सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली; अंबदास दानवे 

मुंबई: शेतकऱ्यांनी कोरोना काळात सरकारला, जनतेला तारलं होतं मात्र शिंदे-फडणविस सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसले असल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली. कांद्याला व कापसाला हमी भाव न देता उलट कृषी मंत्री हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येच कारण न तपासता त्यावर धक्कादायक वक्तव्य करतात, अशा शब्दात त्यांनी सरकारला धारेवर धरले. भांडवली खर्चामध्ये जास्तीत […]

अधिक वाचा..

फडणविसांचा अर्थसंकल्प म्हणजे ‘बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी’…

मुंबई: शिंदे सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर करताना घोषणांचा पाऊस पाडला. या अर्थसंल्पातून केलेल्या घोषणांची वास्तवात पूर्तता होणे कठीण आहे. फडणवीस यांनी केलेल्या अवास्तव घोषणा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला उध्वस्त करणाऱ्या व भोळ्याभाबड्या जनतेची फसवणूक करणाऱ्या आहेत. तुकाराम महाराजांच्या अभंगात सांगायचे तर हा अर्थसंकल्प म्हणजे, “बोलाचीच कढी, बोलाचाच भात, जेउनियां तृप्त कोण जाला”? असा […]

अधिक वाचा..

प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी ‘महिला विकास व्यासपीठ’ असावे…

मुंबई: राज्याचे चौथे महिला धोरण २०२३ ची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात महिला ‘महिला विकास व्यासपीठ’ असावे, महिला व बालविकास विभागाला वाढीव निधी मिळावा, मनोधैर्य योजना महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्याच्याबाबत आम्ही सर्व महिला आमदार मागणी करत आहोत, असे प्रतिपादन उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महिला बालविकास विभागातर्फे आयोजित महिला धोरणाच्या चर्चेच्या बैठकीत केले. राज्याचे […]

अधिक वाचा..

राहुलजी गांधींवर बोलण्याएवढी नितेश राणेंची राजकीय उंची व पात्रता नाही…

मुंबई: काँग्रेस नेते खा. राहुलजी गांधी यांची तुलना दहशतवादी लादेन व कुख्यात गुंड दाऊदशी करुन आमदार नितेश राणे यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. राहुलजी गांधी यांच्यावर बोलण्याएवढी नितेश राणे यांची राजकीय उंची व पात्रता नाही, त्यांनी वाह्यात बडबड थांबवावी अन्यथा त्यांचे वस्त्रहरण त्यांच्याच भाषेत करु, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल […]

अधिक वाचा..

सदा सरवणकरांच्या बंदुकीतून दुसराच गोळीबार करतोय म्हणून क्लीनचीट…

शिंदे – फडणवीस सरकार कायदा धाब्यावर बसवत आहे; महेश तपासे मुंबई: सदा सरवणकर हे बंदुकीचे परवानाधारक आणि त्यांच्या बंदुकीतून दुसराच गोळीबार करतो म्हणून क्लीनचीट मिळणार असेल तर शिंदे – फडणवीस सरकार कायदा कशापद्धतीने धाब्यावर बसवत आहे हे स्पष्ट होत आहे अशी जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. शिंदे गटाचे […]

अधिक वाचा..

अदानी महाघोटाळ्यावर पंतप्रधान मोदी व भाजपा गप्प का?

मुंबई: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची उद्योगपती अदानींवर विशेष मेहरबानी असून या विशेष मेहरबानीतूनच स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) एलआयसीमधील (LIC) कोट्यवधी लोकांचा पैसा मनमानी पद्धतीने अदानींच्या कंपन्यात गुंतवला. आता अदानी समुहातील आर्थिक घोटाळा उघड झाल्याने जनतेचा कष्टाचा पैसा सुरक्षित राहिला नाही. अदानी महाघोटाळ्याप्रश्नी मोदी सरकार मूग मिळून गप्प बसले आहे परंतु काँग्रेस पक्ष जनतेच्या हितासाठी […]

अधिक वाचा..

म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतीस पूर्वीप्रमाणेच सेवा शुल्क आकारण्यात येणार

मुंबई: मुंबईतील म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतींच्या डागडुजीवर होणारा खर्च, मालमत्ता कर, जल आकार आणि सामायिक विद्युत देयक यासाठी प्रति महिना साधारणपणे दोन हजार रुपये इतका खर्च येतो. या खर्चासाठी मार्च २०१९ पर्यंत २५० रुपये प्रति महा इतके सेवाशुल्क करण्यात येत होते. मात्र एप्रिल २०१९ पासून यामध्ये वाढ करून ५०० रुपये प्रति महिना इतके सेवाशुल्क आकारण्यात येत […]

अधिक वाचा..

सविंदणे गावच्या उपसरपंचपदी ऍड. भोलेनाथ पडवळ 

शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरूर) येथिल ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ऍड. भोलेनाथ पडवळ यांची निवड करण्यात आली आहे. माजी उपसरपंच भाऊसाहेब लंघे यांनी राजीनामा दिल्यानंतर उपसरपंच पदासाठी ही निवडणूक घेण्यात आली. यावेळी ईश्वर पडवळ व भोलेनाथ पडवळ यांचा ऊपसरपंचपदासाठी अर्ज आल्याने झालेल्या गुप्त मतदानात भोलेनाथ पडवळ यांना ७/३ असे मतदान झाल्याने त्यांची ऊपसरपंचपदी निवड झाल्याचे निवडणुक […]

अधिक वाचा..

आरोग्य विभागातील रिक्त पदे लवकरच भरणार

मुंबई: राज्यातील आरोग्य सेवा – सुविधांच्या बळकटीकरणासाठी विभागातील रिक्त पदे लवकरच भरण्यात येतील. तसेच आरोग्य केंद्रातील बायोमेट्रिक हजेरी प्रणालीसाठी मुंबई, पुणे येथे मध्यवर्ती बायोमेट्रिक हजेरी पडताळणी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी विधानसभेत सांगितले. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात आरोग्य सेवा सुधारण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत विधानसभा सदस्य सर्वश्री सुभाष थोपटे, राजेश टोपे, […]

अधिक वाचा..

ठाणे, नागपूरातील गुन्हेगारीवरुन अंबादास दानवेंनी सरकार, गृहमंत्र्यांना घेतले फैलावर

मुंबई: ठाणे, नागपूर मधील महिला अत्याचार, हिरे व्यापाऱ्यांना धमकी प्रकरण, दिवसा ढवळ्या हत्या आदी गुन्ह्यांत मोठया प्रमाणात वाढ झाली असून या सर्व गुन्ह्यांत ठाणे, नागपूर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक लागतो, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला धारेवर धरले. ठाण्याचे लोकप्रतिनिधी मुख्यमंत्री व नागपूरचे लोकप्रतिनिधी हे उपमुख्यमंत्री असूनही येथील कायदा व सुव्यवस्था ढासळली असल्याचा म्हणत […]

अधिक वाचा..