केंद्राच्या शाळांनाही नियमांचे बंधन हवे; राज्याने केंद्राशी समन्वय साधावा; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्यातील काही शाळांकडून विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानांमधूनच शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याच्या मुद्द्यावर विधानपरिषदेत गुरुवारी चर्चा झाली. प्रश्न क्रमांक ९३३८ अंतर्गत सदस्य सुधाकर अडबाले यांनी हा प्रश्न उपस्थित केला. यावेळी शिवसेना नेत्या व विधानपरिषद सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केंद्र सरकारच्या अखत्यारीतील शाळांनाही राज्यातील नियमांचे पालन बंधनकारक असावे, अशी मागणी केली. डॉ. […]

अधिक वाचा..

शाळा-महाविद्यालयांच्या दारातच नशेचा बाजार; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात

राजगुरूनगर: राजगुरुनगर शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा, मावा, सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री होत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि भवितव्यावर गंभीर परिणाम होत आहेत. कायद्यानुसार शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटर परिसरात अशा पदार्थांच्या विक्रीस बंदी असतानाही संबंधित यंत्रणांकडून प्रभावी कारवाई होत नसल्याची बाब समोर आली आहे. शाळांमध्ये ‘तंबाखूमुक्त’ फलक लावून जनजागृती केली जात असताना, […]

अधिक वाचा..

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे पालन होत नसल्याचे समोर आल्यानंतर राज्य शासनाने कठोर भूमिका घेतली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाईसह मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया निश्चित करण्यात आली असून यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मराठी भाषेच्या अध्यापनासाठी २०२० मध्ये लागू करण्यात आलेल्या […]

अधिक वाचा..

यंदा शाळेला ४४ दिवसांची उन्हाळी सुट्टी जाहीर- पहिली ते नववीची परीक्षा २० एप्रिलपासून

औरंगाबाद: जिल्हा परिषद तसेच खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात येणार आहे. परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना तब्बल ४४ दिवसांची उन्हाळी सुट्टी मिळणार असून शाळा १५ जूनपासून पुन्हा सुरू होतील. अंतिम सत्र परीक्षा कधी होणार जिल्हा परिषदेच्या २,७९५ शाळांसह खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील इयत्ता पहिली ते नववीच्या […]

अधिक वाचा..

राजे यशवंतराव होळकर निवासी शाळांवरून बहुजन कल्याण विभागात वाद; सचिवांचा आदेश धाब्यावर?

मुंबई: धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या बहुजन कल्याण विकास विभाग अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शिक्षण योजना संदर्भात मोठा प्रशासकीय वाद निर्माण झाला आहे. सचिवांनी २५ निवासी शाळांची मान्यता नाकारत कठोर आदेश दिल्यानंतरही विभागाच्या संचालकांकडून पुन्हा गुणवत्ता तपासणीचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. २५ शाळांवर निधी […]

अधिक वाचा..

पुण्यात सोमवारी काही रस्ते बंद, काही शाळा-कॉलेजेसना सुट्टी

2026 पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश पुणे: शालेय विद्यार्थी, पालक तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. 2026 पुणे ग्रँड चॅलेंज टूर या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेमुळे सोमवारी (दि. 19 जानेवारी) पुणे शहरातील काही प्रमुख रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शहरातील काही भागांमधील शाळा, कॉलेजेस आणि शैक्षणिक संस्थांना एका दिवसाची […]

अधिक वाचा..

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा गरजेनुसार उपयोग व्हावा; दादाजी भुसे

मुंबई: राज्यात एक लाखांहून अधिक शाळांमधून दोन कोटींपेक्षा अधिक विद्यार्थी शालेय शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना राष्ट्र प्रथम या संकल्पनेवर आधारित गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षण दिले जाते. शासनाच्या माध्यमातून शाळांमध्ये विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. याचबरोबर विविध उद्योग सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या (सीएसआर) माध्यमातून देखील सहकार्य करतात. यामध्ये सुसूत्रता आणून शाळा आणि विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार हा […]

अधिक वाचा..

गणेशोत्सवासाठी शाळांना किती दिवसांची सुट्टी, पालक आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती

पुणे: गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून, या उत्सवासाठी शाळांना किती दिवस सुट्टी मिळणार याबद्दल पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. यंदा गणेशोत्सव २७ ऑगस्टपासून सुरू होत असून, ६ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन होणार आहे. या ११ दिवसांच्या उत्सवादरम्यान शाळांना मिळणाऱ्या सुट्ट्यांबाबत सविस्तर माहिती खालीलप्रमाणे मुंबई आणि कोकणातील शाळांना किती सुट्ट्या मुंबई आणि कोकणामध्ये गणेशोत्सव मोठ्या […]

अधिक वाचा..

शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान

मुंबई: महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र लागू करणारच अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी मांडली. त्यावर मीरारोडच्या सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी समाचार घेतला. तुम्ही हिंदी सक्ती करून दाखवाच, आम्ही दुकाने काय शाळाही बंद करू असं राज यांनी म्हटलं. राज ठाकरे यांच्या या विधानावरून मंत्री नितेश राणे यांनी पलटवार केला आहे. मंत्री नितेश राणे […]

अधिक वाचा..

राज्यातील शाळांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी भरती आता कंत्राटी पद्धतीने

संभाजीनगर: राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय समोर आला आहे. आता शाळांमधील शिपाई, मदतनीस, सफाई कामगार, वॉचमन अशा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती कायमस्वरूपी न होता कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधानपरिषदेत याची अधिकृत घोषणा केली आहे. काय आहे नवीन भरती पद्धत यापुढे सर्व शाळांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर नियुक्त केले जातील. जे […]

अधिक वाचा..