भाजपा सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

वैजापूरच्या शेतकरी मेळाव्यात मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल; शेतकरी, महागाई, बेरोजगारी आणि स्मार्ट मीटरवरून टीका मुंबई: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय शेतकरी शांत बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. सपकाळ म्हणाले की, नरेंद्र […]

अधिक वाचा..

भाजप घरवापसीत रस नाही; शरद पवारांसोबतच राहणार; एकनाथ खडसे यांची स्पष्ट भूमिका

अमित शहांनी प्रवेशासाठी बोलावल्याचा दावा; राज्य भाजप नेतृत्वाने विरोध केल्याचा गौप्यस्फोट, गिरीश महाजनांवरही घणाघात मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी आपल्या भाजप घरवापसीच्या चर्चांना पूर्णविराम देत आपण शरद पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. “मला वैयक्तिकरित्या भाजपमध्ये परत जाण्यात कोणताही रस नाही. मी शरद पवारांसोबत आहे आणि […]

अधिक वाचा..

नवे पोलीस निरीक्षक, जुन्याच समस्या राहणार का? शिरूर तालुक्यात ‘ॲक्शन’ची प्रतीक्षा

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील शिरूर, शिक्रापूर आणि रांजणगाव गणपती या तीनही पोलीस ठाण्यांमध्ये नव्या पोलीस निरीक्षकांनी पदभार स्वीकारल्यानंतर नागरिकांच्या अपेक्षा पुन्हा एकदा उंचावल्या आहेत. कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम होईल, गुन्हेगारीवर आळा बसेल आणि अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत असली तरी केवळ अधिकारी बदलून परिस्थिती बदलेल का, हा प्रश्नही उपस्थित केला जात […]

अधिक वाचा..

महाशिवरात्रीला भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर भाविकांसाठी बंद; जिल्हा प्रशासनाचा निर्णय

भीमाशंकर: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले प्रसिद्ध भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर महाशिवरात्रीच्या दिवशी भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला असून, सध्या मंदिर परिसरात डागडुजी व दुरुस्तीचे काम सुरू असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे. दरवर्षी महाशिवरात्रीच्या निमित्ताने भीमाशंकर येथे राज्यासह देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी […]

अधिक वाचा..

बजेटनंतर बाजारात अस्थिरता, मात्र पेट्रोल-डिझेल दर स्थिर; सर्वसामान्यांना दिलासा

नवी दिल्ली: रविवार, १ फेब्रुवारी २०२६ रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. बजेट जाहीर होताच शेअर बाजारात मोठी अस्थिरता पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जोरदार चढ-उतार झाले, तर सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोने-चांदीच्या दरातही मोठी घसरण नोंदवली गेली. या पार्श्वभूमीवर आठवड्याच्या सुरुवातीला, सोमवार (दि. २ फेब्रुवारी) रोजी पेट्रोल-डिझेलच्या किंमती जाहीर […]

अधिक वाचा..

Video : घोड धरण लुटले जात असताना अधिकारी गप्प, महसूल यंत्रनेची कारवाई फक्त नावापुरती…?

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील घोड धरण परिसरात सुरु असलेला बेकायदेशीर वाळू उपसा “लपूनछपून” नव्हे, तर सर्वांच्या डोळ्यासमोर सुरु आहेत. तरीही महसुल विभागातील अधिकारी, पोलिस आणि स्थानिक राजकीय पुढारी यांची भुमिका संशयास्पद ठरत असून, ही मंडळी नेमकी कोणाच्या हितासाठी काम करत आहेत…? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. View this post on Instagram View […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात मतचोरीचा पहिला प्रयोग कामठीत; मतचोर सरकारला सत्तेतून खाली खेचूनच गप्प बसू; हर्षवर्धन सपकाळ

‘वोट चोर, गद्दी छोड’चा कामठीत दिलेला नारा देशभर पोहचला; लोकशाहीला हात घालणाऱ्यांना धडा शिकवू मुंबई: भारतीय जनता पक्ष मतचोरी करून सत्तेत आला आहे. महाराष्ट्रात मतचोरीचा पहिला प्रयोग भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी मतदार संघात झाला. ज्या कामठीत मतचोरीची सुरवात झाली त्या चोराला सर्वात आधी धडा शिकवला पाहिजे. वोट चोर, गद्दी छोड,चा पहिला धमाका […]

अधिक वाचा..

मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा? 

‘आता तरी उठा’ या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले… अहिल्यानगर: राज्यात सध्या मतदार यादीतील घोळ आणि निवडणूक आयोगावर विरोधकांकडून गंभीर आरोप होत आहेत. यातच पुण्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा उल्लेख करून एक बॅनर झळकला, त्यात अण्णा, आता तरी उठा अशा आशयाचे मजकूर लिहून त्यांच्यावर पुणेरी शैलीत टीका करण्यात आली होती. या बॅनरवर […]

अधिक वाचा..

हाडांना मिळणार बळकटी-दातही राहतील मजबूत, फक्त न चुकता खा कॅल्शियमयुक्त ५ पदार्थ

हाडे हे शरीराचा सर्वात महत्वाचा भाग. हाडांशिवाय शरीराची कल्पनाही करता येत नाही. आपले संपूर्ण शरीर हाडांच्या संरचनेवर अवलंबून असते. पण वयानुसार हाडं ठिसूळ होतात. ज्यामुळे हाडं कमकुवत तर होतातच, शिवाय गुडघे, कंबर, पाठ दुखण्याची समस्या वाढते. हाडे कॅल्शियम (Calcium), फॉस्फेट आणि इतर खनिजे साठवतात. जेव्हा शरीराला त्यांची गरज असते तेव्हा ते रिलीज करतात. मुख्य म्हणजे […]

अधिक वाचा..

आपत्ती काळात यंत्रणांनी सतर्क रहावे; मुख्य सचिव सुजाता सौनिक

मुंबई: आपत्ती काळात राज्य शासनामार्फत मदत व बचाव कार्य मोठ्या प्रमाणात करण्यात येते. आपत्तीमध्ये शासन व प्रशासन आपदग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण करणे गरजेचे आहे. संभाव्य आपत्तीचा धोका लक्षात घेता नागरी आणि आपत्ती व्यवस्थापनमध्ये काम करणाऱ्या यंत्रणांनी या काळात सतर्क राहण्याच्या सूचना मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिल्या. मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांच्या […]

अधिक वाचा..