शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; २० लाख विद्यार्थ्यांची होणार मोफत नेत्र तपासणी

मुंबई : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. शालेय शिक्षण विभाग, रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि वनसाईट एस्सिलार लक्सोटिका फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असून, या माध्यमातून राज्यातील शासकीय शाळांमधील पाचवी ते दहावीच्या २० लाख विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी केली जाणार आहे. दृष्टीदोष आढळलेल्या पात्र विद्यार्थ्यांना मोफत नंबरचे चष्मे उपलब्ध करून […]

अधिक वाचा..

पुण्याला २०३२ ‘यूसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप’चे यजमानपद मिळणार? महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

मुंबई: पुणे येथे २०३२ मध्ये ‘यूसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप’ आयोजित करण्यासाठी निविदा सादर करण्यास महाराष्ट्र मंत्रिमंडळाने तत्त्वतः मान्यता दिली आहे. तसेच आवश्यक शासन समर्थन, आर्थिक हमी आणि पायाभूत सुविधांबाबत बांधिलकी देण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठीची दावेदारी आणखी मजबूत झाली आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री तथा क्रीडामंत्री सुनेत्रा अजित पवार […]

अधिक वाचा..

महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एसटी महामंडळाचा मोठा निर्णय; सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश

मुंबई: राज्यातील एसटी बसस्थानके आणि एसटी प्रवास महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी अधिक सुरक्षित करण्याच्या मागणीची परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी गंभीर दखल घेतली आहे. बसस्थानकांवरील सुविधा आणि आवश्यक सुधारणांचा आढावा घेऊन सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश परिवहन विभाग आणि एसटी महामंडळाच्या प्रशासनाला देण्यात आले आहेत. विधान परिषद सदस्या तथा माजी उपसभापती डॉ. नीलम […]

अधिक वाचा..

घोडगंगा कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय

शिरूर : शिरूर तालुक्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी शासनस्तरावर हालचालींना वेग आला आहे. कारखान्यावर अवलंबून असलेल्या हजारो शेतकरी, ऊस उत्पादक, कामगार, वाहतूकदार, लघुउद्योजक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हिताचा विचार करून कारखाना लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले. मुंबईतील सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे घोडगंगा […]

अधिक वाचा..

37व्या वाढदिवशी प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय; ‘आता अधिकृतपणे मी क्रुएल्टी-फ्री झाले’

मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळी आज आपला 37वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त प्राजक्ताने कुटुंबीयांसोबत वेळ घालवत दिवस खास केला. मात्र, यंदाच्या वाढदिवशी तिने घेतलेल्या एका निर्णयाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्राजक्ताने आता व्हेगन होण्याचा निर्णय घेतला आहे. प्राजक्ताने वाढदिवसाची सुरुवात श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन केली. त्यानंतर तिने आई तळजाई मातेचेही आशीर्वाद घेतले. वाढदिवसानिमित्त […]

अधिक वाचा..

पेट्रोल-डिझेल निर्यात महागली! केंद्राचा मोठा निर्णय; ATF वरही शुल्कवाढ

पेट्रोल, डिझेल आणि जेट इंधनावरील निर्यात शुल्कात वाढ; 3 ऑगस्टपासून नवे दर लागू, सर्वसामान्यांवरील किरकोळ दर मात्र सध्या कायम मुंबई: केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि विमानांमध्ये वापरल्या जाणाऱ्या एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF) वरील निर्यात शुल्कात (Windfall Tax/Export Duty) वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, सुधारित शुल्कदर 3 ऑगस्टपासून लागू करण्यात […]

अधिक वाचा..

पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय

मुंबई : पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे जागतिक स्तरावर आर्थिक आणि संसाधनांच्या टंचाईची शक्यता निर्माण झाली असताना, महाराष्ट्र शासनाने राज्यभरात संसाधन बचत आणि आर्थिक शिस्तीवर भर देणारे महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक जारी केले आहे. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या या परिपत्रकात इंधन बचत, ऊर्जा संवर्धन, डिजिटल प्रशासन, नैसर्गिक शेती आणि सार्वजनिक वाहतूक वापर […]

अधिक वाचा..

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय! कर्तव्यावर असताना एसटी प्रवास मोफत

राज्य शासनाच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी मुंबई: राज्य शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. कर्तव्यावर असताना एसटी बसने प्रवास करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना मोफत प्रवासाची सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ८ जानेवारी २०२६ रोजी प्रशासकीय पातळीवर झालेल्या बैठकीनंतर याबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. या निर्णयाचा मुख्य उद्देश काय […]

अधिक वाचा..

राज्य शासनाचा मोठा निर्णय! ग्रामपंचायत घरपट्टी, नळपट्टी करामध्ये 50% सूट

औरंगाबाद: महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने सन २०२५–२६ साठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या कालावधीत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. घरपट्टी व पाणीपट्टीत मोठा दिलासा या अभियानाअंतर्गत घरपट्टी पाणीपट्टी यावर मिळणारी ५० टक्के सवलत पुढेही कायम राहणार असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. […]

अधिक वाचा..