शिरूर तालुक्यात निवडणूक रणधुमाळी! राष्ट्रवादीचा प्रभाव वाढतोय तर भाजपसमोर मोठं आव्हान…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा परिसरात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा प्रचार सध्या चांगलाच रंगात आला आहे. गावोगावी सभा, बैठका, संपर्क दौरे यामुळे संपूर्ण भागात राजकीय वातावरण तापले आहे. या निवडणूक प्रचाराला वेगळेच वळण मिळाले आहे ते अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे. मांडवगण-वडगाव रासाई गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुजाता पवार, भारतीय जनता पक्षाचे […]

अधिक वाचा..

राजकारणात खुर्ची जिंकली, पण माणूस हरला; शिवसेना मंत्री संजय शिरसाट

मुंबई: अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर राज्यातील राजकारणाला अवघ्या तीन दिवसांतच मोठा वेग आला आहे. आज सायंकाळी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या अनपेक्षित आणि वेगवान घडामोडींमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, विविध पक्षांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेनेही या शपथविधीवर भाष्य केले आहे. सामाजिक न्याय […]

अधिक वाचा..
shirur-gramin-navre-zp

शिरूर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटात वृषाली वाळके, दीपक कोहकडे व स्वाती घावटे यांना वाढता प्रतिसाद…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील शिरूर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटामध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, या गटातील निवडणूक लढतीत वृषाली वाळके, दिपक कोहकडे आणि स्वाती घावटे या उमेदवारांना मतदारांकडून वाढता आणि सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. प्रचाराच्या प्रत्येक फेरीत जनतेचा उत्स्फूर्त सहभाग आणि स्थानिकांचा विश्वास हे या तिन्ही उमेदवारांच्या बाजूने झुकत असल्याचे चित्र […]

अधिक वाचा..

अजित पवार यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाला जबर धक्का; घातपात की अपघात यावर तीव्र चर्चा

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभावी नेते अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात निधन झाल्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना दाट धुक्यामुळे विमान धावपट्टीचा अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक माहितीत सांगण्यात आले असले, तरी या घटनेमागे घातपात आहे का, यावर राज्यभर तीव्र चर्चा […]

अधिक वाचा..

राजकारणापेक्षा देश, राज्य आणि समाज मोठा

77 व्या प्रजासत्ताक दिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन ठाणे: सत्तासंघर्ष आणि राजकारणापेक्षा देश, राज्य आणि समाज मोठा असतो. धर्माच्या पलीकडे जाऊन कोणावरही अन्याय न होऊ देता सर्व समाजघटकांना सोबत घेऊन कल्याणकारी स्वराज्याची निर्मिती करणे हेच आपले ध्येय असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. 77 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे पोलीस […]

अधिक वाचा..

विरोधासाठी विरोध नको! ‘दावोस’कडे राजकारणापेक्षा महाराष्ट्र हिताने पाहण्याची गरज

मुंबई (शितल करदेकर): महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने ‘दावोस’ हा केवळ परदेश दौरा नसून एक महत्त्वाचे जागतिक व्यासपीठ आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या दौऱ्यावरून सुरू असलेली राजकीय टीका ही विरोधासाठी विरोध या चौकटीत अडकलेली दिसते. प्रश्न उपस्थित करणे आवश्यक आहेच, पण महाराष्ट्राची प्रतिमा धूसर होईल असा बोंबाबोंब करणारा विरोध कितपत योग्य आहे, याचे […]

अधिक वाचा..
trupti-sarode

शिरूर! राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारताच तृप्ती सरोदे यांनी हाती घेतले धनुष्यबाण…

शिरूर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण-न्हावरे गटात निवडणुकीच्या ऐन तोंडावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा हादरा बसला आहे. राष्ट्रवादीकडून उमेदवार म्हणून इच्छुक असलेल्या आणि तळागाळात प्रभावीपणे काम करणाऱ्या तृप्ती सरोदे यांना पक्षाने शेवटच्या क्षणी उमेदवारी नाकारत अनपेक्षित धक्का दिला. या निर्णयाने संतप्त झालेल्या सरोदे यांनी क्षणाचाही विलंब न करता राष्ट्रवादीशी काडीमोड घेत एकनाथ शिंदेच्या […]

अधिक वाचा..

युती, लोचे आणि अंतर्गत टोळ्यांचे राजकारण: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे वास्तव

मुंबई (शितल करदेकर): महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या केवळ विरोधकांशीच नव्हे, तर आपल्याच गटांमध्ये संघर्ष सुरू असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. राज ठाकरे यांनी उल्लेख केलेल्या “पळणाऱ्या टोळ्या” या विधानापेक्षा अधिक गंभीर वास्तव समोर येत असून, विविध पक्षांत अंतर्गत गटबाजी, लोचेकरी कारभार आणि एकमेकांना पाडण्याचे राजकारण उघड होत आहे. महाविकास आघाडी असो वा महायुती—दोन्ही आघाड्यांमध्ये अपेक्षित एकसंघपणा […]

अधिक वाचा..
shirur-taluka-logo

शिरूर! जिल्हा परिषद गट टाकळी हाजीत कोणता पक्ष ठरणार श्रेष्ठ …

शिरूर (नितीन थोरात) : जिल्हा परिषद गट टाकळी हाजी येथे राजकीय घडामोडींनी अचानक वेग घेतला असून, या गटातील उमेदवारांची चिंता वाढली आहे. कालपर्यंत संभाव्य पक्षचिन्हांची छाप मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी उमेदवारांकडून झालेली धडपड, नव्या राजकीय समीकरणांमुळे व्यर्थ ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे. टाकळीहाजी हे या गटातील सर्वाधिक मतदार असलेले गाव मानले जाते. याच गावातून जिल्हा परिषदेसाठी दोन […]

अधिक वाचा..
ncp logo

शिरूर तालुक्यात ZP, पंचायत समितीच्या तोंडावर मोठा राजकीय भूकंप…

शिरूर (तेजस फडके) : तालुक्यातील बेट भागात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर मोठा राजकीय भूकंप झाला आहे. कवठे येमाई-टाकळी हाजी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र गावडे यांची उमेदवारी कापून दामूआण्णा घोडे यांना संधी देण्यात आली आहे. यामुळे गावडे घराण्याने राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रवादीने गावडे कुटुंबाचे तिकीट कापल्याची चर्चा राजकीय […]

अधिक वाचा..