‘स्मार्ट मीटर’वरून पुन्हा वाद; ग्राहकांचे प्रश्न, पारदर्शकतेची मागणी

वीजबिल, माहितीचा अधिकार आणि तक्रार निवारणावर ‘स्टेट ड्राईव्ह’मधून उपस्थित झाले प्रश्न मुंबई: राज्यात स्मार्ट मीटरच्या अंमलबजावणीवरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून वीज ग्राहकांच्या तक्रारी, वाढत्या वीजबिलांचा मुद्दा आणि पारदर्शकतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ज्येष्ठ पत्रकार राजन पारकर यांनी त्यांच्या ‘स्टेट ड्राईव्ह’ या सदरातून स्मार्ट मीटर योजनेबाबत विविध प्रश्न उपस्थित करत ग्राहकांच्या हक्कांवर भाष्य केले […]

अधिक वाचा..

बिश्नोई गँगवर सरकारला काँग्रेसचा घेराव; कायदा-सुव्यवस्थेवर विजय वडेट्टीवार यांचे गंभीर प्रश्न

मुंबई: राज्यात बिश्नोई गँगच्या नावावरून सुरू असलेल्या खंडणी, जीवे मारण्याच्या धमक्या आणि गोळीबाराच्या वाढत्या घटनांवरून विधानसभेत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरले. महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती चिंताजनक बनल्याचा आरोप करत त्यांनी गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. पिंपरी-चिंचवड येथील एका फर्निचर व्यावसायिकाच्या दुकानावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने सोशल मीडियावर […]

अधिक वाचा..

NEET घोटाळ्याने शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह; क्लास संस्कृती, पेपरफुटी आणि धोरणांवर तीव्र संताप

मुंबई: देशातील NEET परीक्षेभोवती निर्माण झालेल्या वाद आणि कथित गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मध्य प्रदेशातील Vyapam Scam प्रकरणाची आठवण करून देत अनेक सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक आणि पालकांनी सध्याच्या परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. स्पर्धा परीक्षांचे वाढते व्यापारीकरण, क्लासेसची वाढती पकड, सरकारी शाळा-महाविद्यालयांतील अपुरी […]

अधिक वाचा..

‘नमुना ७’मुळे बौद्ध समाजाची ३५ वर्षांची कोंडी?; अच्युत भोईटे यांचा राज्य सरकारला सवाल

मुंबई: “‘अनुसूचित जाती’चा विषय हा भारतीय चलनासारखा आहे. जशा चलनी नोटा छापण्याचा अधिकार फक्त रिझर्व्ह बँकेला आहे, तसाच अनुसूचित जातींची यादी निश्चित करण्याचा अधिकार केवळ संसदेला आहे. मग महाराष्ट्र सरकारने स्वतंत्र ‘नमुना ७’ काढणे म्हणजे स्वतःच्या चलनी नोटा छापण्यासारखे नाही का?” असा सवाल ‘द बुद्धिस्ट – शेड्यूल्ड कास्ट मिशन’चे अच्युत भोईटे यांनी उपस्थित केला आहे. […]

अधिक वाचा..

भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी? मिलिंद नार्वेकरांचा सवाल; नक्की काय चाललंय?”

मुंबई: मुंबई महानगरपालिकेतून (BMC) उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेची तब्बल २५ वर्षांची सत्ता खेचून आणल्यानंतर आता भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र दिसत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मुंबईत सत्ता मिळाल्यानंतरही भाजपमध्ये अंतर्गत गटबाजीला उधाण आले आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या चर्चांना शिवसेना ठाकरे गटाचे आमदार Milind Narvekar यांच्या […]

अधिक वाचा..

राज्यपालांच्या अभिभाषणावर काँग्रेसचा जोरदार हल्ला; ‘५ ट्रिलियन’ गप्पांवर विजय वडेट्टीवारांचा सवाल

मुंबई: राज्यपालांचे आजचे अभिभाषण म्हणजे जुन्याच २० मुद्द्यांची घासून-पुसून केलेली उजळणी असून हे सरकार राज्यपालांच्या तोंडी खोटे बोलायला लावत आहे, अशी जोरदार टीका काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. राज्यपालांच्या अभिभाषणाला काँग्रेसने विरोध दर्शवला. चर्चेदरम्यान वडेट्टीवार म्हणाले की, छत्रपती शिवराय, फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घ्यायचे आणि प्रत्यक्षात त्यांच्या विचारांचा अवमान करायचा, हे या […]

अधिक वाचा..

राहुल गांधींच्या प्रश्नांना भाजपकडून उत्तर, शरद पवार यांचा टोला काय? म्हणाले…

मुंबई: कॉग्रेस नेते राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर मत चोरीचा आरोप करत टीका केली. निवडणूक आयोगाने विरोधकांना, काँग्रेसला कधीच डिजिटल डेटा दिला नाही. एकाच व्यक्तीचं कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात मतदान केल्याचा गंभीर आरोप केला होता. मतचोरीच्या मुद्यावरून त्यांनी रान उठवत भाजप आणि निवडणूक आयोगावर हल्ला चढवला. त्यांच्या या […]

अधिक वाचा..

राहुल गांधींनी आयोगाला विचारलेल्या प्रश्नांना भाजपा कडून उत्तरे म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत फसवणूक, हेराफेरी आणि जनादेशाचे पद्धतशीर उल्लंघन करून लोकशाहीचे वस्त्रहरण कसे केले गेले हे राहुल गांधी यांच्या लेखातून तर्कसंगत मांडणी केलेली आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरच संशय बळावला असल्याने या गंभीर प्रश्नांची उत्तरे निवडणूक आयोगाने देऊन संभ्रम दूर करणे अपेक्षित असताना भाजपाकडून त्याची उत्तरे दिली जात आहेत हे आणखी गंभीर असून निवडणुकीत मॅच […]

अधिक वाचा..

राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतांच्या चोरीच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लेख लिहून काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत पण त्याची मिरची मात्र भाजपाला लागली. प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले आहेत, त्याची उत्तरे त्यांनी देणे अपेक्षित असताना भाजपा नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेख लिहून उत्तरे दिली आहेत. फडणवीस यांचा लेख हास्यास्पद असून राहुल गांधींनी […]

अधिक वाचा..

ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्य दलाचे अभिनंदन, पण युद्धबंदीवर उपस्थित प्रश्नांची उत्तरे केंद्र सरकार का देत नाही

मबई: देशाची एकता व अखंडता कायम रहावी यासाठी इंदिराजी गांधी व राजीवजी गांधी या दोन पंतप्रधानांनी बलिदान दिले. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय लष्कराच्या जवानांनी आपले रक्त सांडले. ऑपरेशन सिंदूरच्या शौर्याने सर्व देशबांधव भारतीय सैन्य दलाचे अभिनंदन करत आहेत, पण अचानक युद्धबंदी जाहिर करणारा डोनाल्ड ट्रम्प कोण? यासह संपूर्ण घटनाक्रमावर निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे केंद्र […]

अधिक वाचा..