कापसाच्या दरात वाढ होणार? पण कधी? जाणून घ्या…

औरंगाबाद: सध्या महाराष्ट्रात कापसाच्या दरात सातत्यानं घसरण होत आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाच्या दरात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळं काही शेतकऱ्यांनी कापसाची विक्री न करता कापूस घरातच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, अभ्यासकांच्या माहितीनुसार कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी मार्च-एप्रिलमध्ये कापसाच्या दरात वाढ झाली […]

अधिक वाचा..

प्रदेश काँग्रेसचे उद्या ६ तारखेला राज्यातील एसबीआय, एलआयसी कार्यालयासमोर आंदोलन…

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती मित्र गौतम अदानी यांच्या उद्योग समुहात एसबीआय, एलआयसी व इतर सरकारी वित्तिय संस्थांचा पैसा नियम डावलून गुंतवला. अदानी समुहातील ही गुंतवणूक आता धोक्यात आली असून जनतेचा पैसा बुडण्याची भिती निर्माण झाली आहे. हा पैसा सुसक्षित रहावा व अदानीच्या गैरकारभाराची चौकशी करावी या मागणीसाठी प्रदेश काँग्रेस उद्या सोमवारी ६ फेब्रुवारीला […]

अधिक वाचा..

शिरुरमधील सराईत सोनसाखळी चोर साताऱ्यातून घेतला ताब्यात

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरात (दि ३०) डिसेंबर रोजी ८:४० वाजल्याच्या सुमारास भरदिवसा चैन स्नॅचींगचा प्रकार घडला होता. यातील आरोपीस शिरुर पोलिसांनी जंग जंग पछाडत सातारा येथून मोठया सीताफीने अटक केली असुन त्यास न्यायालयात हजर केले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, शिरुर नवीन नगरपालिका, कोंडे हॉस्पीटल समोरील रोडवर आशा मारुती गरगटे (वय ६७) रा. […]

अधिक वाचा..

पिंपरखेडमध्ये एक मादी बिबट जेरबंद, बिबटयाची दहशत कायम

शिरुर (अरुणकुमार मोटे): पिंपरखेड (ता. शिरुर) येथे बिबट्याने महिलेवर हल्ला केलेल्या परिसरात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात 6 ते 7 वर्षाची मादी जातीचा बिबट्या जेरबंद झाला आहे. एक बिबट जेरबंद झाला असला तरी ‘भय इथले संपत नाही’ अशी परीस्थिती येथील परिसरात कायम असून बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने बिबट्यांचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान वनविभागासमोर उभे टाकले आहे. […]

अधिक वाचा..

ज्ञानदेवी स्वयंसेवी संस्थेच्या कामावर आधारित या पुस्तकातुन प्रेरणादायक प्रयत्नांची दिशा मिळेल

पुणे: अनेकदा कायद्यांच्यामध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी विधिमंडळात काम करावे लागते. कित्येक तालुक्यात स्वयंसेवी संस्था नाहीत. तेंव्हा शासनाला काम करावे लागते. चांगल्या अधिकाऱ्यांमुळे कामाला गती येते. सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठा यामुळे येणार्‍या दबावाला झुगारून स्वयंसेवी संस्थांनी विधायक काम उभे केले ही पुण्यातील संस्थांच्या कामाची पावती आहे. प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला बालहक्कांची सनद जाहीर व्हावी. ज्ञानदेवी स्वयंसेवी संस्थेच्या […]

अधिक वाचा..

जर्मनीची कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यास महाराष्ट्र उत्सुक

मुंबई: “जर्मनीला विविध क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. महाराष्ट्र या कामी सहकार्य करण्यास उत्सुक असून यासाठी नियोजनबद्ध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करु”, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले. विविध क्षेत्रातील परस्पर सहकार्यासाठी जर्मनीचे शिष्टमंडळ मुंबईत आले आहे. आज या शिष्टमंडळासह मुंबईत झालेल्या एका परिषदेत केसरकर बोलत होते. यावेळी जर्मनीच्या बाडेन वृटेमबर्गचे राज्यमंत्री डॉ. […]

अधिक वाचा..

प्रियंका धोत्रे यांची मानव विकास परिषदेच्या युवती शिरुर तालुका अध्यक्षपदी निवड 

शिरुर (किरण पिंगळे): शिरुर येथील सामाजिक कार्यकर्त्या प्रियंका अशोक धोत्रे यांची मानव विकास परिषदेच्या युवती शिरुर तालुका अध्यक्षपदी निवड झाली आहे. प्रियंका धोत्रे या गेल्या दहा वर्षांपासुन शिरुर तालुक्यातील पहिले ढोल ताशा पथक आणि युवा वाद्य पथक चालवत असुन आठ वर्षांपासुन शिरुर शहरामध्ये युवा स्पंदन ही सामाजिक संस्था चालवत आहेत. या संस्थेच्या मार्फत त्यांनी रक्तदान […]

अधिक वाचा..

माता रमाई यांची जयंती शासकीय स्तरावरुन साजरी करावी…

मुंबई: ७ फेब्रुवारी रोजी येणारी माता रमाई यांची जयंती यावर्षीपासून शासकीय स्तरावरुन साजरी करण्याचे निर्देश यंत्रणेला द्यावेत, अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जडणघडणीत पत्नी त्यागमूर्ती माता रमाई यांचा खुप मोठा वाटा आहे. त्यांच्याप्रती समाजामध्ये खुप आदर व आपुलकी […]

अधिक वाचा..

अखिल भारतीय साहित्य संमेलनात प्रकाशक वाऱ्यावर!

मुंबई: वर्धा येथे ९६ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडत आहे. मात्र साहित्य संमेलनामध्ये केवळ साहित्यिकाची गर्दी दिसत असून इथे जवळपास ३५० स्टॉल लागले आहेत. मात्र या स्टॉल धारकांना सोयी सुविधा देखील आयोजकांनी पुरवल्या नाहीत त्यामुळे स्टॉल धारकांमध्ये नाराजी आहे. सरकारने यावर्षी साहित्य संमेलना दोन कोटीचे अनुदान दिले आहे. इथे जवळपास ३५० स्टॉल आहेत […]

अधिक वाचा..

सत्यजित तांबेंनी काँग्रेस पक्षावर केलेले आरोप चुकीचे व तथ्यहिन…

तांबेंनी वेळेवर अर्ज दाखल का केला नाही? शेवटपर्यंत ते कोणाची वाट पहात होते? मुंबई: नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवाराला काँग्रेस पक्षाने कोरे AB फॉर्म पाठवले होते व पाठवलेले कोरे एबी फॉर्म योग्य तेच होते. हे एबी फॉर्म मिळाल्याचा ‘ओके’ असा मेसेजही विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांचे ओएसडी सचिन गुंजाळ यांनी मोबाईलवरून पाठवला होता, त्यामुळे […]

अधिक वाचा..