दादांचे माझ्या ज्येष्ठत्वाचा सन्मान आणि कुटुंबावरचे प्रेम कायम स्मरणात राहील; छगन भुजबळ

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकस्मात निधनाने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र शोकभावना व्यक्त केल्या आहेत. “अत्यंत धक्कादायक… अजूनही विश्वास बसत नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना मांडल्या. “अजितदादांसारख्या धडाडीच्या नेत्याचं असं अचानक जाणं हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी मोठा धक्का आहे. उमद्या, […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राचा अत्यंत अभ्यासू व कर्तबगार नेता हरपला; मंत्री जयकुमार रावल

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक तसेच सर्व क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात झालेले दुर्दैवी निधन अत्यंत धक्कादायक, वेदनादायी आणि मन सुन्न करणारे आहे. त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राने एक अत्यंत अभ्यासू, अनुभवी, कर्तबगार, अजातशत्रू आणि लोकाभिमुख नेतृत्व गमावले आहे, अशा शब्दांत राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी शोकभावना व्यक्त केल्या. मंत्री […]

अधिक वाचा..

अजित पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राचे नेतृत्व पोरके; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अकाली निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक व सुन्न करणारी आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने धडाडीचे, कर्तबगार आणि लोकाभिमुख नेतृत्व गमावले आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र शोकभावना व्यक्त केल्या.अजित दादा पवार हे स्पष्टवक्तेपणा, प्रशासनावर मजबूत पकड, जनतेच्या प्रश्नांची सखोल जाण आणि ते प्रभावीपणे सोडवण्याच्या […]

अधिक वाचा..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित आशाताई अनंतराव पवार यांचे आज बुधवार, दि. २८ जानेवारी २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने २८ ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या […]

अधिक वाचा..

पुण्यात मॉर्निंग वॉक जीवावर बेतला; अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू

पुणे: पुण्यातील पाषाण रोड–पंचवटी–एनसीएल परिसरात मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या एका 73 वर्षीय महिलेचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आशा विजयकुमार पाटील (वय 73) असे मृत महिलेचे नाव असून, 24 जानेवारी रोजी पहाटे ही घटना घडली. दररोजप्रमाणे पहाटे सुमारे 5.30 वाजता मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या आशा पाटील सकाळी घरी परतल्या नाहीत. सकाळी […]

अधिक वाचा..

उच्चशिक्षित विवाहितेवर विष पाजून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न; पती फरार

नाशिक: पुण्यात इंजिनिअर विवाहितेच्या आत्महत्येच्या घटनेनंतर राज्यात खळबळ उडालेली असतानाच नाशिकमधूनही तितकाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेमविवाहानंतर सासरच्यांकडून मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागलेल्या एका उच्चशिक्षित विवाहितेला मारहाण करून जबरदस्तीने विषारी औषध पाजल्याचा गंभीर आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. या घटनेनंतर शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पीडित विवाहितेचे नाव महिमा मॉन्टी […]

अधिक वाचा..

राष्ट्र प्रथम’अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी व्यापक उपक्रम

शालेय विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण व जीवन कौशल्य यावर भर मुंबई: ‘राष्ट्र प्रथम’ या संकल्पनेतून राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. राणी लक्ष्मीबाई आत्मसंरक्षण प्रशिक्षण, मूलभूत सैनिकी प्रशिक्षण, प्रबोधन, योग प्रशिक्षण आणि आरोग्य समुपदेशन हे पाच उपक्रम ‘आनंददायी शनिवार’ मध्ये विविध तासिकांमधून राबविण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी […]

अधिक वाचा..

आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करा

मुंबई: राज्यात सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता लागू आहे, असे असताना सत्ताधारी पक्षातील मंत्री जाणीवपूर्वक आणि उघडपणे या आचारसंहितेचे उल्लंघन करत असल्याचे गंभीर प्रकार समोर येत आहेत. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेच्या पूर्वसंध्येला सांगली जिल्ह्यात झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात, “जिल्हा परिषद निवडणुकीत […]

अधिक वाचा..

न्यायाच्या नावाखाली हिंसक आणि अमानवी भाषेला प्रोत्साहन देता येणार नाही; डॉ. नीलम गोऱ्हे

संविधान व मानवी अधिकारांच्या चौकटीत दखल आवश्यक; डॉ. नीलम गोऱ्हे यांची ठाम भूमिका मुंबई: भंडारा येथे आयोजित एका गायनाच्या कार्यक्रमात गायिका अंजली भारती यांनी बलात्कारासारख्या अतिशय संवेदनशील विषयावर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत वापरलेली निंदनीय व आक्षेपार्ह भाषा अत्यंत अस्वस्थ करणारी असून ती कोणत्याही परिस्थितीत समर्थन करण्याजोगी नाही, अशी ठाम […]

अधिक वाचा..

अजितदादांच्या जाण्याने माझे वैयक्तिक नुकसान; डॉ. विश्वजीत कदम यांच्याकडून शोक व्यक्त

मुंबई: महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाची बातमी ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी तसेच कदम कुटुंबासाठी अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे. अजितदादांच्या जाण्याने राज्याने एक खंबीर, अनुभवी आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व गमावले आहे. गेल्या सुमारे ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात त्यांनी आपल्या प्रशासकीय अभ्यास, ठाम निर्णयक्षमता आणि नेतृत्वगुणांच्या बळावर महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळे […]

अधिक वाचा..