झोपडपट्टीमुक्त मुंबई हवी, पण माणूसमुक्त नव्हे; SRA-MHADAच्या माध्यमातून परवडणाऱ्या घरांचा मार्ग

मुंबई : मुंबई ही स्वप्नांची नगरी म्हणून ओळखली जाते. रोजगार, व्यवसाय आणि चांगल्या आयुष्याच्या अपेक्षेने देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो नागरिक मुंबईत येतात. मात्र वाढती लोकसंख्या, महागडी जमीन, वाढते घरभाडे आणि मर्यादित उत्पन्न यामुळे शहरातील गृहनिर्माणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. परिणामी अनेक कुटुंबांना झोपडपट्ट्यांमध्ये राहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्याचे उद्दिष्ट साध्य करताना केवळ अनधिकृत […]

अधिक वाचा..

बहुमत नव्हे, उत्तरदायित्वच लोकशाहीची खरी ताकद! संसदेत सरकारने जनतेला जाब द्यायलाच हवा

मुंबई: भारतीय लोकशाहीचा सर्वात महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणजे संसद. ती केवळ कायदे मंजूर करणारी संस्था नाही, तर जनतेच्या सार्वभौम इच्छेचे प्रतिनिधित्व करणारे सर्वोच्च घटनात्मक व्यासपीठ आहे. सरकारच्या निर्णयांची छाननी, राष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा, सत्ताधारी आणि विरोधकांमधील संवाद आणि शासनाला उत्तरदायी धरण्याची प्रक्रिया संसदेतूनच घडते. त्यामुळे संसदेत चर्चा होणे आणि सरकारने जनतेच्या प्रतिनिधींसमोर आपल्या निर्णयांचा हिशेब देणे, ही […]

अधिक वाचा..

लोकप्रतिनिधींनी मालक नव्हे, जनतेचा सेवक बनावे; एकनाथ शिंदे

ठाणे: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सेवाभाव, जनसंपर्क आणि अभ्यासपूर्ण कामकाजाचा मंत्र दिला. “लोकप्रतिनिधी हा नगराचा मालक नसून जनतेचा सेवक आहे. पदाचा अहंकार न ठेवता कार्यकर्ता म्हणून लोकांमध्ये राहा. नागरिकांच्या अडचणी स्वतःच्या समजून सोडवा आणि विकासाच्या प्रत्येक निर्णयात पर्यावरणाचा विचार करा,” असे आवाहन त्यांनी केले. रामभाऊ म्हाळगी […]

अधिक वाचा..

‘राजा प्रजेपर्यंत पोहोचला पाहिजे’; ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमातून सचिन अहिर यांचा संदेश

वरळीत ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर’चे उद्घाटन; ३९ विभागांच्या सहभागातून शेकडो नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मुंबई: “रयतेचा राजा सिंहासनावर बसून चालणार नाही, तर राजा प्रजेपर्यंत पोहोचला पाहिजे, हीच शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. त्याच विचारातून राज्य सरकार ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम प्रभावीपणे राबवत आहे,” असे विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी सांगितले. वरळी विधानसभा मतदारसंघात […]

अधिक वाचा..

बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा आणि जनतेशी नाळ; एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचा आढावा

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघर्षातून नेतृत्व घडवत स्वतंत्र राजकीय स्थान निर्माण केल्याची भूमिका त्यांच्या समर्थकांकडून मांडली जाते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या जनसेवेच्या कार्यपद्धतीचा वारसा पुढे नेत त्यांनी कार्यकर्ता-केंद्रित राजकारणाला प्राधान्य दिल्याचे समर्थकांचे मत आहे. मराठी अस्मिता, हिंदुत्व, राष्ट्रहित आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढण्याची प्रेरणा बाळासाहेब ठाकरे […]

अधिक वाचा..

कर्जमाफी नव्हे, शेतकऱ्यांची कर्जवसुली योजना; सरकारची दिशाभूल; अंबादास दानवे

मुंबई: राज्य सरकारने जाहीर केलेली ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ ही प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी नसून कर्जवसुली योजना असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी केला. या योजनेतील १७ जाचक अटींमुळे बहुतांश शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहतील, असा दावा त्यांनी केला. महाराष्ट्र विधान परिषदेत नियम २६० अंतर्गत […]

अधिक वाचा..

सहा खासदारांची बंडखोरी म्हणजे जनतेशी व महाविकास आघाडीशी विश्वासघात; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी केलेली बंडखोरी ही केवळ उद्धव ठाकरे आणि शिवसेनेशीच नव्हे, तर महाविकास आघाडीशी आणि जनतेशीही केलेली गद्दारी असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. महायुतीच्या विरोधात जनतेने मतदान करून या खासदारांना विजयी केले होते. त्यामुळे त्यांच्या या कृतीला जनतेचा विश्वासघात मानत अशा गद्दारांना […]

अधिक वाचा..

पश्चिम बंगालमध्ये मोदी-शहा यांची रणनीती यशस्वी; जनतेने विकासाला कौल दिला; एकनाथ शिंदे

नवी दिल्ली: पंतप्रधान Narendra Modi यांचा करिष्मा आणि केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांची चाणक्य नीति पश्चिम बंगालमध्ये यशस्वी ठरली असून जनतेने विकास, विश्वास आणि राष्ट्रहिताच्या भूमिकेला कौल दिला आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी व्यक्त केली. शिंदे म्हणाले की, पश्चिम बंगालमधील विजय हा कार्यकर्त्यांच्या अथक मेहनतीचा आणि एनडीएच्या प्रभावी रणनीतीचा परिणाम आहे. स्वतंत्र […]

अधिक वाचा..

बारामतीकरांचा अभूतपूर्व कौल; सुनिल तटकरे यांचा मानाचा मुजरा, पश्चिम बंगाल परिवर्तनावरही भाष्य

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बारामतीतील मतदारांचे आभार मानत विक्रमी मतदानाबद्दल मानाचा मुजरा केला. बारामतीकरांनी स्वर्गीय नेते आणि महाराष्ट्राचे विकासपुरुष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजित पवार यांना दिलेली भावपूर्ण श्रद्धांजली ही ऐतिहासिक असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना तटकरे म्हणाले की, “वहिनींनी तब्बल २ लाख १८ हजार मताधिक्याने मिळवलेला […]

अधिक वाचा..

जनतेच्या दारी शासन! ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानाची मुंबईत प्रभावी अंमलबजावणी

मुंबई: जनतेला सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हा “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” अभियानाच्या (टप्पा-१) मुख्य उद्देश असून, या अभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा स्पष्ट सूचना मुंबई शहर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिल्या. या अभियानासंदर्भात जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक नियोजन भवन येथे पार पडली. बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी बाप्पासाहेब थोरात, सामान्य प्रशासन विभागाचे […]

अधिक वाचा..