सातारा बसस्थानकाबाबत महत्त्वाचा निर्णय; वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुढील बाजूने ‘आऊट गेट’चा प्रस्ताव

सातारा: सातारा शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाबाहेर दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रशासनाला सक्त सूचना दिल्या आहेत. बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या बसेससाठी पुढील बाजूने (पारंगे चौक) स्वतंत्र ‘आऊट गेट’ काढण्याचा सुधारित आराखडा तातडीने तयार करून शासनाकडे सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली विविध प्रलंबित प्रश्नांवर महत्त्वाची बैठक […]

अधिक वाचा..

बारावी रसायनशास्त्र पेपर फुटीचा प्रकार; खासगी शिकवणीवर संशय, पोलिसांकडून गुन्हा दाखल

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने बुधवारी (ता. १८) घेण्यात आलेल्या बारावीच्या रसायनशास्त्र (केमिस्ट्री) विषयाच्या प्रश्नपत्रिकेची परीक्षा सुरू होण्यापूर्वीच ती एका विद्यार्थिनीच्या व्हॉट्सॲपवर व्हायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. केंद्रप्रमुखांच्या सतर्कतेमुळे गैरप्रकार मोठ्या प्रमाणावर होण्यापूर्वीच संबंधित विद्यार्थिनीला ताब्यात घेण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, बारावीच्या परीक्षेसाठी सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कूल येथे […]

अधिक वाचा..

राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भात शिवसेना गटातील भूमिका स्पष्ट

मुंबई: राज्यसभेच्या सात जागांसाठी लवकरच होणाऱ्या निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीबाबत राजकीय चर्चा तीव्र झाली आहे. या मुद्यावर शिवसेना ठाकरे गटातही वेगवेगळ्या भूमिका दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पूर्वी शरद पवार यांना राज्यसभेत जाण्याची इच्छा असल्यास त्यावर चर्चा करावी लागेल, असे सांगितले होते. मात्र, युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यसभेची जागा शिवसेना […]

अधिक वाचा..

72 वर्षीय आजीचा खून, नातवाने केला सोन्याच्या चैनीसाठी विषारी चहा दिला

कोल्हापूर: गंगावेश परिसरातील ऋणमुक्तेश्वर मंदिराजवळील शुक्रतारा अपार्टमेंटमध्ये उषा मारुती भिऊंगडे (वय 72) यांच्या मृत्यूचे रहस्य पोलिसांनी उकलले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासानंतर समोर आले की, या खुनामागे त्यांचा चुलत नातू प्रेम परशुराम भिऊंगडे (वय 20) होता. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रेमने चैनीसाठी सोन्याचे दागिने लुटण्याच्या हेतूने उषा यांना विषारी पावडर मिसळलेला चहा दिला. उषा यांनी चहा प्याल्यानंतर […]

अधिक वाचा..

डायबिटीस कशामुळे होतो

मधुमेह आता एक जागतिक आव्हान बनले आहे. जो फक्त नियंत्रित केला जाऊ शकतो. अलीकडेच एका अभ्यासाच्या मदतीने म्हातारपणात मधुमेहाचे कारण समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये स्वादुपिंडातील काही अंतःस्रावी पेशींच्या नुकसानाबाबत संशोधन करण्यात आले आहे. अशी घ्या काळजी मधुमेह आता एक गंभीर आजार बनला आहे. भारतात मधुमेहाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. जगभरात लाखो लोकांना […]

अधिक वाचा..

कोणती डाळ शरीरासाठी फायदेशीर असते 

डाळ भारतीय खाण्याचा एक महत्वपूर्ण आहार आहे. डाळीच्या सेवनानं शरीराला प्रोटीन्स, फायबर्स, व्हिटामीन्स आणि मिनरल्स मिळतात तसंच आरोग्यही चांगले राहते. पण डाळ प्रत्येकाच्याच शरीरासाठी सारखा परिणाम करत नाही. प्रसिद्ध आयुर्वेदीक डॉक्टर सलीम जैदी यांनी आपल्या इंस्टाग्राम हॅण्डलवर याबाबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते सांगतात की प्रत्येक डाळीचा प्रभाव वेगवेगळा असतो. म्हणून आपल्या […]

अधिक वाचा..

होळीनिमित्त मनरेगा मजुरांसाठी तातडीने 67 कोटींचा निधी मंजूर; रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले

मुंबई: होळीनिमित्त आदिवासी बांधवांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना तातडीने मजुरी अदा करण्यासाठी 67 कोटींचा निधी मंजूर केला आहे. सदर निधीची देयके कोषागाराकडे सादर करण्यात आली असून पुढील दोन ते तीन दिवसांत मजुरीची रक्कम थेट मजुरांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल, अशी माहिती रोजगार हमी योजना विभागाचे मंत्री भरत गोगावले यांनी दिली. […]

अधिक वाचा..

एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढीचे थकीत हप्ते देण्यासाठी शासन कटिबद्ध

मुंबई: एसटीच्या सुमारे ८६ हजार कर्मचाऱ्यांचे वेतन वाढीचे थकीत हप्ते देण्यासाठी शासनाने तातडीने १०० कोटी रुपयांची तरतूद केली असून लवकरच फेब्रुवारी महिन्याच्या वेतनात सोबत देण्यात येणारा वेतन वाढीचा थकीत हप्ता कर्मचाऱ्यांच्या बॅक खात्यात जमा होईल. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. तसेच या अनुषंगाने येत्या २४ फेब्रुवारीला काही […]

अधिक वाचा..

गोष्ट भिगवणच्या लेकीची; प्रेमप्रकरणाला राजकीय व धार्मिक वळण, संवेदनशीलतेचा प्रश्न ऐरणीवर

इंदापूर (पुणे):  पुणे जिल्ह्यातील भिगवण (ता. इंदापूर) येथील २१ वर्षीय तरुणीच्या कथित अपहरण प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे. सुरुवातीला अपहरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर आंदोलन, घोषणाबाजी आणि राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली; मात्र संबंधित तरुणीने २० फेब्रुवारी रोजी मध्यरात्री बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर होत ती स्वतःच्या इच्छेने प्रियकरासोबत गेल्याचे स्पष्ट केले आहे. तिने याबाबत प्रतिज्ञापत्रही सादर […]

अधिक वाचा..

तरुणांमध्ये का वाढतोय हार्ट अटॅकचा धोका

आपले शरीर व्यवस्थितपणे काम करण्यासाठी हृदय निरोगी असणे फार गरजेचे असते. जागतिक आरोग्य संघटनेनेच्या माहितीनुसार, हृदय विकाराच्या झटक्याने जगात सर्वाधिक मृत्यू होतात. दरवर्षी जवळपास जवळपास दोन कोटी लोकांना हार्ट अटॅकने आपले प्राण गमावावे लागतात. यादरम्यान आपण दररोज हृदयाची काळजी घेतल्यास हृदय विकाराचा धोका कमी केला जाऊ शकतो, असा सल्ला हृदयरोग तज्ज्ञ देतात. हार्ट अटॅकचा झटका […]

अधिक वाचा..