अवैध नागरिकांना दिलेली २३७ बोगस जन्मप्रमाणपत्रे महिन्याभरात ताब्यात घ्या; महापौर रितू तावडे

मुंबई: मुंबईत अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या नागरिकांना दिलेली २३७ बोगस जन्मप्रमाणपत्रे एक महिन्याच्या आत ताब्यात घेण्याचे आदेश रितू तावडे यांनी दिले. तसेच शहरातील फेरीवाल्यांच्या जन्मप्रमाणपत्रांसह इतर कागदपत्रांची सखोल तपासणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. महानगरपालिका मुख्यालयातील महापौर दालनात आज संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी उपमहापौर संजय घाडी, भाजपचे […]

अधिक वाचा..

प्रदूषणाविरुद्ध गणेश नाईक आक्रमक; 54 टायर कारखान्यांना बंदची नोटीस, नियमभंगावर कारवाईचे आदेश

पालघर: वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी वाडा तालुक्यातील प्रदूषणाच्या मुद्द्यावर कडक भूमिका घेत प्रदूषण करणाऱ्या टायर कारखान्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. डाकिवली व कोनसई येथील ग्रामस्थांनी जनता दरबारात तक्रार केल्यानंतर नाईक यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला संबंधित कारखान्यांची तातडीने पाहणी करून नियमभंग करणाऱ्यांना टाळे ठोकण्याचे निर्देश दिले. वाडा तालुक्यात सुमारे 74 टायर पायरोलोसिस कंपन्या […]

अधिक वाचा..

न्याय निवडक आहे का! पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांना नोटीसही नाही; अंजली दमानियांचा थेट सवाल

मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात आरोपपत्र दाखल; फक्त शीतल तेजवानीवर आरोप, पार्थ पवारांना दिलासा पुणे: पुण्यातील मुंढवा येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात अखेर आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मात्र या आरोपपत्रामध्ये फक्त शीतल तेजवानी हिचेच नाव नमूद करण्यात आले असून, या प्रकरणात चर्चेत असलेले दिग्विजय पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारीला भरपगारी सुट्टी बंधनकारक; उद्योग व खासगी आस्थापनांना शासनाचे आदेश

मुंबई: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांसाठी शनिवार, दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कामगार व कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी देणे बंधनकारक असल्याचे परिपत्रक उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जारी केले […]

अधिक वाचा..

सरपंचाची खुर्ची रिकामी होणार! राज्यातील 14,237 ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीचे आदेश

मुंबई: राज्यातील ग्रामीण राजकारणात मोठा बदल घडणार असून येत्या काळात राज्यातील तब्बल 14 हजार 237 ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमले जाणार आहेत. ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपत असताना निवडणुका लांबणीवर टाकण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या खुर्च्या काही काळासाठी रिकाम्या राहणार आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आधीच रखडल्या आहेत. त्याच […]

अधिक वाचा..

महापालिका निकालानंतर मनोज जरांगे पाटील यांचा अजित पवारांवर हल्लाबोल; फडणवीसांनाही इशारा

मुंबई: महापालिका निवडणुकीच्या निकालात राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून शिवसेना शिंदे गटालाही चांगले यश मिळाले आहे. मात्र, या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला तसेच शरद पवार गटालाही मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले, “यांनी बघायला काही […]

अधिक वाचा..

विवेक भावसार यांना न्यायालयाची राईट वॉटर प्रकरणी मनाई

भाजपा प्रदेश सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक यांना दिलासा मुंबई: नागपूरस्थित राईट वॉटर सोल्युशन्स या कंपनीस भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सहमुख्य प्रवक्ते व महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांच्यामुळे लाभ झाला अशा बदनामीकारक बातम्या ताबडतोब वेबसाईटवरून हटवाव्यात आणि कंपनीविरोधात कोणताही मजकूर प्रकाशित करू नये, अशा स्वरुपाचा मनाई आदेश नागपूरमधील न्यायालयाने द न्यूज 21 डॉट कॉम आणि […]

अधिक वाचा..

संभाजीनगर जिल्ह्यात पाच पेक्षा जास्त व्यक्ती जमण्यास मनाई आदेश जारी…

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी जनार्दन विधाते यांनी जिल्ह्यात मनाई आदेश जारी केले असून हे आदेश 15 जानेवारीपर्यंत अंमलात असतील. या आदेशाद्वारे जिल्ह्यात शस्त्र बाळगणे, विना परवानगी पाच पेक्षा अधिक व्यक्तिंनी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच, पाच पेक्षा जास्त व्यक्ती जमण्यासाठी, सभा, मिरवणूक, मोर्चा, ध्वनिक्षेपक वाजविण्यास […]

अधिक वाचा..

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील दाेन परीक्षा केंद्रांवर मनाई आदेश जारी

ठाणे: महसूल विभागातील गट “क” संवर्गातील तलाठी भरती परीक्षा- 2023 दि. 17 ऑगस्ट ते 14 स्प्टेंबर 2023 पर्यंत 19 दिवस ठाणे पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात एकूण ०२ परीक्षा केंद्रांवर तीन सत्रात आयोजित करण्यात आली असून परीक्षा केंद्राच्या परिसरात मनाई आदेश लागू करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर विशेष शाखा पोलीस उपायुक्त डॉ.श्रीकांत परोपकारी यांनी दिली आहे. […]

अधिक वाचा..