‘दादा’विना अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात; विरोधी पक्षनेत्याविना इतिहासात प्रथमच सत्र

मुंबई: महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज (२३ फेब्रुवारी)पासून सुरू झाले असून ते २५ मार्च २०२६ पर्यंत चालणार आहे. एकूण २० कामकाजाच्या दिवसांचे हे अधिवेशन अनेक कारणांनी महत्त्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर प्रथमच अर्थसंकल्प सादर होणार असून त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ६ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र […]

अधिक वाचा..

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांचे विरोधकांना चोख प्रत्युत्तर

विकासकामांचा पाढा आणि विरोधकांच्या भूमिकांवर प्रहार मुंबई: साडेतीन वर्षात राज्य सरकारने केलेल्या कामांचा आढावा घेत राज्यातील महायुती सरकार हे स्थगिती सरकार नसून प्रगती सरकार असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेतला. यावेळी बोलताना, दावोस मध्ये झालेले ३० लाख कोटींचे औद्योगिक करार त्यातून ४० […]

अधिक वाचा..

मंत्रालयातील ‘लक्ष्मीदर्शन’ प्रकरणावरून विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल; चहापानावर बहिष्कार

मुंबई: राज्यातील महायुती सरकारच्या कथित भ्रष्ट कारभाराचा निषेध करत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित अधिकृत चहापान कार्यक्रमावर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला. मंत्रालयात सुरू असलेल्या ‘लक्ष्मीदर्शन’ प्रकारावरून तसेच घटनात्मक पदांच्या कथित अवमानावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूबाबतही प्रश्न उपस्थित केले. हा घातपात की अपघात, याबाबत सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी […]

अधिक वाचा..

मुंबई–पुण्याच्या रांगेत कोकण! विरोधकांना विकासाच्या रणांगणात थेट आव्हान

रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र रत्नागिरी: कोकण आता मागे राहणार नाही. मुंबई, पुणे, नागपूरच्या पंक्तीत उभं राहणार! वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या कोकणासाठी ‘गेम चेंजर’ ठरणाऱ्या महामार्ग, ग्रोथ सेंटर्स, पर्यटन हब आणि उद्योग प्रकल्पांची घोषणा करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट विरोधकांना आव्हान दिलं. “हे केवळ रस्ते नाहीत, हा कोकणाच्या भविष्याचा मार्ग […]

अधिक वाचा..

नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानीपत; नवी मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार

गाफील राहू नका एक दिलाने कामाला लागण्याचा कार्यकर्त्यांना दिला संदेश नवी मुंबई: नगरपालिका व नगर परिषद निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला एकत्रित मिळालेल्या जागांपेक्षा अधिक जागा शिवसेनेला मिळाल्या आहेत. नवी मुंबईत शिवसेनेची ताकद वाढत असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे गाफील न राहता सर्वांनी एकदिलाने कामाला लागावे आणि नवी मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

अधिक वाचा..

जनसुरक्षा विधेयकाविरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांचे उद्या बुधवार दिनांक १० सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: राज्यातील भारतीय जनता पक्ष युती सरकारने शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्याच्या नावाखाली आणलेल्या जनसुरक्षा विधेयकाविरोधात विरोध पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या अत्याचारी विधेयकाविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) शिवसेना (उबाठा), माकपा, भाकपा, शेकाप यांच्यासह समविचारी पक्षाने आंदोलनाची हाक दिली असून उद्या बुधवार दिनांक १० सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व तालुका व जिल्हा स्तरावर हे आंदोलन करण्यात […]

अधिक वाचा..

सी पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील महायुती सोबत विरोधी पक्षांनी ही मतदान करावे

मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती सोबत विरोधी पक्षातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या सेनेच्या खासदारांनी मतदान करावे असे आवाहन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून निवड […]

अधिक वाचा..

उपराष्ट्रपती पदासाठी विरोधकांचा उमेदवार कोण? राहुल गांधी काय भूमिका घेणार

मुंबई: जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता नवे उपराष्ट्रपती कोण होणार? याकडे अनेकांच्या नजरा लागलेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीत एकीकडे एनडीएच्या आणि दुसरीकडे इंडिया आघाडीच्या बैठकांवर बैठका सुरू असल्यामुळे घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. एनडीएकडून रविवारी उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे, महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना एनडीएकडून उमेदवारी जाहीर करण्यात […]

अधिक वाचा..

शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध अन्…

मुंबई: “होय, सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल, सनातनी दहशतवादाचे अस्तित्व आजचे नाही; तर, ते प्राचीन काळापासून आहे”, असं म्हणत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हिंदुत्ववाद्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या ट्विटमुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. नुकतंच मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल लागला. त्यानंतर महायुती आणि हिंदुत्ववाद्यांनी भगवा दहशतवाद या शब्दावरून […]

अधिक वाचा..

अंबादास दानवेंनंतर कोण? विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी ‘हे’ नाव फायनल

मुंबई: विधान परिषदेचे मावळते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ नुकताच पार पडला. त्यानंतर प्रश्न उपस्थित होऊ लागला की आता, दानवेंनंतर विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी कुणाला संधी मिळणार. कुणाची नावं चर्चेत आहेत. मविआत आधीच ठरल्याप्रमाणे होणार की भाजप काही खेळी करणार? हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. अंबादास दानवेंची कारकीर्द अंबादास दानवे हे २०१९ साली ऑगस्टमध्ये […]

अधिक वाचा..