अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना मिळणार बक्षीस! नितीन गडकरींची मोठी घोषणा

औरंगाबाद: रस्ते अपघातातील मृत्यू कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ‘गुड समॅरिटन’ (मदतनीस) योजनेत ऐतिहासिक बदल केला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत ही महत्त्वाची घोषणा केली आहे. मदत करणाऱ्यांसाठी मोठं प्रोत्साहन अपघातातील जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णालयात पोहोचवणाऱ्याला थेट ₹25,000 रोख बक्षीस देण्यात येणार. यापूर्वी ही रक्कम फक्त ₹5,000 होती, आता पाचपट वाढ करण्यात […]

अधिक वाचा..

आरोपीऐवजी पीडितांवर गुन्हा दाखल करणे हा चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार

पुण्यात पोलिसांचे जंगलराज सुरु आहे का? मुंबई: पुण्याच्या कोथरुड पोलिसांनी तीन तरुणींना मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार तरुणींनी केली होती. त्यांच्या तक्रारीची साधी दखलही पोलिसांनी घेतली नाही. १२ तासांहून अधिक काळ पोलीस आयुक्तालयात ठिय्या आंदोलन करूनही दोषी पोलिसांवर गुन्हा नोंद केला नाही. ऊलट त्या तीन तरुणींवरच सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला […]

अधिक वाचा..

राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार

अधिकारी-दलालांच्या मोठ्या सिंडिकेटचा जयंतराव पाटील यांच्याकडून विधानसभेत पर्दाफाश मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी आज विधानसभेत विरोधीपक्षाने मांडलेल्या २९३ अन्वये प्रस्तावावर जोरदार भाषण केले. या भाषणादरम्यान त्यांनी राज्यातील धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात झालेला मोठा भ्रष्टाचार उघडकीस आणला. या घोटाळ्यावर बोलताना जयंतराव पाटील म्हणाले की, पुणे जिल्ह्यामध्ये धरणग्रस्त लाभार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या […]

अधिक वाचा..

लैंगिक अत्याचार सहन केला जाणार नाही; पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे

सांगलीतील अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची गंभीर दखल सांगली: करगणी (ता. आटपाडी, जि. सांगली) येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील सामूहिक लैंगिक अत्याचाराच्या संतापजनक घटनेनंतर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तातडीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून कठोर कारवाईची मागणी केली. अत्याचारानंतर मानसिक व सामाजिक दबावामुळे पीडित मुलीने आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर […]

अधिक वाचा..

शिक्रापुर पोलिसांनी राहुल झगडेला केली अटक पिडीत महिलेचे आत्मदहन तात्पुरते स्थगित

शिरुर (तेजस फडके): शिक्रापुर पोलिस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल असताना 12 दिवस उलटूनही आरोपी अ‍ॅड राहुल संभाजी झगडे (रा. कुरकुंभ, ता. दौंड, जि. पुणे) याला शिक्रापुर पोलिस अटक करत नसल्याने संबंधित पिडीत महिला 15 ऑगस्ट रोजी पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतःच्या पाच वर्षाच्या मुलासह आत्मदहन करणार होती. याबाबत “शिरुर तालुका डॉट कॉम” ने वृत्त प्रसिद्ध […]

अधिक वाचा..

सप्तश्रृंगी अपघातातील जखमींना तातडीने मोफत वैद्यकीय उपचार पुरवण्याच्या सूचना; अजित पवार

मुंबई: नाशिकच्या वणी सप्तश्रृंगी घाटात झालेल्या एसटी बस अपघातातील जखमींना आवश्यक वैद्यकीय उपचार मोफत आणि तातडीने करण्याच्या सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत. काल सकाळी अपघाताची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने नाशिक जिल्हाधिकारी आणि कळवणच्या प्रांताधिकाऱ्यांना फोन करुन माहिती घेतली, तसेच जखमींना मोफत वैद्यकीय उपचार पुरवण्याच्या सूचना दिल्या. पालकमंत्री […]

अधिक वाचा..

नेते आवरा हो स्वतःला!…जनतेसाठी काम करा, स्त्री सन्मानाच्या चिंधड्या होत आहेत…

मुंबई: आपल्या देशात कधी झाला नाही इतका मोठ्या प्रमाणात समाजमाध्यमांचा उपयोग वर्तमानात होताना दिसतो .२०१४ पासून या समाज माध्यमांचा उपयोग  आपल्या विरोधी पक्षाना नामोहरम करण्यासाठी करण्याचे काम भारतीय जनता पक्षाने सुरू केले. समाज माध्यमातून आपली स्वतःची आयटी सेल, ट्रोलर तयार केले. त्यानंतर मग सगळेच राजकीय पक्ष समाज माध्यमातून आपली ही लढाऊ सैन्य तयार करू लागले […]

अधिक वाचा..

ग्रामीण भागातील युवक युवती ठरताहेत सोशल मिडीयाचे बळी

सोशल मिडीयातून सायबर क्राईम सह फसवणूकच्या घटनांमध्ये वाढ शिक्रापूर (शेरखान शेख) ग्रामीण भागामध्ये यापूर्वी मोबाईलवर फोन करुन बँकेची माहिती विचारून येणाऱ्या कोड नमणारने नागरिकांच्या बँकेतील पैसे गायब होण्याच्या मोठ्या घटना घडत होत्या मात्र आता वेगळ्या पद्धतीने सोशल मिडीयावर संभाषण करुन तसेच युवक व युवतींचे फोटो ईडित करुन युवकांना वेगवेगळ्या पद्धतीने आर्थिक भुर्दंड सोसावा लागत अल्स्याने […]

अधिक वाचा..

कान्हूरच्या अपघातग्रस्ताच्या मदतीस एकवटला सारा गाव

कान्हूर मेसाईतील अंकुश ननवरेंना गावकऱ्यांचा मदतीचा हात शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील अंकुश ननवरे यांचा अपघात झालेला असताना त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना उपचारासाठी मोठ्या रकमेची गरज असताना गावातील नागरिकांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून चक्क 51 हजार रुपयांची मदत संकलित करत सोशल मिडीयाचा चांगला वापर करत अपघातग्रस्त व्यक्तीसाठी मदतीचा हात पुढे केला […]

अधिक वाचा..

अंबादास दानवे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची घेणार भेट…

संभाजीनगर: शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. सत्तेत आल्यावर राजकारण करण्यात व्यस्त असलेल्या सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असल्याचा गंभीर आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी विरोधी पक्षनेते दानवे हे रविवार (दि. ४) सप्टेंबर रोजी बीड जिल्ह्याच्या […]

अधिक वाचा..