कान्हूरमध्ये जलस्रोतांची पातळी खालावली, टँकर सुरू करण्याची ग्रामस्थांकडून मागणी

पाबळ (सुनिल जिते): कान्हूर मेसाई(ता. शिरूर) हद्दीतील वाड्या-वस्त्यांवरील जलस्रोतांची “पाणीपातळी खालावल्याने येथील नागरिकांकडून त्वरित टँकर सुरू करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे याबाबतचा प्रस्ताव शिरूर पंचायत समितीकडे देण्यात आलेला असल्याची माहिती उपसरपंच योगेश पुंडे यांनी दिली. मागील सलग दोन वर्षांपासून कान्हूर मेसाई ग्रामपंचायत हद्दीतील तसेच परिसरातील वाड्या-वस्त्यांच्या भागात पावसाने पाठ फिरवली आहे. मागील वर्षी मान्सूनपूर्व, मान्सून […]

अधिक वाचा..

MEPL च्या विरोधात ‘निमगाव भोगी’ सह पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे दोन दिवस धरणे आंदोलन

रांजणगाव गणपती (तेजस फडके) येथील औद्योगिक वसाहती मधील महाराष्ट्र एंव्हायरो पावर लिमिटेड (MEPL) या कंपनीसमोर आपल्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी निमगाव भोगी सह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी दोन दिवस धरणे आंदोलन केले. यावेळी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनच्या वतीने आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गुरुवार (दि १०) ऑक्टोबर रोजी भारताचे […]

अधिक वाचा..

पिंपळे जगताप कडे जाणारा रस्ता दुरुस्त करा अन्यथा उपोषण करु; ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) पिंपळे जगताप गावच्या हद्दीतील असलेला भारत गॅस कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाल्यामुळे पिंपळे जगतापचे ग्रामस्थ संतापले आहेत आणि या संतापातूनच सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत उपोषण आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत ग्रामस्थांनी शिक्रापुर पोलिस स्टेशन, तहसील कार्यालय शिरुर, सार्वजनिक बांधकाम विभाग शिरुर, जिल्हाधिकारी पुणे, पुणे महानगर विकास प्रदेश प्राधिकरण यांना याबाबत […]

अधिक वाचा..

डॉ अमोल कोल्हे यांना आमच्या मतांची गरज नाही का…? शिंदोडी, गुनाट व चिंचणी ग्रामस्थांचा सवाल…?

शिरुर (तेजस फडके) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सध्या कडक उन्हाळ्याबरोबरच निवडणुकीचे वातावरण तापले असुन डॉ अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. काल (दि 25) रोजी शिरुरच्या पुर्वभागात डॉ अमोल कोल्हे यांचा प्रचार दौरा होता. त्यावेळी शिंदोडी, गुनाट आणि चिंचणी या गावात कोल्हे यांनी जाण टाळल त्यामुळे नाराज झालेल्या ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त […]

अधिक वाचा..

घोड धरण 100 टक्के भरल्याने शिंदोडी ग्रामस्थांनी केले जलपूजन

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शेतीसाठी वरदान ठरलेले घोडधरण 100 टक्के भरल्याने या धरणाच्या पाण्याचा वर्षभर शेती व पिण्यासाठी गावाला फायदा होत असल्यामुळे शिंदोडी ग्रामस्थांच्या वतीने रविवार (दि 1) रोजी गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय मनोहर वाळुंज व त्यांच्या पत्नी नंदा दत्तात्रय वाळुंज यांच्या हस्ते घोडधरणाच्या पाण्याचे जलपूजन करण्यात आले.   यावेळी शिंदोडी […]

अधिक वाचा..

चोरी करून चालवलेले नदीवरील बंधाऱ्याचे ढापे वडनेर ग्रामस्थांनी पाठलाग करुन पकडले… 

शिरूर (अरुणकुमार मोटे): पावसाळा सुरू होत आहे. यामुळे नदीवरील बंधाऱ्यातील ढापे काढून ठेवण्यात आले होते. आज शनिवार (दि. १७) रोजी पहाटे एक -दीडच्या सुमारास हे ढापे चार-पाच जणांनी टेम्पोमध्ये भरून चोरी करुन घेऊन जात होते. अचानक नाथा शंकर निचित यांच्याकडे मजुरी करत असणाऱ्या मजुरास जाग आली. बाहेर काहीतरी वाजते याचा कानोसा घेत नाथा निचित यांना […]

अधिक वाचा..

त्र्यंबकेश्वरमध्ये दंगल घडवण्याचा भाजपाचा कुटिल डाव गावकऱ्यांनी उधळून लावला…

मुंबई: महाराष्ट्रात जातीय तणाव वाढवून दंगली घडवण्याचे षडयंत्र भारतीय जनता पक्ष व त्यांच्याशी संलग्न संघटना करत असल्याचे मागील काही दिवसापासून दिसत आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरला धूप दाखवण्याच्या प्रकरणाला भाजपाशी संबंधित लोकांनी जाणीवपूर्वक वादाचा रंग देऊन वातावरण बिघडवण्याचे काम केले आहे. त्र्यंबकेश्वरला धूप दाखवण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आली असून गावातील वातावरण शांत आहे […]

अधिक वाचा..

निघोज मधील हत्येच्या घटनेनंतर शिरूर मध्ये खळबळ ग्रामस्थांमध्ये चर्चेला उधाण 

शिरुर (सतिश डोंगरे): निघोज मधील पवार कुटुंबातील सात जणांनी आत्महत्या केल्याची पुसटशी बातमी काल सायंकाळी उशिरा निघोज मध्ये धडकली मात्र आजचा दिवस उजाडताच सात जणांची हत्या झाल्याचे उघड झाले अन् संपूर्ण निघोज नखशिखांत हादरले गावात सन्नाटा पसरला तसेच शेजारीच असलेल्या शिरुर तालुक्यातही या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. हे हत्या झालेले कुटुंब जरी मूळचे निघोजचे नसले […]

अधिक वाचा..

त्यापेक्षा आम्हालाच विष घालुन मारुन टाका निमगाव भोगी ग्रामस्थांचा आक्रोश

रांजणगाव गणपती (तेजस फडके): महाराष्ट्र एव्हारो पॉवर लिमिटेड (MEPL) या कंपनीमुळे आमचे ओढे, नाले, विहिरी, बोअरवेल मधील पाणी दुषित झाले असुन आमची शेतजमीन नापिक झालीये, आमची गुरु-ढोर या पाण्यामुळ तडफडून मरत आहेत. परंतु महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी मात्र म्हणतात कंपनीतुन सोडण्यात येणार पाणी पिण्यायोग्य आहे असं असेल तर त्या अधिकाऱ्यांनीच ते पाणी पिऊन दाखवावं […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC तील MEPL कंपनीच्या दूषित पाण्याबाबत ग्रामस्थांची उद्योगमंत्र्याकडे धाव

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC तील महाराष्ट्र इन्व्हायरो पावर लिमिटेड या कंपनीच्या दुषित पाण्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून निमगाव भोगी येथील शेतकऱ्यांची जमीन नापिक होत असुन अनेक जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. तसेच येथील ओढे, नाले, विहिरी बोअरवेल यातील सगळेच पाणी दुषित झाल्याने पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे […]

अधिक वाचा..