राज्यातील १९ महाविद्यालयांत १८ महिन्यांत सौरऊर्जा प्रकल्प; चंद्रकांत पाटील यांचे कामांना गतीचे निर्देश

मुंबई: राज्यातील छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि नांदेड जिल्ह्यातील १९ महाविद्यालयांमध्ये पुढील १८ महिन्यांत सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून, या कामांना गती देण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. महाप्रीत (MAHAPREIT) आणि उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार राबविण्यात येणाऱ्या सौरऊर्जा प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा आराखडा सादर करण्यात आला. […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादी काँग्रेसचा संघर्षाचा प्रवास थांबणार नाही; कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे; सुनेत्रा पवार

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना नव्या जोमाने आणि आत्मविश्वासाने कामाला लागण्याचे आवाहन केले. “वादळांना घाबरून आम्ही आमची गलबते कधी वळवली नाहीत. संघर्षाच्या या रणांगणात राष्ट्रवादी काँग्रेस कधीही मागे हटणार नाही,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी […]

अधिक वाचा..

कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

मुंबई: कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्याम कामांना गती देण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले. या बैठकीत पुढील प्रमुख घाटमार्गांवर सविस्तर चर्चा करण्यात आली —अणुस्करा–गावडी (ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) ते लांजा (जि. रत्नागिरी) येथील भांबेड–धनगरवाडी रस्ता. पावनखिंड–गजापूर–विशाळगड पायथा (ता. शाहूवाडी) ते संगमेश्वर तालुक्यातील देवडे–भोवडे जोडणारा […]

अधिक वाचा..

अजितदादांच्या कार्याला आणि त्यांच्या अविरत परिश्रमांना जनतेने कृतज्ञतापूर्वक अर्पण केलेली आदरांजली

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची प्रतिक्रिया मुंबई: आज जाहीर झालेले जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल म्हणजे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री व आमचे नेते अजितदादा पवार यांच्या कार्याला आणि त्यांच्या अविरत परिश्रमांना जनतेने कृतज्ञतापूर्वक अर्पण केलेली आदरांजली आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी […]

अधिक वाचा..

पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! खंबाटकी घाटातील बोगद्यांचे काम अंतिम टप्प्यात

प्रवास होणार वेगवान पुणे: पुणे ते सातारा दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी अत्यंत दिलासादायक अपडेट समोर आली आहे. मागील सहा वर्षांपासून सुरू असलेले खंबाटकी घाटातील बोगद्यांचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, यातील एक बोगदा शनिवारपासून वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडीचा त्रास लवकरच कमी होणार आहे. पुणे–सातारा महामार्गावरील खंबाटकी घाट हा […]

अधिक वाचा..

4 दिवस काम, 3 दिवस सुट्टी? 1 एप्रिल 2026 पासून नोकरीचे नियम बदलणार

औरंगाबाद: भारतातील कामगार वर्गासाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. केंद्र सरकार 1 एप्रिल 2026 पासून 29 जुने कायदे रद्द करून 4 नवीन कामगार संहिता (Labour Codes) लागू करण्याच्या तयारीत आहे. यामुळे पगार, कामाचे तास आणि सुट्ट्यांचे गणित पूर्णपणे बदलणार आहे. नवीन नियमांमधील मुख्य बदल काय आहेत 12 तासांची शिफ्ट जर एखाद्या कंपनीत 12 तासांची […]

अधिक वाचा..

कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब न करता काम केल्याने अधिकाऱ्यांवर माफी मागण्याची नामुष्की

सरदवाडी ग्रामस्थांच्या लढ्याला मोठे यश; अनिल जाधव यांचे प्रतिज्ञापत्र चुकीचे ठरले शिरूर (अरुणकुमार मोटे): सरदवाडी (ता. शिरूर) येथील ग्रामस्थ रामदास सरोदे व इतर नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) व एमआयडीसी यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर माननीय उच्च न्यायालय, मुंबई येथे झालेल्या सुनावणीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनाची मोठी नामुष्की झाली आहे. कायदेशीर मार्गाचा अवलंब न करता […]

अधिक वाचा..

सार्वजनिक बांधकाम यांच्या दुर्लक्षपणामुळे अन्नापुरातील निकृष्ट सिमेंट रस्त्याचे काम अखेर दुबार

सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील अन्नापुर गावठाणातील (रंगाअण्णा पवार यांच्या घरासमोरून अंगणवाडीकडे) जाणाऱ्या दहा लाखांचा निधी असलेल्या सीमेंट रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे निकृष्ट झाल्याबाबत “सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज” यांनी सा.बां. उपविभागाकडे वेळोवेळी प्रत्यक्ष भेटून, तसेच फोन/व्हॉट्स ॲप याद्वारे , जवळपास एक वर्षाहून अधिक पाठपुरावा केला […]

अधिक वाचा..

कुंभमेळा आयोजनाची कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत; मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई: राज्यात नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे 2027-28 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा आयोजित करण्यात येत आहे. मोठ्या संख्येने भाविक पर्यटक येणे अपेक्षित असून त्यादृष्टीने कुंभमेळा प्राधिकरणासह संबंधित विभागांनी आयोजनाची सर्व कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्य सचिव राजेश कुमार यांनी दिले. मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत कुंभमेळा पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. […]

अधिक वाचा..

बीड ते परळी रेल्वे मार्ग कामाला गती देऊन रेल्वे मार्ग पूर्ण करा ; अजित पवार

बीड ते अहिल्यानगर मार्गावर सुरू होणार रेल्वे मुंबई: बीड शहर लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार असून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार आहे. यामुळे अनेक वर्षापासूनचे बीडवासियांचे रेल्वेसेवेचे स्वप्न पूर्ण होणार आहे. येत्या १७ सप्टेंबर रोजी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्याचा निर्णय आज उपमुख्यमंत्री अजित […]

अधिक वाचा..