शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा परिसरात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा प्रचार सध्या चांगलाच रंगात आला आहे. गावोगावी सभा, बैठका, संपर्क दौरे यामुळे संपूर्ण भागात राजकीय वातावरण तापले आहे. या निवडणूक प्रचाराला वेगळेच वळण मिळाले आहे ते अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे.
मांडवगण-वडगाव रासाई गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुजाता पवार, भारतीय जनता पक्षाचे सचिन शेलार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मच्छिंद्र गदादे आणि स्वाभिमानी विकास आघाडीचे दादापाटील फराटे यांच्यात जिल्हा परिषद सदस्य या पदासाठी थेट चौरंगी लढत आहे.
View this post on Instagram
अजित पवार यांच्या विमान अपघातामुळे शिरूर तालुक्यातील मतदार भावूक झाला असून, त्याचा थेट परिणाम राजकीय समीकरणांवर होताना दिसत आहे. दादांशी असलेले भावनिक नाते, त्यांच्या कार्याची आठवण आणि त्यांनी जपलेली विचारधारा यामुळे नागरिक या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.
मांडवगण फराटा भाग हा पारंपरिकदृष्ट्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानला जातो. येथे स्थानिक प्रश्न, विकासकामे, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण आणि रोजगार हे मुद्दे महत्त्वाचे ठरत असले तरी, यावेळी भावनिक मुद्द्यांनाही तितकेच वजन मिळताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या भावनिक लाटेचा प्रभावीपणे प्रचारात वापर करत आहे. स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि दादांचे निकटवर्तीय मतदारांशी थेट संवाद साधत असून, “दादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादीला संधी द्या” असा भावनिक संदेश दिला जात आहे.
View this post on Instagram
दुसरीकडे, भाजपनेही प्रचारात कोणतीही कसर सोडलेली नाही. केंद्र व राज्यातील सत्तेचा दाखला देत विकासकामांचा मुद्दा पुढे आणण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत भाजपचा प्रचार काहीसा बचावात्मक झाल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. परंतु, अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली सहानुभूतीची लाट भाजपसाठी मोठे आव्हान ठरत आहे.
अजित पवारांनंतर सत्तासंतुलन ढासळलं; सुनेत्रा पवारांसमोर चार मोठी आव्हान
जिल्हा परिषद निवडणूक! टाकळी हाजी जिल्हा परिषद गटाचा ऐतिहासिक, सामाजिक व राजकीय आढावा
शिरूर तालुक्यात ७ जिल्हा परिषद, १४ पंचायत समिती जागांसाठी थेट, चौरंगी व पंचरंगी लढती