुविधा निर्माण करण्यात सरकार व महापालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. योग्य नियोजनाअभावी राज्यातील अनेक शहरे बकाल होत असून नागरिकांना रस्ते, पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य, शिक्षण, कचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी, पार्किंग आणि प्रदूषण यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केला आहे. शहर विकासाच्या […]

अधिक वाचा..

वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल; जातनिहाय जनगणना, ओबीसी आरक्षण आणि कुंभमेळ्याच्या खर्चावरून निशाणा

मुंबई: काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जातनिहाय जनगणना, ओबीसी आरक्षण, मनोहर भिडे यांच्या वक्तव्यांसह कुंभमेळ्याच्या खर्चावरून केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. जातनिहाय जनगणना हा ओबीसी समाजाच्या हक्कांचा आणि सामाजिक न्यायाचा महत्त्वाचा प्रश्न आहे. मात्र केंद्र सरकारच्या जनगणना प्रश्नावलीत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम नसेल, तर ही जनगणना अपुरी ठरेल, असे वडेट्टीवार यांनी म्हटले. केवळ […]

अधिक वाचा..

सरकार कुणाचेही असो, रामदास आठवले यांचे मंत्रीपद निश्चित? फडणवीसांनी आठवलेंच्या शैलीत सादर केली कविता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पक्षफुटी, पक्षांतर आणि सत्तेच्या समीकरणांची जोरदार चर्चा सुरू आहे. निवडणुकीचे तिकीट किंवा मंत्रिपद मिळवण्यासाठी अनेक नेते पक्ष बदलताना दिसतात. मात्र, या सगळ्याला अपवाद ठरलेले एक नाव म्हणजे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले. त्यांच्या पक्षाचा सध्या लोकसभेत एकही खासदार किंवा महाराष्ट्र विधानसभेत एकही आमदार नसतानाही आठवले गेल्या दहा वर्षांपासून केंद्रात मंत्री […]

अधिक वाचा..