अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना मिळणार बक्षीस! नितीन गडकरींची मोठी घोषणा

महाराष्ट्र

औरंगाबाद: रस्ते अपघातातील मृत्यू कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ‘गुड समॅरिटन’ (मदतनीस) योजनेत ऐतिहासिक बदल केला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत ही महत्त्वाची घोषणा केली आहे.

मदत करणाऱ्यांसाठी मोठं प्रोत्साहन

अपघातातील जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णालयात पोहोचवणाऱ्याला थेट ₹25,000 रोख बक्षीस देण्यात येणार. यापूर्वी ही रक्कम फक्त ₹5,000 होती, आता पाचपट वाढ करण्यात आली आहे. बक्षीसासोबत प्रशस्तीपत्र देखील दिले जाणार.

‘गोल्डन अवर’मध्ये मदत केल्यास सन्मान

अपघातानंतरच्या पहिल्या 1 तासाला ‘गोल्डन अवर’ मानले जाते, या वेळेत मदत करणाऱ्यांना विशेष प्रोत्साहन

मदतनीसाला ‘राह-वीर’ या सन्माननीय पदवीने गौरवले जाणार

जखमींसाठी 1.5 लाखांपर्यंत मोफत उपचार

अपघातानंतर रुग्णालयात दाखल झाल्यावर अपघातग्रस्तांना पहिल्या 7 दिवसांसाठी ₹1.5 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार मिळणार असून यासाठी सर्व खर्च केंद्र सरकारकडून केला जाणार आहे.

योजना कुठे लागू होणार

राष्ट्रीय महामार्ग

राज्य महामार्ग

जिल्हा रस्ते

ग्रामीण भागातील रस्ता

ही योजना केवळ हायवेपुरती मर्यादित नाही

10 मिनिटांत रुग्णवाहिका पोहोचणार

अपघातस्थळी अवघ्या 10 मिनिटांत अत्याधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार असून यासाठी राज्य सरकारांशी करार सुरू असून टेक्नॉलॉजीवर आधारित प्रगत हेल्पलाइन सिस्टीम तयार केली जात आहे.

कायदेशीर अडचणींपासून पूर्ण संरक्षण

अपघातग्रस्तांना मदत केल्यानंतर पोलीस चौकशीची कोणतीही सक्ती नाही तसेच कोर्टात साक्ष देण्याची जबरदस्ती नाही. त्यांना ‘गुड समॅरिटन’ कायद्याअंतर्गत पूर्ण संरक्षण मिळणार आहे. त्यामुळे आता निर्भयपणे जखमींना मदत करता येणार

मानवतेला सलाम करणारी योजना

ही योजना म्हणजे केवळ आर्थिक मदत नाही, तर मानवतेला दिलेला मान आहे. आज मदत करा, उद्या कुणाचं तरी आयुष्य वाचवा.