बिग बॉस मराठी 6 मध्ये डबल एलिमिनेशनची खळबळ; आयुष-करण बाहेर?

मुंबई: मराठी टेलिव्हिजनवरील सर्वाधिक चर्चेत असलेल्या बिग बॉस मराठी 6 मध्ये या आठवड्यात मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. घरात डबल एलिमिनेशन झाल्याची जोरदार चर्चा रंगली असून दोन दमदार स्पर्धकांचा प्रवास संपल्याचं बोललं जात आहे. या घडामोडींमुळे प्रेक्षकांमध्ये खळबळ उडाली असून आजच्या ‘भाऊच्या धक्क्या’कडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आयुष संजीवचा प्रवास थांबला अभिनेता आयुष संजीव याचा […]

अधिक वाचा..

मी आधी नास्तिक होते! रिंकू राजगुरूचा केदारनाथातील अनुभव; एका घटनेनंतर बसला ‘त्या शक्ती’वर विश्वास

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री रिंकू राजगुरू गेली दहा वर्षे सिनेइंडस्ट्रीत सक्रिय आहे. सैराट या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली रिंकू अभिनयासोबतच सोशल मीडियावरही स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. अलीकडेच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या आयुष्यातील आध्यात्मिक प्रवासाबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले. “मी आधी नास्तिक होते. पण केदारनाथला गेल्यानंतर काही घटनांमुळे माझा थोडाथोडा विश्वास बसायला लागला. पूजा-पाठ, मंत्र, सण-उत्सव […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात राजकीय खळबळ! शिंदे गटात राजीनामा, भाजपात गटबाजी, ठाकरे गटात निलंबनाची टांगती तलवार

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात एकाच वेळी अनेक घडामोडींनी वेग घेतला आहे. शिंदे गटातील तडकाफडकी राजीनामा, भाजपातील उफाळलेली गटबाजी, ठाकरे गटातील नगरसेवकांवरील कारवाईची शक्यता, तसेच टिपू सुलतान वादावरून आरोप-प्रत्यारोप… या सर्व घटनांनी राजकीय वातावरण तापले आहे. शिंदेंच्या शिलेदाराचा तडकाफडकी राजीनामा सिंधुदुर्ग येथील शिंदे गटाचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. […]

अधिक वाचा..

अलिबाग जमीनवाद प्रकरण पेटलं; ‘माहिती बाहेर काढली तर राहुल नार्वेकर यांना राजीनामा द्यावा लागेल’

अलिबाग: अलिबागमधील म्हात्रोळी गावातील जमीन मोजणीच्या वादातून उफाळलेलं प्रकरण आता राज्याच्या राजकारणात चांगलंच तापलं आहे. विधानसभा अध्यक्ष Rahul Narwekar यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार Sanjay Raut यांनी गंभीर आरोप करत थेट हल्लाबोल केला आहे. राऊतांचा आरोप काय? राऊत यांनी दावा केला की, गावातील जमीन एका गुजराती उद्योगपतीच्या फार्महाऊससाठी घेण्याचा […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादी विलीनीकरणावर ब्रेक! जयंत पाटील यांचे सूचक वक्तव्य; शिंदेंची स्पष्ट भूमिका

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा वेगाने पुढे सरकत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. अजित पवारांची इच्छा दोन्ही गट एकत्र यावेत, अशी होती आणि त्यासाठी त्यांनी काही बैठका घेतल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला होता. मात्र या चर्चेला आता अचानक ब्रेक लागल्याचे दिसत आहे. अजित पवार गटाचे नेते […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना: eKYC दुरुस्तीसाठी विशेष संधी

मुंबई: राज्यातील महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्य सरकारने पुन्हा एकदा eKYC प्रक्रियेसाठी पोर्टल सुरू केले आहे. मात्र, ही संधी सर्व अर्जदारांसाठी नसून केवळ ज्या महिलांनी पूर्वी अर्ज भरताना eKYC प्रक्रियेत चुकीचे पर्याय निवडले होते, त्यांच्यासाठीच उपलब्ध करण्यात आली आहे. पोर्टलवर स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, “ही eKYC ची […]

अधिक वाचा..

तेजस ठाकरे यांची प्रकृती बिघडली; रिलायन्स रुग्णालय येथे उपचार सुरू

मुंबई: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने मुंबईतील रिलायन्स रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. तेजस यांना अस्वस्थ वाटू लागल्याने बुधवारी सायंकाळी त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. आवश्यक त्या सर्व वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या असून उपचारानंतर […]

अधिक वाचा..

अल्पवयीन मुलीच्या दीक्षेवरून वाद; वडिलांचा तीव्र विरोध, कायदेशीर नोटीस

धुळे: धुळे शहरातील एका अल्पवयीन मुलीच्या दीक्षा सोहळ्यावरून वाद निर्माण झाला असून वडिलांनी संबंधित जैन आचार्यांना कायदेशीर नोटीस पाठवत सोहळा तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. ही दीक्षा १४ मार्च २०२६ रोजी मुंबई येथे होणार असल्याची माहिती आहे. उपलब्ध माहितीनुसार, जैन धर्मगुरू आचार्य मुक्तिवल्लभसूरी यांच्या आज्ञेनुसार संबंधित मुलीचा दीक्षा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मुलगी […]

अधिक वाचा..

भाजपाकडून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिकण्याची गरज नाही’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर पलटवार

वर्धा: “आम्हाला भाजपाकडून छत्रपती शिवाजी महाराज शिकण्याची गरज नाही,” असे ठाम प्रतिपादन काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. माझ्या वक्तव्याची जाणीवपूर्वक मोडतोड करून राज्यात हिंदू-मुस्लीम वाद पेटवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. टिपू सुलतानच्या मुद्द्यावर वर्धा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, “महापुरुषांच्या नावावर राजकारण सुरू आहे. समाजात द्वेष पसरवला जात आहे. सर्व महामानवांचे फोटो […]

अधिक वाचा..

व्हॅलेंटाईन डे निमित्त श्वेता खरातची प्रेमाची कबुली; ‘A’ कोण? चाहत्यांमध्ये उत्सुकता

मुंबई: व्हॅलेंटाईन्स डे म्हणजे प्रेमाचा उत्सव. आजच्या या खास दिवशी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी आपल्या जोडीदारासाठी रोमँटिक पोस्ट शेअर करत प्रेम व्यक्त केलं. सोशल मीडियावर प्रेमाच्या कबुल्यांचा अक्षरशः वर्षाव पाहायला मिळाला. गेल्या काही दिवसांत रेवती लेले, गायत्री दातार आणि ज्ञानदा रामतीर्थकर अशा अभिनेत्रीांनीही आपल्या नात्याची अधिकृत कबुली दिली होती. आता त्यांच्याच पाठोपाठ आणखी एका लोकप्रिय […]

अधिक वाचा..