छ. संभाजीनगरातील अनधिकृत भूखंड व बांधकामे होणार नियमित, नागरिकांसाठी सुवर्णसंधी

मुंबई: छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (CSMPDA) कार्यक्षेत्रातील अनधिकृत भूखंड आणि बांधकामे आता कायदेशीर होणार. महानगर आयुक्त तथा विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी याबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांच्या मदतीने होणार सर्वेक्षण शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी या सर्वेक्षणात सहभागी होणार आहेत. नागरिकांनी त्यांना पूर्ण सहकार्य करावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे. या बैठकीत महानगर […]

अधिक वाचा..

संभाजीनगरसह या तीन जिल्ह्यांत १.१० लाख पीक विमा अर्ज रद्द

मुंबई: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांमध्ये पंतप्रधान पीक विमा योजना – खरीप हंगाम २०२४ अंतर्गत तब्बल १,१०,७२९ पीक विमा अर्ज रद्द करण्यात आले आहेत. संभाजीनगर जिल्ह्यात २४७९ अर्ज रद्द छत्रपती संभाजीनगर: १४८ गंगापूर: १०४ कन्नड: ६८ खुलताबाद: ४५७ पैठण: ४९० फुलंब्री: २०५ सिल्लोड: ४१५ सोयगाव: ३२८ वैजापूर: २६४ जालना जिल्ह्यात ११,२३९ […]

अधिक वाचा..

संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर नष्ट करा

भारतीय संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी मुघल आणि ब्रिटिशांच्या प्रतीकांपासून देशाला मुक्त करा; खासदार नरेश म्हस्के यांची संसदेत मागणी नवी दिल्ली: भारतीय संस्कृतीशी काही देणेघेणे नसलेल्या, पारतंत्र्य आणि क्रूरतेची निशाणी असलेल्या मुघल आणि ब्रिटिशांच्या वारशांचे आपण गेली ७५ वर्ष `ऐतिहासिक’ या गोंडस नावाखाली जतन करत आलो आहोत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) च्या संरक्षणाखाली 3,691 स्मारके आहेत. परंतु […]

अधिक वाचा..

संभाजीनगरमध्ये रात्रीच्या अंधारात हातात कोयता घेऊन येतात अन्…

मुंबई: छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी भागात कोयता गँगने दहशत निर्माण केली आहे. दुकाने फोडण्याचे प्रकार, चोरी, आणि विनाकारण नुकसान करून गॅंगने व्यापाऱ्यांचे जीवन उध्वस्त करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. रात्रीच्या अंधारात दुकाने फोडण्याचे प्रकार गेल्या दोन दिवसांपासून बजाजनगर भागात गॅंगने हातात कोयता घेऊन 8-9 दुकाने फोडली. 1) काही दुकानांमधून माल […]

अधिक वाचा..

संभाजीनगर जिल्ह्यात पाच पेक्षा जास्त व्यक्ती जमण्यास मनाई आदेश जारी…

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी जनार्दन विधाते यांनी जिल्ह्यात मनाई आदेश जारी केले असून हे आदेश 15 जानेवारीपर्यंत अंमलात असतील. या आदेशाद्वारे जिल्ह्यात शस्त्र बाळगणे, विना परवानगी पाच पेक्षा अधिक व्यक्तिंनी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच, पाच पेक्षा जास्त व्यक्ती जमण्यासाठी, सभा, मिरवणूक, मोर्चा, ध्वनिक्षेपक वाजविण्यास […]

अधिक वाचा..

आदर्श पतसंस्थेतील 22 लाख बुडाल्याच्या भीतीतून शेतकऱ्याची आत्महत्या

संभाजीनगर: लाडगाव येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. आदर्श पतसंस्थेतील 22 लाख रुपयांची ठेव बुडाल्याच्या भीतीने 38 वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रामेश्वर नारायण इथर असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. रामेश्वर यांनी मुलीच्या शिक्षणाची आणि लग्नाची तजवीज म्हणून ही रक्कम आदर्श पतसंस्थेत जमा केली होती. रामेश्वर यांचे वडील नारायण यांच्या नावे साडेआठ लाख रुपये, […]

अधिक वाचा..

संभाजीनगर जिल्ह्यात एकाच दिवशी दोन खुनाच्या घटना उघडीस

पहिली घटना! दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने भाऊजीनेच केला मेहुण्याचा खून संभाजीनगर: कन्नड तालुक्यातील पिशोर जवळ असलेल्या तपोवन गावात दारूवरून भाऊजी-मेव्हण्यात झालेल्या वादात मेव्हण्याचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून झाल्याची घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी पिशोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रंजीत अंकुश माळी (वय ४५ रा.घुसर ता.कन्नड ह.मू. तपोवन शिवार) असे मृताचे नाव आहे. […]

अधिक वाचा..

संभाजीनगरातील ग्रीन झोनमध्ये बांधलेल्या 75 हजार मालमत्ता होणार नियमित…

संभाजीनगर: छ. संभाजीनगर शहराचा नवीन विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठीचा ईएलयू (सध्या असलेल्या जमिनीचा) नकाशा सोमवारी मनपा प्रशासकांसमोर सादर करण्यात आला. तेव्हा शहरातील ग्रीन झोनमधील सुमारे ७५ हजार मालमत्ता नियमित करण्याचा निर्णय प्रशासक जी. श्रीकांत यांनी घेतला. सन १९८२ मध्ये मनपाची स्थापना झाल्यावर आसपासची १८ गावे मनपा हद्दीत समाविष्ट करण्यात आली होती. […]

अधिक वाचा..

…तोपर्यंत छत्रपती संभाजीनगर नाव वापरणार नाही

राज्य सरकारची मुंबई हायकोर्टात हमी संभाजीनगर: राज्य सरकारने औरंगाबाद आणि ऊस्मानाबाद या दोन शहरांचे नामांतर केल्यानंतर आता मुंबई हायकोर्टामध्ये नामांतरासंदर्भात याचिकेवर सुनावणी झाली आहे. यावेळी कोर्टाच्या अंतिम सुनावणीवर्यंत राज्य सरकार बदललेली नावे वापरणार नाहीत, अशी आशा कोर्टाने व्यक्त केल्यानंतर औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर नाव वापरणार नसल्याची हमी राज्य सरकारने हायकोर्टाला दिली आहे. राज्य सरकारने औरंगाबाद […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजीनगर मधून दर ३६ तासाला १ पुरुष गायब

५ महिन्यात तब्बल २७९ पुरुष बेपत्ता… संभाजीनगर: गेल्‍या ५ महिन्यात संभाजीनगर शहरातील तब्‍बल २७९ पुरुषही घर सोडून गेले आहेत. त्‍यापैकी १४४ पुरुषांचा शोध पोलिसांनी लावला असून १३५ जण अजूनही बेपत्ता आहेत. विशेष म्‍हणजे पुरुषांच्‍या बेपत्ता होण्‍यामागे कौटुंबिक कलह, कर्जबाजारीपणा, अनैतिक संबंध, मानसिक आजार, नैराश्‍य, नापसंत मुलीशी विवाह करणे, वडिलांचे रागावणे, पालकांनी दुचाकी घेऊन न देणे […]

अधिक वाचा..