मोरबी नदीवरील झूलता पुल कोसळल्याने नदीत बुडून 134 हुन अधिक लोकांचा मृत्यू…

गांधीनगर: गुजरातमध्ये रविवारी सायंकाळी मोठी दुर्घटना घडली. मोरबी येथील मच्छू नदीवरील झुलता पूल कोसळल्याने नदीत बुडून आतापर्यंत 134 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. या घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. इतकी मोठी दुर्घटना नेमकी कशी घडली? असा सवाल उपस्थित केला जात होता. आता या प्रकरणात मोठी माहिती समोर आली […]

अधिक वाचा..

मुंबई महापालिकेतील फक्त २ वर्षांच्या नाहीतर मागील २५ वर्षांतील कामांची चौकशी करा…

मुंबई: राज्यातील भाजपाप्रणित सरकारने मुंबई महानगरपालिकेतील मागील 2 वर्षांतील कामांची कॅग मार्फत चौकशी करण्याचे दिलेले आदेश हे राजकीय द्वेषातून दिलेले आहेत. भारतीय जनता पक्ष स्वतःच भ्रष्टाचारात लिप्त झालेला असून आरोप मात्र विरोधी पक्ष व विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या संस्थांवर करत आहेत. भाजपाला खरेच भ्रष्टाचार निपटून काढायचा असेल तर फक्त २ वर्षांची चौकशी कशाला करता मागील […]

अधिक वाचा..

फेसबुकवरील मित्राच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा…

औरंगाबाद: विभक्त होऊन देखील पती सतत त्रास देत असल्याने पत्नीने पतीची निर्घुण हत्या केल्याची घटना औरंगाबादमध्ये समोर आली असून 12 वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या पत्नीने मित्राच्या मदतीने पतीचा काटा काढल्याची घटना घडली आहे. पतीला मनसोक्त दारु पाजून त्याच्या पोटात चाकूने वार करीत पत्नीने त्याचा काटा काढला असल्याचे पोलीस तपासात समोर आले असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले […]

अधिक वाचा..

आता थकीत वीजबिलापोटी वीज कनेक्शन कट होणार नाही…

औरंगाबाद: आधीच आस्मानी-सुलतानी संकटांनी भांबावलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य अन्न सुरक्षा आयोगाने शेतकऱ्यांसाठी मोठा निकाल दिला आहे. त्यानुसार, थकीत वीजबिलापोटी आता कोणत्याही शेतकऱ्याची वीज आता महावितरणला कापता येणार नाही. आयोगाने महावितरणला तसा सूचना वजा आदेशच दिला आहे. थकीत वीजबिलाच्या मुद्द्यावरुन अनेकदा महावितरणकडून शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला जात होता. त्याविरोधात लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने […]

अधिक वाचा..

पोलीस भरतीला स्थगिती..! नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती पुढे ढकलली…

औरंगाबाद: राज्यभरात एक नोव्हेंबरपासून तब्बल 14956 पदांसाठी भरती होणार होती. याला तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती दिली आहे. या भरतीबाबत पुढील आठवड्यात निर्णय घेण्यात येणार आहे. त्याशिवाय राज्य राखीव दलातील (एसआरपीएफ) पोलीस शिपाई भरतीही पुढे ढकलण्यात आली आहे. आज स्थगिती देण्यात आलेली भरतीबाबतचा निर्णय पुढील आठवड्यात घेण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासकिय कारणास्थव पोलीस भरतीच्या जाहिरातीला स्थगिती […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल…

मेष: आज कौटुंबिक वाढीचे संकेत असतील. म्हणजेच आज तुमच्या घरी पाहुणे येऊ शकतात. एवढेच नाही तर आज सरकारी कामात यश मिळू शकते. तसेच तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. सतत नवीन अडचणींमुळे त्रास होईल. वृषभ: आजचा दिवस तुम्हाला परदेश आणि गुंतवणुकीच्या बाबतीत अचानक लाभ देणारा असेल. एवढेच नाही तर आज सर्व संकटातही तुमचे मित्र […]

अधिक वाचा..

खुशखबर! रस्त्यावरील वाहतूक कोंडी पाहता शहरात लवकरच धावणार मेट्रो…

औरंगाबाद: औरंगाबाद शहरातील वाढती लोकसंख्या आणि जालना रोडवरील होणारी वाहतूक कोंडी पाहता शेंद्रा ते वाळूज एमआयडीसी असा अखंड 25 किलोमीटरचा उड्डाणपूल बांधण्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एप्रिलमध्ये केली होती. त्यामुळे याच प्रकल्पात साडेआठ किमी अंतराचा डबल डेकर उड्डाणपूल उभारुन त्यावर मेट्रो सेवा सुरु करण्याचे नियोजन महामेट्रोकडून करण्यात आले होते दरम्यान, भागवत […]

अधिक वाचा..

Video: आम्ही चर्चेला कधीही तयार, वेळ आणि ठिकाण तुम्हीचं सांगा: सुधीर फराटे

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील न्हावरे येथील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असुन घोडगंगा किसान क्रांती पॅनलचे दादा पाटील फराटे यांनी अशोक पवार यांच्यामुळेच घोडगंगा कारखान्यावर 450 कोटी रुपये कर्जाचा बोजा झाल्याचा आरोप केल्यानंतर शेतकरी विकास पॅनलचे अशोक पवार यांनी हा आरोप फेटाळत जर घोडगंगा कारखान्यावर 450 कोटी […]

अधिक वाचा..

खाजगी कारखाना काढण्याच पाप अशोक पवारांनी केलं: दादा पाटील फराटे

न्हावरे (तेजस फडके): शिरुर तालुक्यात एक घोडगंगा सहकारी साखर कारखाना असताना आणि अशोक पवार स्वतःच त्या कारखान्याचे अध्यक्ष असताना तालुक्यातच दुसरा खाजगी साखर कारखाना काढण्याच पाप आमदार अशोक पवार यांनी केल असुन घोडगंगा साखर कारखाना म्हणजे राजकारणाचा अड्डाच झाला आहे. त्यांचा स्वतःचा खाजगी कारखाना नफ्यासाठी चालवता आणि घोडगंगा साखर कारखान्यातील कामगारांना मात्र पाच महिने पगार […]

अधिक वाचा..

करंदीकरांनी अनुभवली संगीतमय दिवाळी पाडवा पहाट

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथे नुकतेच संगीतमय दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले असता गावातील प्रतिभावंत कलाकारांनी यामध्ये सहभाग घेत आठ वर्षांच्या कलाकारापासून ते एकवीस वर्षांच्या युवकांपर्यंतच्या 22 कलाकारांनी दिवाळी पाडवा पहाट मध्ये सहभाग घेतला होता. त्यामुळे आपल्याच गावातील बाल कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी करंदीकर एकवटल्याने मोठ्या उत्साहात दिवाळी पाडवा पहाट संपन्न झाली आहे. करंदी […]

अधिक वाचा..