महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रत्येक विभागाने ठोस पावले उचलावीत: डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आवाहन

जागतिक महिला दिनानिमित्त विधानपरिषदेत विशेष चर्चा; ‘उभारी’ प्रकल्प आणि सुरक्षा ऑडिटवर दिला भर ​मुंबई: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज विधान परिषद सभागृहात महिलांच्या प्रश्नांवर विशेष चर्चा घडवून आणण्यात आली. पिठासीन अधिकारी तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या चर्चेचा प्रस्ताव मांडला. चर्चेच्या समारोपप्रसंगी बोलताना त्यांनी राज्यातील महिलांच्या आर्थिक, सामाजिक आणि कायदेशीर संरक्षणासाठी राज्य सरकारने […]

अधिक वाचा..

सार्वजनिक बांधकाम विभागातील मुजोर आधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे शिरूर–मलठण रस्त्याची लागली वाट

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा शिरूर–मलठण मार्ग शिरूर सार्वजनिक बांधकाम विभागातील मुजोर आधिकार्याच्या निष्क्रीय कामगिरीमुळे अक्षरशः खड्ड्यांच्या विळख्यात सापडला आहे. या अधिकाऱ्याला ठेकेदारांकडून नीट खड्डे सुद्धा बुजून घेता आले नाही. त्याचे कारणही तसेच आहे कारण हा मुजोर अधिकारी पुणे येथे राहत असून त्याचे या ठेकेदारांवर व रस्त्यावर त्यांचे कसलेच लक्ष […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूरमधील श्री विवेकानंद लॉ कॉलेजमध्ये गैरप्रकारांचा आरोप; विद्यार्थीनीने पोलिसांकडे केली लेखी तक्रार…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर येथील श्री विवेकानंद लॉ कॉलेजमध्ये परीक्षेदरम्यान गैरप्रकार व विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप करत एका विद्यार्थ्याने शिरूर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केल्याने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. या तक्रारीत परीक्षेच्या काळात काही विद्यार्थ्यांकडून मोबाईलचा वापर करून गैरमार्गाने उत्तरं मिळविणे, तसेच परीक्षेच्या प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचे आरोप करण्यात आले आहेत. […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात ‘या’ भाज्या खाणं म्हणजे आजारांना आमंत्रण

हीवाळ्यात जसं अन्नपचन खूप चांगलं होतं, खाल्लेलं सगळं अंगी लागतं, तसं पावसाळ्यात होत नाही. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पचनक्रिया मंदावलेली असते. त्यामुळे कित्येक पदार्थ पचत नाही. ज्या लोकांना नेहमीच ॲसिडीटी, अपचन असा त्रास होतो, त्यांनी तर त्यांच्या आहाराची पावसाळ्यात थोडी विशेष काळजी घ्यायला हवी. कारण सर्वसामान्य लोकांनाही या दिवसांत कित्येक पदार्थ खाल्ले की पोट जड होणे, ॲसिडीटी, […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात फंगल इन्फेक्शनचा धोका, लहान मुलांची विशेष काळजी घ्या

पावसाळ्यात त्वचाविकारांचे प्रमाण वाढत असल्याचे आढळून आले आहे. रुग्णालयांत त्वचाविकारांचे रुग्ण ३० ते ४० टक्क्यांनी वाढले आहेत. सतत भिजणे, ओलसर कपडे परिधान करणे या विविध कारणांमुळे फंगल इन्फेक्शनचा धोका वाढतो. हा आजार दुर्लक्षित केला तर तो गंभीर संसर्गाचे रूप धारण करू शकतो. त्वचारोगतज्ज्ञांनी नागरिकांना स्वच्छता आणि त्वचेची योग्य काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पावसाळ्यात खाज, […]

अधिक वाचा..

तुळशीचे केसांना होणारे फायदे

केस गळणं, केसांना फाटे फुटणं, केस पातळ होणं अशा समस्या अनेकांना उद्भवतात. यासाठी घरगुती उपायात तुळशीचा वापर करावा. तुळशीच्या सेवनाने इम्यूनिटी वाढून सर्दी खोकला दूर होतो, इतकंच नाही तर केस लांबसडक दाट होण्यास मदत होते. जर केस फारच विरळ झाले असतील, तर त्यावर तुळशीचा वापर करुन केसांची लांबी वाढवू शकता. तुळशीमुळे केस डिटॉक्स होण्यास मदत […]

अधिक वाचा..

दहावी-बारावी परीक्षेत कॉपीप्रकरणांवर मोठी कारवाई; ८१ जण निलंबित, २६९ प्रकरणे नोंद

मुंबई: सध्या सुरू असलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांदरम्यान कॉपीप्रकरणांवर कडक कारवाई करत ८१ जणांना निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड Higher सेकंडरी एडुकेशन तर्फे घेण्यात येणाऱ्या या परीक्षांमध्ये विविध केंद्रांवर सामूहिक कॉपीप्रकरणे उघडकीस आल्यानंतर मंडळाने ही कठोर कारवाई केली आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकारांना मदत केल्याचा आरोप असल्याने काही पर्यवेक्षक, केंद्रप्रमुख तसेच संबंधित […]

अधिक वाचा..

दोन महिन्यांपासून बेपत्ता माजी सरपंच महेश पिळणकर; कोल्हापुरात कुटुंबीयांचे आंदोलन, तपासावर प्रश्नचिन्ह

कोल्हापूर: जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पाटगावचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य महेश दिनकर पिळणकर (वय ५२) हे गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ७ जानेवारी २०२६ रोजी रात्री जेवणासाठी घराबाहेर पडलेले पिळणकर अद्याप घरी परतलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून तपास संथ गतीने सुरू असल्याचा आरोप केला आहे. […]

अधिक वाचा..

शक्तीपीठ महामार्ग लाडक्या उद्योगपतींसाठी रेडकार्पेट

मुंबई: अमेरिकेबरोबर व्यापारी करार झाल्यापासून भारतातील सर्व शेतमालांचे भाव पडले आहेत, फळांचेही भाव पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या या नुकसानीला केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच जबाबदार असून नरेंद्र मोदी अमेरिकेसमोर सरेंडर झाले असून त्यांनी देश विकायला काढला आहे, अशी घणाघाती टीका करत मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा जाहीर निषेध करण्यासाठी, सरकारला जागे करण्यासाठी, तसेच […]

अधिक वाचा..

वंचित पत्रकारांना न्याय देण्यासाठी यंत्रणा सक्षम करण्याची गरज; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषदेत नियम १०१ अन्वये लक्षवेधी सूचनेअंतर्गत पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी जाहीर केलेले आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करून त्यांच्या कल्याणासाठी उपाययोजना करण्याबाबतचा मुद्दा विधानपरिषद सदस्य श्रीकांत भारतीय यांनी उपस्थित केला. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून बोलताना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकारांना येणाऱ्या प्रत्यक्ष अडचणींकडे सरकारचे लक्ष वेधले. त्या म्हणाल्या की, आचार्य बाळशास्त्री जांभेकर […]

अधिक वाचा..