कारेगाव गणात ‘तुतारी’ विरुद्ध ‘घड्याळ’ शरद पवार आणि अजित पवार गटाचे उमेदवार थेट आमने-सामने

रांजणगाव गणपती (तेजस फडके): राज्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजताच शिरुर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फाटाफुटीनंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महानगरपालिकेत दोन्ही गटांनी समन्वय साधत एकत्र निवडणुक लढवण्याचा प्रयत्न केला.पण तरीही शिरुर तालुक्यात कारेगाव पंचायत समिती गण हा त्याला अपवाद ठरत आहे. या गणात शरद पवार […]

अधिक वाचा..

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अनेक पक्षांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला जाहीर पाठिंबा

मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए), रिपब्लिकन पक्ष (खोरिपा) आणि ब्लॅक पँथर या पक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला जाहीर पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांची परंपरा जपणाऱ्या या पक्षाला मिळालेल्या पाठिंब्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सर्व सहकारी पक्षांचे आभार मानले. भविष्यातील सर्व निवडणुका […]

अधिक वाचा..

मराठा-ओबीसी आरक्षणावर शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले…

मुंबई: हैद्राबाद गॅझेट’च्या अंमलबजावणीवरून राज्यात वादळ उठले असताना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे.नाशिकमधील कार्यकर्ता शिबिरात बोलताना त्यांनी आरक्षण प्रश्नावर राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पवार म्हणाले, आरक्षणाबाबतची चर्चा सर्वत्र सुरू आहे. या प्रश्नाचा सखोल अभ्यास करण्याची गरज आहे; पण राज्य सरकारचा दृष्टिकोन स्पष्ट नाही. परवा सरकारने […]

अधिक वाचा..

शरद पवारांना कट्टर समर्थकाचा मोठा धक्का

मुंबई: लोकसभेच्या पाठोपाठ विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) मधील अनेक माजी मंत्री व माजी आमदार यांच्यासह नेत्यांनी पक्षातून काढता पाय घेतला आहे. यातून पक्ष सावरला नसतानाच आता शरद पवार यांचे कट्टर समर्थक व निष्ठावंत समजले जाणारे विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी देखील पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, अद्याप […]

अधिक वाचा..

मुंबईत खड्डेमय उड्डाणपुलांविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

मुंबई: सोमवार (दि. 25) ऑगस्ट मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून दररोज लाखो नागरिक येथे प्रवास करतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील बहुतांश उड्डाणपूल व रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत. हे उड्डाणपूल महाराष्ट्र राज्य मार्ग विकास महामंडळ (एम.एस.आर.डी.सी.) च्या अखत्यारीत येतात. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचून वाहतुकीची भीषण कोंडी निर्माण होते. यामुळे दररोज […]

अधिक वाचा..

उपराष्ट्रपती पदासाठी राधाकृष्णन यांना पाठिंबा नाही; शरद पवार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनी करून उपराष्ट्रपती पदासाठी भाजप आघाडीचे उमेदवार, महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्याची विनंती केली असली तरी ते आमच्या विचाराचे नसल्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा देणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. राधाकृष्णन हे झारखंडचे राज्यपाल असतानाच मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना राजभवनात अटक करण्यात […]

अधिक वाचा..

फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; म्हणाले…

मुंबई: उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना मत द्यावे, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोनवरून केली. भाजपच्या सूत्रांनी व उद्धवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल असून इथले मतदार आहेत. आपले राज्यपाल उपराष्ट्रपती होत असताना आपल्या […]

अधिक वाचा..

वसंतदादांनी तेव्हा शरद पवारांना फक्त मुख्यमंत्रीच केलं नाही तर ‘हा’ आशीर्वादही दिला…

सोलापूर: वसंतदादा पाटील यांचे सरकार शरद पवार यांनी त्या वेळच्या राजकीय परिस्थितीनुसार पाडले होते. पण त्यानंतर दहा वर्षांनी वसंतदादा पाटील यांनी शरद पवार यांना केवळ मुख्यमंत्रिपदच दिले नव्हते, तर राजकारणात इथून पुढे सर्व शक्ती आणि ताकद शरद पवारांच्या पाठीशी उभी करां, ते महाराष्ट्राचे भवितव्य घडवतील, असा आशीर्वादही दिला होता, त्यावेळी झालेल्या सभेचा मी साक्षीदार आहे, […]

अधिक वाचा..

शरद पवार यांनी पहिल्यांदाच वापरले असे शब्द; आघाडीत ‘राज’ पर्व?

मुंबई: ठाकरे बंधू एकत्र येण्याविषयी आता शरद पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांच्या वक्तव्याने महाविकास आघाडीत राज पर्व सुरू होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. थोड्यावेळी पूर्वी काँग्रेसच्या गोटातूनही तसेच संकेत मिळाले. विजय वडेट्टीवार यांनी दोघांच्या एकत्र येण्याविषयी आशावाद व्यक्त केला. तर खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीला त्यांच्या एकत्र येण्याने काही अडचण होणार […]

अधिक वाचा..

राहुल गांधींच्या प्रश्नांना भाजपकडून उत्तर, शरद पवार यांचा टोला काय? म्हणाले…

मुंबई: कॉग्रेस नेते राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर मत चोरीचा आरोप करत टीका केली. निवडणूक आयोगाने विरोधकांना, काँग्रेसला कधीच डिजिटल डेटा दिला नाही. एकाच व्यक्तीचं कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात मतदान केल्याचा गंभीर आरोप केला होता. मतचोरीच्या मुद्यावरून त्यांनी रान उठवत भाजप आणि निवडणूक आयोगावर हल्ला चढवला. त्यांच्या या […]

अधिक वाचा..