पश्चिम बंगालमध्ये मोदी-शहा यांची रणनीती यशस्वी; जनतेने विकासाला कौल दिला; एकनाथ शिंदे

नवी दिल्ली: पंतप्रधान Narendra Modi यांचा करिष्मा आणि केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांची चाणक्य नीति पश्चिम बंगालमध्ये यशस्वी ठरली असून जनतेने विकास, विश्वास आणि राष्ट्रहिताच्या भूमिकेला कौल दिला आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी व्यक्त केली. शिंदे म्हणाले की, पश्चिम बंगालमधील विजय हा कार्यकर्त्यांच्या अथक मेहनतीचा आणि एनडीएच्या प्रभावी रणनीतीचा परिणाम आहे. स्वतंत्र […]

अधिक वाचा..

बारामतीकरांचा अभूतपूर्व कौल; सुनिल तटकरे यांचा मानाचा मुजरा, पश्चिम बंगाल परिवर्तनावरही भाष्य

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बारामतीतील मतदारांचे आभार मानत विक्रमी मतदानाबद्दल मानाचा मुजरा केला. बारामतीकरांनी स्वर्गीय नेते आणि महाराष्ट्राचे विकासपुरुष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजित पवार यांना दिलेली भावपूर्ण श्रद्धांजली ही ऐतिहासिक असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना तटकरे म्हणाले की, “वहिनींनी तब्बल २ लाख १८ हजार मताधिक्याने मिळवलेला […]

अधिक वाचा..

जनतेच्या दारी शासन! ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानाची मुंबईत प्रभावी अंमलबजावणी

मुंबई: जनतेला सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हा “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” अभियानाच्या (टप्पा-१) मुख्य उद्देश असून, या अभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा स्पष्ट सूचना मुंबई शहर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिल्या. या अभियानासंदर्भात जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक नियोजन भवन येथे पार पडली. बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी बाप्पासाहेब थोरात, सामान्य प्रशासन विभागाचे […]

अधिक वाचा..

अजितदादांच्या कार्याला आणि त्यांच्या अविरत परिश्रमांना जनतेने कृतज्ञतापूर्वक अर्पण केलेली आदरांजली

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची प्रतिक्रिया मुंबई: आज जाहीर झालेले जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल म्हणजे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री व आमचे नेते अजितदादा पवार यांच्या कार्याला आणि त्यांच्या अविरत परिश्रमांना जनतेने कृतज्ञतापूर्वक अर्पण केलेली आदरांजली आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी […]

अधिक वाचा..

अन्न तेच, पण पद्धत वेगळी! जपानी लोक लठ्ठ का होत नाहीत? जाणून घ्या ५ आरोग्यदायी सिक्रेट

जपानमधील नागरिक जगातील सर्वाधिक दीर्घायुष्य जगणाऱ्या लोकांपैकी एक मानले जातात. विशेष म्हणजे जपानमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण केवळ ३ टक्के आहे, तर अमेरिकेसारख्या देशांमध्ये ते ३५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. समान अन्नपदार्थ असूनही जपानी लोक तंदुरुस्त कसे राहतात, यामागे काही खास सवयी आणि जीवनशैली कारणीभूत आहेत. जाणून घेऊया त्या ५ महत्त्वाच्या कारणांबद्दल— १) साधे, ताजे आणि घरगुती अन्न […]

अधिक वाचा..

केमिकल्सला नकार, आजीबाईंच्या घरगुती उपायांकडे पुन्हा ओढा;

केस गळती, कोंडा, अकाली पांढरे होणे आणि केस विरळ होण्याच्या समस्यांमुळे अनेक जण त्रस्त आहेत. बाजारात उपलब्ध केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर वाढत असला, तरी त्याचे दुष्परिणामही तितकेच वाढताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत आजीबाईंच्या काळातील घरगुती आणि नैसर्गिक उपायांकडे पुन्हा एकदा लोकांचा कल वाढताना दिसतो आहे. पूर्वी महिलांचे केस दाट, लांब आणि मजबूत असायचे. त्यामागे कोणतेही महागडे […]

अधिक वाचा..

आदरणीय अजित पवारांचा लोकाभिमुख वारसा पुढे नेण्यास सज्ज; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आदरणीय अजित पवारांचा लोकाभिमुख वारसा पुढे नेण्याचे ठरवले आहे. शेतकरी, महिला, युवक आणि समाजातील वंचित घटकांसाठी आयुष्यभर कार्य केलेल्या दादांच्या विचारांवर टिकून राहून त्यांनी महाराष्ट्राच्या सेवेसाठी स्वतःला सज्ज केले असल्याचे त्यांनी सांगितले. सुनेत्रा पवार म्हणाल्या, “दादांच्या अकाली निधनाने वैयक्तिक आयुष्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मात्र […]

अधिक वाचा..

विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; १४ वर्षांच्या मुलीसह चौघांचा मृत्यू

सोलापूर: मंगळवेढ्याजवळ पंढरपूर–सोलापूर महामार्गावर सोमवारी (२६ जानेवारी २०२६) सायंकाळी भीषण अपघात झाला. देवदर्शनासाठी पंढरपूरला गेलेल्या मुंबईच्या भाविकांच्या क्रुझर गाडीला एका मालवाहतूक कंटेनर ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात तीन महिला आणि १४ वर्षांच्या मुलासह चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास […]

अधिक वाचा..

महापालिका निकालानंतर महायुतीत खळबळ! माझा पराभव जनतेने नाही, भाजपच्या गद्दारीने केला

शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा भाजपवर गंभीर आरोप मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीमधील अंतर्गत कलह उघडकीस आला आहे. मुंबईतील वॉर्ड क्रमांक १९४ मधून पराभूत झालेले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार समाधान सरवणकर यांनी भाजपवर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. आपला पराभव हा जनतेने दिलेला कौल नसून भाजपच्या स्थानिक पातळीवरील गद्दारीचा परिणाम असल्याचा […]

अधिक वाचा..

खुर्चीचा मोह नाही, जनतेचा विश्वास हाच खरा मुकुट

अमरावतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला स्थानिक नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद अमरावती: शिवसेना सत्तेसाठी नाही तर सर्वसामान्यांच्या वेदना दूर करण्यासाठी जन्माला आली आहे, असे ठणकावून सांगत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या सत्तालालसेवर घणाघाती प्रहार केला. मालमत्तेच्या आकड्यांपेक्षा माणसांची नाती आणि लोकांचा विश्वास महत्त्वाचा असल्याचा स्पष्ट संदेश देत त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या रणांगणात आक्रमकपणे उतरायचे आदेश दिले. महापालिका निवडणुकीच्या […]

अधिक वाचा..