रामलिंग महीला उन्नती तर्फे महिलादिनी विटभट्टी कामगार महिलांची मोफत आरोग्य तपासणी

शिरुर (किरण पिंगळे) 8 मार्च हा दिवस सगळीकडे जागतिक महिला दिन म्हणुन साजरा केला जातो. परंतु समाजात असे काही वंचित घटक आहेत. ज्यांना महिला दिन म्हणजे काय आणि हा नक्की का साजरा केला जातो हे माहीत नसते. समाज्यातील कष्टकरी विटभट्टी कामगार महिला नेहमी कामात व्यस्त असतात त्यामुळे त्यांना स्वतः कडे लक्ष द्यायला वेळ नसतो. त्यामुळे […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांची ‘जगावे की मरावे’ अशी परिस्थिती; अजित पवार

मुंबई: अवकाळीने ‘जगावे की मरावे’ अशी परिस्थिती शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे त्यामुळे सरकार शेतकऱ्यांना काय मदत देणार आहे हे तात्काळ जाहीर करावे अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृह सुरू होताच केली. गेल्या दोन दिवसात नाशिक, धुळे, बुलडाणा, पालघर, बीड, जालना, पुणे, अहमदनगर, वाशिम, सोलापूर व राज्यातील इतर भागात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने काढणीला […]

अधिक वाचा..

हिंदू देवस्थानांच्या जमिनी हडपप्रकरणी जयंत पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना घेरले…

मुंबई: हिंदू देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचा प्रकार आपण कोणीही खपवून घेऊ शकत नाही. या प्रकरणात तक्रारदाराचे सरंक्षण केले पाहिजे होते मात्र उलट सरकार बदलल्यानंतर तक्रारदाराचे संरक्षण काढण्यात आले, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. ही बाब अयोग्य आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना सभागृहात घेरले आणि […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारच्या संवेदना बोथट; अजित पवार

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन विरोधी पक्षांनी केला सभात्याग… मुंबई: अवकाळी पाऊस, गारपीटीने राज्यातील शेतकरी अडचणीत असताना मुख्यमंत्री धुळवड खेळण्यात दंग होते असा थेट आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. नाफेडकडून अजूनही शेतमाल खरेदी सुरु नाही, सरकारकडून सभागृहाची दिशाभूल करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नी सरकारच्या संवेदना बोथट झाल्या आहेत असा आरोप करत शेतकऱ्यांच्या […]

अधिक वाचा..

वडनेर येथून तब्बल दहा शेतकऱ्यांच्या विदयुत मोटारी, केबल चोरीला

शिरुर (अरुणकुमार मोटे): वडनेर खुर्द (ता. शिरूर) येथून एकाच वेळी दहा शेतकऱ्यांच्या मोटारी,केबल आणि पॅनल बॉक्स चोरी गेले आहेत. चोरीचे एकामागून एक प्रकार घडत असल्याने या परिसरातील नागरिक असुरक्षित असल्याची भावना निर्माण झाली आहे. या भागात चोऱ्या वारंवांर घडत आहे. याच आठवड्यात चोरट्यांनी टाकळी हाजी ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाजूलाच लावलेल्या शववाहिनी (स्वर्ग रथ) वाहनाच्या बॅटरी वर […]

अधिक वाचा..

औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर कारवाई होणार

मुंबई: संभाजीनगर मध्ये काही लोकांकडून नामंतराच्या मुद्द्यावरून औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी आज विशेष बाब अंतर्गत मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर कारवाई होणार, अशी ग्वाही दानवे यांच्या मागणीवर सरकारकडून देण्यात आली. तसेच आंदोलनकर्त्यांकडून कोणतीही वेळ न पाळता रात्री १२ वाजेपर्यंत घोषणाबाजी करून […]

अधिक वाचा..

अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार

मुंबई: राज्यात अवकाळी पावसामुळे आठ जिल्ह्यांत सुमारे १३ हजार ७२९ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रस्ताव तातडीने मागविण्यात आले असून त्यांना तात्काळ मदत देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य नाना पटोले, छगन भुजबळ यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करताना उपमुख्यमंत्री […]

अधिक वाचा..

म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतीस पूर्वीप्रमाणेच सेवा शुल्क आकारण्यात येणार

मुंबई: मुंबईतील म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतींच्या डागडुजीवर होणारा खर्च, मालमत्ता कर, जल आकार आणि सामायिक विद्युत देयक यासाठी प्रति महिना साधारणपणे दोन हजार रुपये इतका खर्च येतो. या खर्चासाठी मार्च २०१९ पर्यंत २५० रुपये प्रति महा इतके सेवाशुल्क करण्यात येत होते. मात्र एप्रिल २०१९ पासून यामध्ये वाढ करून ५०० रुपये प्रति महिना इतके सेवाशुल्क आकारण्यात येत […]

अधिक वाचा..

हृदयरोगावरील आपत्कालीन प्रक्रियेसाठी बाळाने केला मॉरिशस ते नवी मुंबई ४६०० किमीचा प्रवास

मॉरिशस मधील बाळावर नवी मुंबई अपोलोत झाली हृदय क्षस्त्रक्रिया नवी मुंबई: अकाली जन्मलेल्या आणि जन्मजात गंभीर हृदयरोग आणि मूत्रपिंड पूर्णपणे निकामी झालेल्या मॉरिशस येथील १० दिवसांच्या बाळाला नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथे हृदयरोगावरील जीवनदान देणारी प्रक्रिया करण्यासाठी ४६०० किमी अंतर पार करून भारतात आणण्यात आले. मॉरिशसमध्ये स्टेबलायझेशन (स्थिरीकरण) झाल्यानंतर बाळाला पुढील उपचारांसाठी नवी मुंबईतील अपोलो […]

अधिक वाचा..

राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला नाही हे पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव…

राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ;सरकारने नराधमांवर जरब बसवावी… मुंबई: महिलादिनी तरी राज्याच्या मंत्रिमंडळात महिला आमदारांना संधी मिळेल अशी अपेक्षा होती मात्र ती फोल ठरली. मंत्रिमंडळात एकही महिला प्रतिनिधी नसणे हे पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्देव आहे अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. दरम्यान राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली असल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधत […]

अधिक वाचा..