कोरेगाव भीमात व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे कमलेश भोसले हा रात्रीच्या सुमारास जेवण करुन घरात झोपला होता. सकाळच्या सुमारास कमलेश दरवाजा उघडत नसल्याने त्याच्या आई सह आदींनी खिडकीतून पाहिले असता कमलेश राजू भोसले (वय ३७) रा. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) जि. पुणे याने दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. याबाबत जितेंद्र विजय गाडेकर (वय […]

अधिक वाचा..

निमोणे येथे विहिरीत एका युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ 

निमोणे (तेजस फडके): निमोणे (ता. शिरुर) येथील निलायम हॉटेलच्या पाठीमागे असणाऱ्या एका विहिरीत पडून सुनिल शिवाजी थोरात (वय २८ वर्षे) रा. गुनाट (ता. शिरुर) जि. पुणे हा युवक मरण पावला असुन नक्की हा मृत्यू कशामुळे झाला हा घातपात आहे की अजुन काही याची चौकशी पोलिस करत आहेत. याबाबत बाप्पु शिवाजी थोरात यांनी शिरुर पोलिस स्टेशन […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या शेतीसाठी दिवसा विजेच्या मागणीला महावितरणचा खोडा…

बिबटयाच्या सततच्या हल्ल्याने शेतकरी बेजार… शिरुर (अरुणकुमार मोटे): ओ साहेब… शेतीला दिवसा वीज देता का वीज… अशी आर्त हाक शेतकरी अनेक दिवसांपासून देत असून ही मागणी महावितरणकडून अद्याप पुर्ण होऊन शकल्याने रात्रीच्या वेळी अश्रू ढाळत जीव मुठीत धरून शेताला पाणी देण्यासाठी जात आहे. शिरुर तालुक्यात बिबट्याचे वाढते हल्ले, सर्पदंश आणि बदलते हवामान या अस्मानी संकटांचा […]

अधिक वाचा..

श्रीगोंदयातील दुध भेसळ प्रकरणी शिरुर कनेक्शन उघड

शिरुर (अरुणकुमार मोटे): श्रीगोंद्यातील काष्टी येथील दुध भेसळीमध्ये पुणे जिल्हयातील शिरूरच्या कैलास बालाजी लाळगे सह जुन्नर तालुक्यातील उंब्रज येथील वैभव हांडे याला श्रीगोंदा पोलिसांनी अटक केली आहे. दूध हे प्रत्येक सर्वसामान्यांच्या जीवनातील एक अत्यावश्यक व अविभाज्य घटक आहे. अगदी लहान बाळापासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच दूध पिण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. तसेच अनेक खाण्याचे पदार्थ बनवण्यासाठी […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात मारहाण करत युवकाचा मोबाईल लांबवला

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बजरंगवाडी येथे रात्रीच्या सुमारास कामावरुन आलेल्या कामगाराला तिघांनी मारहाण करत त्याचा मोबाईल लांबवल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तिघा युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बजरंगवाडी येथे कृष्णा पवार हा युवक रात्री 11 वाजण्याच्या सुमारास कंपनीतून कामावरून परत आला. रस्त्यावर उभा राहून […]

अधिक वाचा..

धामारीत मुलाच्या उसन्या पैशावरुन आई वडिलांना मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): धामारी (ता. शिरुर) येथे मुलाला दिलेल्या उसन्या पैशाच्या वादातून मुलाच्या आई वडिलांना मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गणेश चांगदेव पावसे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. धामारी (ता. शिरुर) येथील अक्षय शेळके याने गावातील गणेश पावसे याच्याकडून काही पैसे उसने घेतले होते, त्यांनतर गणेश हा अक्षयच्या घरी […]

अधिक वाचा..

अदानी उद्योगातील २० हजार कोटी रुपयांची चौकशी करण्याची हिम्मत मोदींनी दाखवावी

मुंबई: मोदी सरकारने मागील ९ वर्षात मित्रोंसाठी काम करत जनतेचा पैसा त्यांच्या खिशात घालण्याची व्यवस्था केली आहे. देशातील सर्व सरकारी उद्योग, कंत्राटे फक्त अदानींनाच बहाल केली आहेत. अदानी समुहात २० हजार कोटी रुपये शेल कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवण्यात आले आहेत. हा पैसा कुठून आला? हाच प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. हे २० हजार कोटी […]

अधिक वाचा..

मराठी मनोरंजन सृष्टीच्या विकासासाठी शासनाचे ऑनलाईन फिल्म बाजार पोर्टल लवकरच सुरु होणार

मुंबई: राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपट महोत्सवात फिल्म बाजार या संकल्पनेअंतर्गत लेखक, दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञ यांना एकत्र आणून सुलभ चित्रपटनिर्मितीच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही मराठी चित्रपटांशी संबंधित व्यक्ती, संस्था यांना एकत्र आणत चित्रपट निर्मितीपासून ते वितरणापर्यंतच्या सोयीसुविधा एकाच छताखाली उपलब्ध करुन देणारे शासकीय पोर्टल लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची माहिती शुक्रवारी दादासाहेब फाळके […]

अधिक वाचा..

सामाजिक उपक्रम राबवून जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करा; डॉ. नीलम गोऱ्हे

सातारा शिवसेना जिल्हा पदाधिकाऱ्यांची घेतली बैठक  सातारा: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी सामाजिक उपक्रमांनी जनतेला जोडून घ्या. समाजाच्या कामाच्या माध्यमातून आपली प्रतिमा तयार करता येतील. या माध्यमातून आपल्या भागातील प्रश्न सोडविण्यावर लक्ष केंद्रित करा, असे प्रतिपादन आज विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी येथे केले. आज त्यांनी सातारा शासकीय विश्रामगृह येथे येथे शिवसेना जिल्हा […]

अधिक वाचा..

जनहितार्थ महसूल विभागाचा महत्वाचा निर्णय, रेडी रेकनरच्या दरात कोणतीही वाढ नाही

मुंबई: रेडी रेकनरच्या दरात कोणतीही वाढ न करता राज्यातील जनतेला दिलासा देण्याचा निर्णय महसूल विभागाच्या माध्यमातून घेण्यात आल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी सांगितले. या जनहितार्थ निर्णयामुळे जनतेला दिलासा मिळेल, असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे. वार्षिक बाजार मुल्य दर म्हणजेच रेडी रेकनरचे दर प्रत्येक वर्षी 1 एप्रिल रोजी जाहीर करण्यात येतात. […]

अधिक वाचा..