कोणाच्या फायदयासाठी सिडकोने खासगी कंपन्यांची नेमणूक केली

मुंबई: नवी मुंबईत आर्थिक दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी सिडको ६७ हजार घरे बांधत आहे. आतापर्यंत लाखो घरे बांधणी आणि विक्रीचा मोठा अनुभव गाठीशी असताना सिडकोने यावेळी ही घरे विकण्यासाठी दोन खासगी कंपनीची नियुक्ती केली आहे. ऐरवी सिडकोची घर खरेदीसाठी लोकं मोठया प्रमाणात पुढे येत असताना आता ही घरे विकण्यासाठी सिडकोने खासगी कंपनीची नेमणूक का […]

अधिक वाचा..

पतसंस्थांचे कामकाज पारदर्शकपणे चालण्यासाठी तज्ञ समिती नेमा; बाळासाहेब थोरात

मुंबई: देशाच्या अर्थव्यवस्थेत पतसंस्थांचा मोठा वाटा राहिला आहे. ही पद्धत पुढे जात असतांना या क्षेत्रात अनेक नवीन प्रश्‍नही निर्माण झाले आहेत. बँकेचे चेअरमन, मॅनेजर हे काही निर्णय परस्पर घेत असतात, संचालक मंडळाला याबाबत कोणतीही कल्पना नसते. कल्पना नसतांना व माहिती नसतांना अनवधानाने ते प्रस्तावावर सह्या करतात व नंतर न केलेल्या चुकीची शिक्षा भोगतात अशी परिस्थिती […]

अधिक वाचा..

किमान पुढच्या अधिवेशनाच्याआधी तरी आश्वासन दिलेल्या बैठका लावा

मुंबई: विविध आयुधांच्या माध्यमातून सभागृहात सदस्य विविध प्रश्न तळमळीने मांडत असतात. यावेळी सरकारच्यावतीने त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी बैठक लावण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र अनेक मंत्र्यांकडून सभागृहात आश्वासन दिलेल्या बैठकाच घेतल्या जात नाहीत याबाबत संताप व्यक्त करत सभागृहात आश्वासन दिलेल्या बैठका किमान पुढच्या अधिवेशनाच्या पूर्वी तरी लावण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली. राज्यातल्या […]

अधिक वाचा..

राजकीय पटलावर आम्ही खरे वाघ हे दाखवणाऱ्यांनी वाघांचे संरक्षण करण्यासाठीही लक्ष द्यावे…

स्थगन प्रस्तावाद्वारे वाघांच्या मृत्यूवर सरकारला धरले धारेवर… मुंबई: विदर्भात ७ महिन्यात १६ वाघांचा मृत्यू झाला ही नॅशनल टायगर कन्सर्व्हेशन अथॉरिटीची आकडेवारी असून यामध्ये ९ वाघांचा नैसर्गिक मृत्यू तर ४ वाघ वीजेच्या प्रवाहाने आणि काहींची शिकारही झाली आहे त्यामुळे राजकीय पटलावर आम्ही खरे वाघ हे दाखवणाऱ्यांनी वाघांचे संरक्षण करण्यासाठीही लक्ष द्यावे अशी मागणी जयंत पाटील यांनी […]

अधिक वाचा..

विमा कंपन्यांशी बोलून लवकर भरपाई देता येईल का?

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची कृषिमंत्री मा. अब्दुल सत्तार यांना सूचना मुंबई: शेतकरी अपघाती विमा अंतर्गत विमा कंपनीकडून मिळणारी भरपाईसाठी जवळपास सात वर्षे थांबायला लागते. त्याकरता विमा कंपनी आणि गृहविभागाशी बोलून लवकरात लवकर विम्याचा मोबदला देता येईल का यासाठी प्रयत्न करण्याची सूचना विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना केली. […]

अधिक वाचा..

कसबा पेठेत जनशक्तीने महाशक्तीच्या धनशक्तीचा पराभव करून इतिहास घडवला…

मुंबई: कसबा पेठ पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा विजय खूप बोलका आहे. हा विजय राज्यातील व देशातील जनता बदलाच्या दिशेने विचार करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सत्ताधारी पक्षाने विजयासाठी सर्व गैरमार्गाचा वापर करुनही कसबा पेठेत जनशक्तीने महाशक्तीच्या धनशक्तीचा पराभव करून इतिहास घडवला आहे, असे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. यासंदर्भात […]

अधिक वाचा..

गालिबच्या शायरीतून महेश तपासे यांचा मोदींवर निशाणा…

मुंबई: “अब किस किस सीतम कि मिसाल दु तुमको”, तुम तो हर सीतम बेमिसाल करते हो’, या गालिबच्या शायरीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी गॅस दरवाढीवरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. गेल्या वर्षात चारवेळा घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली असताना यावर्षीही होळी सणाच्या सुरुवातीला घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत ५० रुपयांनी तर […]

अधिक वाचा..

विरोधकांचा उल्लेख देशद्रोही असा केला त्यावर मुख्यमंत्र्यांनी वक्तव्याचा खुलासा करावा…

मुंबई: मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत विरोधकांचा देशद्रोही असा उल्लेख केला. त्यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्र्यांनी आपल्या वक्तव्याचा खुलासा करावा, अशी मागणी केली आहे. विरोधकांवर टीका करताना देशद्रोही म्हणणे चुकीचे आहे, असे दानवे यांनी म्हटले. विरोधी पक्षाचा कोणता सदस्य देशद्रोही आहे? कोणता देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला गेला […]

अधिक वाचा..

मराठी भाषा दिनी राज्यपाल हिंदीत भाषण करतात हा महाराष्ट्राचा अपमान आहे…

मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला विधानसभेच्या संयुक्त सभागृहात राज्यपाल आपले पहिले भाषण हिंदीत करतात हा महाराष्ट्राचा अपमान आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना राज्यपालांच्या अभिभाषणावर आपली नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्र आणि मुंबईच्या मातीला भाषेचा सुगंध आहे. त्या प्रांतात येऊन ती भाषा न बोलता उत्तरभारतातील हिंदी इथल्या माणसांच्या […]

अधिक वाचा..

गडी एकटा निघाला…मंगलदास बांदल पुन्हा मैदानात

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यासह पुणे जिल्ह्यात राजकारणात अनेकांची धांदल उडविणारे पैलवान मंगलदास बांदल यांना नुकताच जामीन मिळाल्याने ते आज पत्रकार परिषदेत नक्की काय बोलणार याकडे सर्व शिरुर तालुक्यातील पुढाऱ्यांचे लक्ष लागले होते. परंतु आपण सध्यातरी कोणत्याही पक्षात जाणार नसुन सध्यातरी “एकला चलो रे” हिच भुमिका असल्याचे बांदल यांनी सांगितले. तसेच ज्यांनी मला जेल मध्ये […]

अधिक वाचा..